Quantcast
Channel: Lokmanas Marathi News, Lokmanas Latest Marathi News, Lokmanas News Headlines & Updates | लोकमानस मराठी ताज्या बातम्या at Loksatta.com | Loksatta
Viewing all 2339 articles
Browse latest View live

श्रद्धासुद्धा पिकते तिथे विकत नाही!

$
0
0

शनीच्या चौथऱ्यावर महिलेच्या प्रवेशाची घटना हा ट्रस्टींमधील शह-प्रतिशहाचा भाग होता. पुरोगाम्यांना त्यातही क्रांतिकारकत्व दिसले. त्यावर बरेच चर्वतिचर्वण झाले. अखेर अनीता शेट्टी नामक महिलाच आता ट्रस्टच्या अध्यक्षपदी आल्या असून िलगविषमता संपल्याचा दावा त्यांनी केला आहे. ती विषमता कशी संपली आहे, तर.. चौथऱ्यावर प्रवेश करू पाहणाऱ्या महिलांचे ‘प्रबोधन’ करत ‘परंपरा’ जोपासण्याचा माझा प्रयत्न राहील. महिला भाविकांच्या ‘हिताचे’ निर्णय घेऊ, असे अनीता शेट्टी म्हणतात.

‘बाई गं चौथऱ्यावर न चढण्यातच तुझे हित आहे,’ हे आता एका महिलेकडूनच समस्त महिलांना कळविण्यात व दानपेटी (तिला कुलूप आहे!) सुजलाम्, सुफलाम् करण्यात धुरीणांना यश आले आहे. शनीचे माहात्म्य वाढवूनच गावाचा व्यापार-उदीम वाढला आहे. जपायचाय तो व्यापार. श्रद्धासुद्धा पिकते तिथे विकत नाही. बाहेरचा ग्राहक टिकविणे महत्त्वाचे.

किशोर मांदळे, भोसरी (पुणे)

 

मंदिरांची निगा राखणेही आवश्यक

‘देशात प्रत्येक गावात राम मंदिर उभारण्याची विश्व हिंदू परिषदेची घोषणा’ (लोकसत्ता, १२ जानेवारी) ही बातमी मला गमतीची वाटली. आज युरोपमध्ये चर्च ओस पडत आहेत. अनेक ठिकाणी त्यांचे हॉटेलांमध्ये रूपांतर होत आहे. मात्र भारतात आताच्या युगात मध्ययुगीन मानसिकता डोके वर काढत आहे. माझे पूर्वज निर्मळ येथील शंकराचारीय मंदिरात पुजारी होते. त्यांनी पोर्तुगीज अमलात कॅथोलिक धर्म स्वीकारला. आजच्या घडीला मला धर्म कालबाह्य़ वाटत आहे. मात्र न चुकता मी नियमित प्रत्येक वर्षी निर्मळच्या शंकराचारीय मंदिरात मे महिन्याच्या १५ व १६ तारखांना संध्याकाळी ४ ते ६ या वेळेत बसून पूर्वजांची आठवण करीत सभोवरचा निसर्ग पाहत मानसिक आनंद घेत असे. आता गेली दोन वर्षे हा नाद मी सोडून दिला. कारण या निसर्गदत्त परिसराचा बोऱ्या वाजला आहे. सर्वत्र लाकूड कारखाने, करवतींचे आवाज, आजूबाजूची घाण व मंदिराच्या आत झोपलेले कुत्रे हे दृश्य मनास यातना देणारे आहे. िहदू धर्माच्या तथाकथित रक्षकांनी सर्वप्रथम ही अशी मंदिरे स्वच्छ व निसर्गदत्त करून घ्यावीत म्हणजे माझ्यासारखे पूर्वाश्रमीचे िहदू पुन्हा एकदा तेथील निसर्गशांतता उपभोगतील. गावात जी मंदिरे आहेत त्यांची निगा राखली तरी खूप उपकार होतील.

मार्कुस डाबरे, पापडी (वसई)

 

हुरळून जाण्याचे कारण नाही..

पदोन्नती प्रक्रियेच्या वेळापत्रकासंबंधीची बातमी (लोकसत्ता, ११ जाने.) वाचली. या बातमीने अनेक शासकीय अधिकारी व कर्मचारी यांना अतीव आनंद झाला असेल. परंतु असे वेळापत्रक यापूर्वी विहित नव्हते का? होते, तर त्याप्रमाणे कार्यवाही झाली का? झाली नसेल तर का झाली नाही? व योग्य कार्यवाही झाली असेल तर नव्याने वेळापत्रक तयार करून जाहीर करण्याचे कारण कोणते? इतर अनेक विषयांचे कामाचे वेळापत्रक आहे, त्याप्रमाणे कार्यवाही होते का? परंतु आपली माध्यमेही हे प्रश्न विचारण्याचे स्वत:चे कर्तव्य विसरली असावीत, असे अनुमान करण्यास भरपूर वाव आहे.

तसेच अधिकारी व कर्मचारी भरती, बदली व शैक्षणिक संस्थांना मंजुरी, वरिष्ठ श्रेणी मंजुरी, उत्कृष्ट कामाची वेतनवाढ, केंद्राप्रमाणे महागाई भत्ता, विविध प्रकल्पांची कार्यवाही, योजनांची कार्यवाही, १ तारखेस वेतन, आíथक तरतुदीचे वितरण, सेवानिवृत्ती वेतन प्रस्ताव, गृहकर्ज मंजुरी किंवा अशा अनेक विषयांच्या कार्यवाहीची वेळापत्रके राज्य सरकारने विहित केलेली आहेतच. या वेळापत्रकांप्रमाणे कार्यवाही झाली का? याची माहिती कधी प्रसिद्ध झाली आहे का? किंवा वेळापत्रकाप्रमाणे कार्यवाही झाल्याचा अनुभव नागरिकांना कधी आला आहे का? याचे उत्तर माध्यमांनी शोधून जाहीर करणे आवश्यक आहे. थोडक्यात, अशा वेळापत्रकाच्या बातमीने हरपून/ हरखून जाण्याचे कारण नाही.

तसेच कर्मचारी भरतीच नियतकालीनरीत्या होत नसेल तर नियतकालीन बदली व बढती करण्याचा प्रश्नच कोठे उपस्थित होतो?

दिलीप वसंत सहस्रबुद्धे, सोलापूर

 

जे प्रत्युत्तर द्यायचे, त्याची वाच्यता नको..

पठाणकोटचा हल्ला होऊनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्याही प्रकारे आक्रस्ताळेपणा न करता शांत व धोरणीपणाने, एक परिपक्वव सुसंस्कृत राजकारणी  म्हणून जागतिक पातळीवर स्थान प्राप्त केले. त्यामुळे अमेरिकेने आपले वजन खर्च करून पाकिस्तानला अतिरेक्यांविरुद्ध पाऊल उचलण्यास भाग पाडले. मोदींच्याच सरकारातील संरक्षणमंत्रीसुद्धा लष्करी प्रमुखांच्या उपस्थितीत पाकिस्तानशी जशास तसे वागण्याची भूमिका जाहीर करताना ते त्यांचे व्यक्तिगत मत असल्याचे सांगायला विसरले नाहीत.  सरकारने पाकिस्तानशी कसे वागायचे, यासाठीच्या धोरणात एकवाक्यता नाही हेच यातून दिसले.

‘जशास तसे’ ही संरक्षणमंत्री पíरकरांनी मांडलेली भूमिका योग्य असली तरी तिचा जाहीर उच्चार केल्याने ती मोदींच्या राजनीतीला आंतरराष्ट्रीय पातळीवर मारक ठरू शकते. बलुचिस्तानमधील फुटीर संघटनांना मदत करून पाकिस्तानला सहज सतावता येईल, पण आपण हे अगोदरच जाहीर केल्याने पाकिस्तानात कुठेही होणाऱ्या हल्ल्यासाठी भारतालाच जबाबदार धरणे पाकिस्तानला सोपे होईल व आपल्यालाही आपली बाजू जागतिक पटलावर मांडणे  अवघड जाईल. त्यामुळे आपल्या कोणत्याही भविष्यकालीन धोरणाची वाच्यता न करता जशास तसे हेच धोरण चालवणे गरजेचे आहे.

काहीही झाले तरी युद्धामुळे त्यांच्याप्रमाणेच आपली हानी होणार असल्याने इतकी केलेली प्रगती वाया जाईल. त्यामुळे युद्ध पुकारण्यापेक्षा पíरकर म्हणतात त्याप्रमाणे ‘जशास तसे धोरण’ कोणतीही वाच्यता न ठेवता करणे गरजेचे आहे. त्याच वेळी राजकारणाच्या मंचावर वाटाघाटीचा राबता चालू ठेवून आपण कसे शांतताप्रेमी देश आहोत हेच दाखवून देण्याचा प्रयत्न चालू ठेवणे गरजेचे आहे.

प्रसाद भावे, सातारा

 

व्यापाराव्यतिरिक्त नाक खुपसणे गैरच

‘हल्लेखोरांना जशास तसे उत्तर!’ हा पठाणकोटवरील हल्ल्याबाबत संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांचा इशारा ही बातमी व ‘पठाणकोटचे वास्तव’ हा अग्रलेख (१२ जाने.) वाचला. अमेरिकेने पठाणकोट प्रसंगावर पाकिस्तानला दिलेला इशारा म्हणजे लहानगा खूश व्हावा म्हणून मोठय़ाला डोळे मिचकावून दिलेला दम आहे, याचा भारताने अनेक वेळा अनुभव घेतला आहेच. त्याचप्रमाणे लगोलग ‘आम्ही तुम्हाला बघून घेऊ!’ या भारताने दिलेल्या दमाचीही पाकिस्तानला सवयच झाली आहे! तालिबान्यांनी एकत्र येऊन पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि अमेरिकेला लक्ष्य केले आहे. आता हे बंडखोर पाकिस्तानी, अफगाणी आणि काही परकीयांना अतिरेकी कारवायांचे प्रशिक्षण देतीत व सीमा ओलांडून अफगाणिस्तानात जाऊन अमेरिकी सन्याला लक्ष्य करतीत. यामागे पाकिस्तानच आहे हे सर्व जगास माहीत आहे. पुन्हा याच अफगाण शांततेबाबतची चर्चा पाकिस्तानातच होत आहे, ही क्रूर चेष्टा अमेरिकेच्या सहमतीशिवाय शक्य आहे का? पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि तालिबानच्या अंतर्गत प्रश्नांचा कर्ताकरविता अमेरिका आहे म्हणूनच अग्रलेखात भारताला या चच्रेत आमंत्रण न दिल्याची व्यक्त केलेली चिंता निर्थक आहे. अफू (उत्पादन व त्यामागील जागतिक अर्थकारण), अतिरेकी, अफगाणिस्तान, अमेरिका (हे ४ अ) आणि त्याचे मर्कट अपत्य पाकिस्तान या एकमेकात गुरफटलेल्या प्रश्नांत भारताने व्यापाराव्यतिरिक्त आपले नाक खुपसणे गर आहे.

प्रवीण आंबेसकर, ठाणे

 

जाग कधी येणार?

‘पठाणकोटचे वास्तव’ हा अग्रलेख (१२ जानेवारी) वाचला. गेली पाच दशके आपणच आपल्या संरक्षणाची जबाबदारी अमेरिकेच्या हाती सोपवून निद्रिस्त झालो आहोत. १५ ऑगस्ट व २६ जानेवारीला ‘ऐ मेरे वतनके लोगों, जो शहीद हुये है, उनकी, जरा याद करो कुर्बानी’ ही कॅसेट वाजवली की आमची इतिकर्तव्यता संपते. त्या गीतातील ‘जब हम बठे थे घरोंमे, वो झेल रहे थे गोली’ या भावपूर्ण ओळी कानावर पडल्या की सीमारेषेवर जिवाचे बलिदान करून देशाचे संरक्षण करणाऱ्या जवानांसमोर नक्कीच नतमस्तक व्हावेसे वाटते आणि त्याच वेळी शहीद जवानांसाठी असलेल्या शवपेटिका, ब्लँकेट्स व बोफोर्स तोफा खरेदी व्यवहारात झालेला मागचा भ्रष्टाचार आठवला की संताप होतो. १९६२च्या चीन आक्रमणानंतर आम्ही काहीच शिकलो नाही का? ९/११च्या ऐतिहासिक हल्ल्यानंतर अमेरिकी सुरक्षा यंत्रणा अधिक आक्रमक बनली, जेणेकरून आजतागायत त्याची पुनरावृत्ती झाली नाही. आपण मात्र दहशतवादी हल्ल्याच्या छायेखाली आजही वावरत आहोत. आमची खाबूगिरी जोपर्यंत थांबत नाही, तोपर्यंत सुरक्षा यंत्रणाच काय, कोणतीही यंत्रणा या देशात यशस्वीपणे राबवली जाणार नाही.

सूर्यकांत भोसले, मुलुंड (मुंबई)

 

सीसीटीव्ही बसवाच, पण शिस्तही आणा

मुंबईतील एका नामांकित शाळेतील अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याची बातमी अतिशय धक्कादायक आहे. दिवसेंदिवस वाढतच जाणाऱ्या या विकृत घटना मन विषण्ण करणाऱ्या आहेत. शाळेसारखे पवित्र विद्यास्थानही मुलींसाठी सुरक्षित नाही, हे एक भयाण वास्तव समोर आले. या गुन्हेगारांवर तत्परतेने कायदेशीर कारवाई करण्यात यावी. तसेच याबाबत नुकत्याच उच्च न्यायालयाने दिलेल्या सूचनेप्रमाणे लवकरात लवकर खासगी व सरकारी सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत आणि शाळेच्या परिसरात सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात यावी. शाळेतील शिस्त व सुरक्षेसंबंधी नियमावली अधिक कडक करून शाळासंबंधित अधिकारी व शिक्षकेतर कर्मचारी या सर्वावर बंधनकारक करण्यात यावी.

प्रज्ञा मनीष पंडित, ठाणे

loksatta@expressindia.com


सर्वोच्च स्थान दिल्याची खंत

$
0
0

‘एकेरीवर आलो ही चूकच’ ही बातमी (१३ जाने.) वाचली. श्रीपाल सबनीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एकेरी उल्लेख केला म्हणून अखेर दिलगिरी व्यक्त केली. आशा आहे की आता या प्रकरणावर पडदा पडेल. पण एकूण सगळे प्रकरण पाहता हे अध्यक्ष मराठी साहित्य रसिकांच्या मनातून उतरले असतील यात शंका नाही. आपल्या भाषणात त्यांनी अनेक आक्षेपार्ह विधाने केली.

‘तुमचा आरएसएसचा पंतप्रधान’, ‘सगळीकडे बोंबलत फिरतो’, ‘कलंकित मोदी माझ्या लायकीचा पंतप्रधान नाही’, ही भाषा कोणत्याही संवेदनशील मनाला रुचणारी नाही.

सर्वात गंभीर बाब म्हणजे समन्वयाची भाषा करणारे सबनीस आपल्या चुकीच्या विधानावर अडून बसले होते, एकेरी भाषेचे समर्थन करत होते. एवढा पढतमूर्ख पवित्रा आणि दांभिकपणा साहित्यविश्वाने प्रथमच पाहिला असावा. १२५ ते १३० पानांचे अध्यक्षीय भाषण आपण तयार केले आहे असे म्हणणारा साहित्यिक इतका भोंगळ आणि नेमकेपणा हरवलेला असेल याची कल्पना आता सर्वानाच आली असेल. अशा माणसाला आपण सर्वोच्च साहित्यस्थान दिले याची खंत आम्हाला सदैव वाटत राहणार.

अविनाश माजगावकर, पुणे.

 

मुख्यमंत्र्यांनी संमेलनाची शोभा वाढवावी

कबूल आहे की यंदाच्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे नवनिर्वाचित अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी पंतप्रधानांविषयी विनाकारण आक्षेपार्ह वक्तव्य केले आणि त्यानंतर जे झाले ते अखिल साहित्य विश्वाला लाजिरवाणे होते.  पण आता त्यांना उपरती झाली आहे आणि त्यांनी माफीनामा लिहून दिला आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी मनाचा मोठेपणा दाखवून श्रीपाल सबनीस यांच्याकडे लक्ष न देता साहित्यासाठी या संमेलनाला उपस्थित राहावे आणि या संमेलनाची शोभा वाढवावी. सबनीस यांच्यावर  राग आहे  हे स्वाभाविक आहे ; पण त्यांचा राग साहित्य संमेलनावर काढला तर ते  संमेलनावर अन्यायकारक ठरेल.

अनिरुद्ध गणेश बर्वे, कल्याण 

 

सूर्याचे कोणते राश्यांतर खरे मानायचे?

पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी ‘मकर संक्रांत आणि १४ जानेवारी यांचा काहीही संबंध नाही,’ असे म्हटले आहे आणि त्यांच्या या म्हणण्याच्या पुष्टय़र्थ त्यांनी सूर्यभ्रमणाचे सायन पद्धतीप्रमाणे होणारे राश्यांतरदेखील दिलेले आहे. याबद्दल कोणतेही दुमत असण्याचे कारण नाही.

प्रश्न असा आहे की, सूर्याचे सायन पद्धतीनुसार होणारे राश्यांतर खरे मानायचे की निरयन पद्धतीप्रमाणे होणारे? अवघे विश्व  एकच असताना एकाच सूर्याचे एकाच पृथ्वीवरून दोन वेगवेगळ्या पद्धतीनुसार गणले गेलेले राश्यांतर यांत जवळ जवळ २१ दिवसांचा फरक का असावा? पद्धती वेगवेगळ्या असल्या तरी सत्य हे सूर्य प्रकाशाइतकेच स्पष्ट असावे ना? कुठली पद्धत काय मानते याच्यापेक्षा प्रत्यक्ष सत्य परिस्थिती काय आहे हे महत्त्वाचे नाही का?

निरयन पद्धतीप्रमाणे माझ्या ३१ ऑगस्ट या जन्मतारखेस सूर्य सिंह राशीत आहे तर सायन पद्धतीप्रमाणे तो कन्या राशीत येतो. ज्योतिष या विद्य्ोच्या अभ्यासकांनी पत्रिकेचा अभ्यास करताना सिंहेच्या सूर्याचा आधार धरायचा का कन्येच्या सूर्याचा? असे इतर ग्रहांबाबतदेखील होऊ शकते आणि एकाच व्यक्तीचे भविष्य वेगवेगळ्या देशांत वेगवेगळ्या पद्धतीने बदलू शकते. ज्योतिष हे जर खगोलशास्त्रावर आधारित असेल तर जरी पद्धती वेगवेगळ्या असल्या तरी त्यातील पायाभूत नियम हे सर्वत्र सारखेच असले पाहिजेत. तरच ज्योतिष हे शास्त्र म्हणून मान्यता पावेल. नाही तर मग अंधश्रद्धा म्हणूनच त्यावर टीका होत राहणार.

प्रदीप अधिकारी, शिवाजी पार्क (मुंबई)

 

त्या १५१ आमदारांना शिक्षा का नाही?

मुख्यमंत्र्यांच्या ‘आदर्श ग्राम’ योजनेनुसार ३६२ आमदारांनी (विधानसभा २८८, विधानपरिषद ७४) १५/११/१५ पर्यंत प्रत्येकाने ३ खेडी दत्तक घेऊन जुलै २०१७ पर्यंत एका खेडय़ाचा विकास आणि जुलै २०१९ पर्यंत उरलेल्या दोन खेडय़ांचा विकास करून १०९८ गावे आदर्श गावे करण्याचे बंधन होते. त्यात फक्त २११ आमदारांनीच खेडय़ांची निवड केली, परंतु १५१ आमदारांनी (२४ मंत्र्यांसह) अद्याप एकही खेडेगाव निवडलेले नाही. ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे.

याचाच अर्थ हे सर्व १५१ आमदार सुखवस्तू कुटुंबातले, शहरातच जन्मून शहरातच वाढलेले दिसतात. देशात ९ लाख खेडी आहेत. त्यात ८० कोटी जनता नरकमय जीवन जगते, याची कल्पना (नॉलेज!) तरी या १५१ आमदारांना आहे काय?

अशा सर्व आमदारांची नावे पेपरमध्ये जाहीर करावीत. त्यांचे मासिक मानधन (पगार) बंद करावे, विधिमंडळातून निलंबित करावे म्हणजे पुढच्या निवडणुकीत त्यांना घरीच बसवणे मतदारांना सोपे होईल. सरकारचेही यात ९० टक्के चुकतेच. दर दोन महिन्यांनी निदान पाच खेडय़ांच्या भेटीची सक्ती जर सर्व आमदारांना सरकारने केली असती, तर त्यांची कर्तव्यबुद्धी जागी राहिली असती. २५-३० वर्षांपूर्वी कर्नाटकचे मुख्यमंत्री रामकृष्ण हेगडे यांनी हा प्रयोग केला होता व सर्व खेडी आदर्श बनली होती. मग महाराष्ट्र सरकार इतके नाकर्ते कसे?

अ‍ॅड. प्रभाकर कलशेट्टी, पुणे.

 

प्रा. रामनाथन यांचे अन्य संशोधनही मौलिक

‘व्यक्तिवेध’ सदरात प्रा. रामनाथन यांच्याविषयी लिहून (१२ जाने.) तुलनेने दुर्लक्षित पण महत्त्वपूर्ण अशा हवामानशास्त्रज्ञाची दखल घेतल्याबद्दल अभिनंदन.

प्रा. रामनाथन यांनी आणखी एका विषयात महत्त्वाचे संशोधन केले आहे. ते म्हणजे हवेतील धूलिकण आणि त्यांचा हवामानावरील, विशेषत: पावसावरील, परिणाम. ज्या मानवनिर्मित गोष्टींमुळे हवामानावर परिणाम होतो अशांपकी ज्याच्या परिणामाबद्दल सर्वात कमी माहिती आहे अशी ही बाब आहे. प्रा. रामनाथन यांनी दाखवून दिले आहे की, हवेतील धूलिकण वाढल्याने पावसाचे प्रमाण कमी होते. ज्वलनातून बाहेर पडणारे कार्बनचे धूलिकण हे पावसावर सर्वात जास्त प्रतिकूल परिणाम करतात. त्यांचे हे संशोधनही स्वच्छ ऊर्जा वापराची गरज अधोरेखित करते.

दीप्ती िहगमिरे, पुणे.

 

शिक्षा ठेवीदारांनाच

पेण नागरी सहकारी बँक बुडीत प्रकरणी  मुंबई हायकोर्टात चालू असलेल्या खटल्यात न्यायालयाने अत्यंत महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला आहे की संचालकांनी केलेल्या भ्रष्टाचाराची शिक्षा ठेवीदारांनी का भोगायची? सी क़े.पी.बँकेच्या आम्हा ठेवीदारांना सुद्धा हा प्रश्न भेडसावत आहे. कर्ज वाटपातील अनियमितता व  कर्ज वसूल करण्यात अपयशी ठरल्यामुळे रिझव्‍‌र्ह बँकेने या बँकेवर मे २०१४  पासून आíथक र्निबध घातले.  त्यामुळे लाखो ठेवीदारांच्या  ठेवी अडकून पडल्या.

मग  ठेवीदारांनी करायचे तरी काय ? ज्यांनी भ्रष्टाचार करून बँक  डबघाईला आणली ते मोकाट मस्त फिरत आहेत आणि  आम्ही शिक्षा भोगत आहोत.

अर्जुन पाटीलडोंबिवली.

 

निवडणूकपूर्व घोषणा गांभीर्याने घ्याव्यात?

पठाणकोट दहशतवादी हल्ल्याच्या पाश्र्वभूमीवर अनेक आणि काँग्रेसचे नेते हे सार्वत्रिक निवडणुकीपूर्वीच्या प्रचारात नरेंद्र मोदींनी पाकिस्तानविरोधात काढलेल्या वक्तव्यांची आठवण करून देत आहेत. मुळातच कमजोर अर्थव्यवस्था असणाऱ्या पाकिस्तानचा भारताविरोधात प्रत्यक्ष युद्धात कितपत निभाव लागणार हे पाकिस्तानसकट सर्व जगाला माहीत आहे. वास्तविक त्या निवडणुकीच्या काळात भ्रष्टाचार आणि पाककडून नियमितपणे होणारे शस्त्रसंधीचे उल्लंघन या दोन मुद्दय़ांवर जनमत कमालीचे तीव्र होते. मोदी यांच्या जागी दुसरा कोणीही असता तरी त्याने या मुद्दय़ांना हात घातलाच असता.

मात्र आता त्यानुसार  खरोखरच पाकिस्तानला धडा शिकवायचे ठरवले आणि भारताने आपल्या बाजूने काही आगळीक केली तर आंतरराष्ट्रीय स्तरावरील भारताच्या शांततावादी प्रतिमेला तडा जाऊ शकतो. तसेच त्याचा उद्योग-व्यापारातही फटका बसू शकतो. आंतरराष्ट्रीय स्तरावरील मुत्सद्देगिरी आणि राजकारण जनमताच्या िहदोळ्यांवर होऊ शकत नाही याची पुरेशी जाणीव पंतप्रधान मोदी आणि कंपूस असल्याने त्यांनी बाकी सर्व मागे सोडून देऊन आपल्या शपथग्रहणविधी सोहळ्यात पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांना आमंत्रित केले होते. त्यामुळे मोदी यांच्यातील एक प्रगल्भ राजकारणी साऱ्या जगाने पाहिला आहेच.

 

तीच बाब काळ्या पशांची.

त्याच निवडणुकीतील अन्य एका घोषणेनुसार परदेशात दडलेला काही भारतीयांचा काळा पसा तेथून आणून प्रत्येक मध्यमवर्गीय भारतीयाच्या बँक खात्यात १५ लाख रुपये जमा केले जाणार होते. या घोषणेतील फोलपणा विचारी जनांच्या तेव्हाच लक्षात आला असेल, कारण देशात काळ्या पशांविरोधात एवढा आगडोंब उसळला असताना कोण खातेधारक तेथे आपला पसा ठेवणार. एवढे करूनही जर सरकारच्या हाती काही पसा लागलाच असता तर त्याचे सामान्य माणसाच्या खात्यात हस्तांतरण होईपर्यंत १५ लाखांवरून १५०० रुपयांपर्यंत अवमूल्यन झाले असते, याबद्दल आपल्या कोणाच्याच मनात शंका नसणार. निवडणुकपूर्व केल्या गेलेल्या घोषणांना त्यानंतरच्या काळात गांभीर्याने घेतले जात नाही हे इतिहासात आजवर अनेकदा सिद्ध होऊनही या मंडळींना हे सर्व कळत नाही की कळूनही कळाल्याचे दाखवायचे नाही, हे कळावयास काही मार्ग नाही.

विराज भोसले, मानवत (परभणी)

loksatta@expressindia.com

चर्चेत नसणे, हे मोदींचे अपयश कसे?

$
0
0

‘पठाणकोटचे वास्तव’ या अग्रलेखाने (१२ जाने.) एकाच मुद्दय़ावर भर दिलेला आहे. तो म्हणजे ‘अफगाणिस्तान, पाकिस्तान, चीन आणि अमेरिकेने भारताला चच्रेतून खडय़ासारखे बाजूला केले व त्यामुळे जरी अमेरिकेने पाकिस्तानला पठाणकोट हल्ल्यातील दहशतवादी शोधून त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत दिलेली सूचना हा मोदी सरकारचा नतिक किंवा राजनतिक विजय आहे असे मानण्याचे कारण नाही.’ मात्र या स्थितीला अन्य कंगोरेही आहेत. अमेरिकेला अफगाणिस्तानात रशियाचा हस्तक्षेप पूर्वीही नको होता व आताही नको आहे. तसेच आता अफगाणिस्तानात तालिबानी नियंत्रणाबाहेर जाऊ नयेत यासाठी अमेरिका प्रयत्नशील आहे. त्या खटाटोपात अमेरिकेला रशियापेक्षा चीन अधिक विश्वासार्ह वाटतो (अर्थात हा विश्वास किती योग्य आहे हे काळच ठरवील). त्यात भारताने बरेच युद्धसाहित्य, विमाने, हेलिकॉप्टर्स रशियाकडून खरेदी करण्याचे ठरविले असल्याने अफगाणिस्तान प्रकरणी भारत रशियाच्या बाजूस झुकेल, अशी भीती अमेरिकेस वाटणे साहजिक आहे. म्हणून या चच्रेत भारतास बोलावू नये हे अमेरिकेचे धोरण असणार. याउलट पाकिस्तान हा अमेरिकन युद्धसामग्री घेणारा कायमचा व हक्काचा खरेदीदार आहे. त्या व्यवहारात चीनशी स्पर्धा नको व त्यात चीनला आघाडी मिळू नये हीदेखील अमेरिकेची इच्छा असणारच.

भारतद्वेषाच्या पूर्ततेसाठी पाक आपल्या भूमीचा वापर कोणासही करू देईल. भारताकडून तशी अपेक्षा पूर्ण होणार नाही हे अमेरिका व चीन जाणून आहेत.

अमेरिकेने पाकच्या भूमीवर जाऊन ओसामा बिन लादेनला मारले. त्यावर थोडी गुरगुर करण्यापलीकडे पाकने काही केले नाही. आवश्यकता भासल्यास अफगाणिस्तानात तशीच कारवाई करण्यासाठी चच्रेत सामील असलेल्या सर्वाची पूर्वसहमती असावी किंवा ऐन वेळी त्यांच्याकडून किमान विरोध तरी होऊ नये यासाठी आता चालू असलेल्या चच्रेत अमेरिका काही विशेष अटी अफगाणिस्तानवर लादेल. त्या तालिबान नेत्यांना आताच कळू नयेत यासाठी त्यांनाही या चच्रेस बोलाविलेले नाही. त्या अटींना पाकइतकीच चीनची सहमती मिळवून ठेवणे अमेरिकेस आवश्यक वाटणे गर नाही; कारण पाकच्या भूमीवर चीनने मध्यपूर्वेस जोडणाऱ्या कॉरिडॉरच्या रूपात भरपूर गुंतवणूक केलेली आहे व तिला धोका पोहोचू नये याबाबत चीन जागरूक असणारच.

याहून महत्त्वाचा मुद्दा म्हणजे चीनशी असलेली पाकची मत्री हा अमेरिकेच्याही वाढत्या चिंतेचा विषय आहे. म्हणून पाक व चीन यांच्यात काय शिजते आहे याची माहिती अमेरिकेस हवी आहे. त्यासाठी चीन चर्चेत हवा, असे अमेरिकेस वाटल्यास नवल नाही. अफगाणी तालिबानपासून भारताला काही धोका आहे वा नाही याबद्दल ते सर्वच देश बेफिकीर आहेत, त्यामुळे त्यांच्या मते या चतुष्पक्षीय चच्रेत भारताची आवश्यकता नसल्याचे स्पष्ट दिसते. उलट पाकिस्तानचे भौगोलिक स्थान व तालिबानसह इस्लामी अतिरेक्यांना मदत करण्याची पाकिस्तानी लष्कराची प्रवृत्ती यांमुळे पाकिस्तानची उपस्थिती या चच्रेत अनिवार्य आहे. पाकला नियंत्रणात ठेवण्यासाठी अमेरिकेला चीनची आवश्यकता वाटते हा चीनच्या कूटनीतीचा विजय आहे असे दिसते. त्यामुळे भारताने अफगाणिस्तानला केलेली मदत आणि पाकशी चालू ठेवलेली चर्चा यांना वरील चार देशांमध्ये होत असलेल्या चच्रेत काहीही किंमत नाही हे आपल्याला पक्के माहीत असावयास हवे. त्याबद्दल विषाद वाटून घेण्याचे काही कारण नाही.

पठाणकोट हल्ल्यातील अतिरेक्यांना शोधण्याची समज अमेरिकेने पाकला दिली हे मोदींच्या राजनीतीचे यश मानण्याची जशी गरज नाही तसेच वरील चच्रेतून भारताला वगळले हे त्यांचे अपयश मानण्याचीही गरज नाही. पाकसारखे उपद्रवमूल्य वा विधिनिषेधशून्यता भारताजवळ नाही, त्यामुळे या चच्रेत भारतास आमंत्रण नसणे हे क्रमप्राप्त आहे. तसे आमंत्रण द्यावे असे अमेरिकेने सुचविले असते तरी त्यास पाकिस्तान व चीन या दोघांनीही विरोधच केला असता. अशा स्थितीत अफगाण राष्ट्रप्रमुखांचा कल पाकिस्तानकडे आहे हे ज्ञात असताना आपण त्या देशावर मदतीच्या रूपात खर्च करावा काय, या मुद्दय़ावर धोरण ठरविणे मात्र गरजेचे आहे.

विवेक शिरवळकरठाणे 

 

पाकचे भविष्य घडविण्यास भारतच आधार!

पठाणकोट हल्ल्याच्या सूत्रधारांवर तत्पर कारवाई करा, असे भारताने अर्थात मोदी सरकारने बजावणे म्हणजे हतबुद्ध होऊन काँग्रेसच्याच हातातले मोडके-तोडके तुणतुणे नाइलाजाने हाती घेऊन वाजवण्याचा प्रकार म्हणावा लागेल. एखाद्या पलवानाने राणा भीमदेवी थाटात तुणतुणे गरागरा फिरवावे आणि मग त्याच्या लक्षात यावे की, ते धरावे कसे आणि वाजवावे कसे एवढी कुचंबणा मोदींच्या साहसी लाहोरभेटीने भाजप सरकारची करून ठेवली आहे. या साऱ्या प्रकारात शेंबडय़ा, अधिकृत पाक सरकारचे काहीही गेले नाही व जाणारही नाही कारण त्याच्या मर्यादा साऱ्या जगाला ठाऊक आहेत. भारताची पंचाईत अशी की, चच्रेने मार्ग काढावा म्हटले तर चर्चा या बुजगावण्याशीच करावी लागणार, तिकडे ‘आयएसआय’ आणि इतर संघटना त्यांना हवा तो धटिंगणपणा करणारच आणि भारतावर वेळोवेळी जे अतिरेकी हल्ले होतात त्यावर काही तोडगा निघत नाही म्हणून येथील जनतेचा रोषही पत्करावा लागणार. हीच अवस्था काँग्रेस सरकारची होती व आता भाजप सरकारची आहे.

पाकिस्तानचे अधिकृत सरकार व सूत्रसंचालक शक्ती ही दोन वेगळी केन्द्रे आहेत. त्यातील कोणत्या केन्द्रांवर निशाणा साधायचा हा भारतासाठी गोंधळाचाच मुद्दा राहिला आहे. अशी दोन वेगळी केन्द्रे असणे हा पाकिस्तानच्या कूटनीतीचाच भाग आहे व भारताला दहशतीखाली सतत वेठीस धरण्यासाठी अमेरिका, चीन या देशांचा पाकिस्तानही व्यवस्थित वापर करून घेत आला आहे. ही सर्व परिस्थिती सूर्यप्रकाशाइतकी स्वच्छ असताना झोके, गिरक्या घेत भेटीचे स्टंट करणे हे ना कूटनीतीचे लक्षण आहे ना बेधडक राजकारणाचे. या वेडय़ा साहसाला काँग्रेसजन तोंडाला जरी-सोनियाचा पदर लावून हसले असतील यात शंका नाही. म्हणजे भारतातील सरकार हे बोटचेपे, सुस्त, मतपेटय़ांचे राजकारण करणारे आहे की धडाडणारा तोफखाना आहे यावर हा गुंता सुटणार की नाही, हे अवलंबून नाही. याही वेळी, पठाणकोट हल्ल्याची कुरापत या ‘खानदानी गळाभेटी’नंतर काढली जाणारच यात कोणतेही गुपित नव्हते. बरे, यावर मातच करायची तर अधिकृत चर्चा पुढे रेटण्याला दुसरा पर्याय नाही त्यामुळे आपण या पठाणकोटी हल्ल्याच्या दहशतीला भीक घालत नाही हे दाखवून देणेही ओघाने आलेच. पुढील चर्चा या अधिक सावध राहून करणे आवश्यक ठरते. अशात पुन्हा एकदा ‘यू-टर्न’ घेत तातडीने संबंधितांवर कारवाई करा अन्यथा चर्चा पुढे जाणार नाहीत, असे म्हणणे म्हणजे स्वत:च परिस्थिती जैसे थे राहणार अशी व्यवस्था करून ठेवणे आहे. पाकिस्तानी अधिकृत सरकार जर अशी कारवाई आणि तीदेखील तातडीने करू धजला असता तर काय हवे होते? भारतात पाकिस्तानप्रमाणे दोन केन्द्रे नसूनही अशा कारवाईस किती काळ जातो हे सर्वश्रुत आहेच. तेव्हा, चर्चा सुरू ठेवण्यासाठी अशा अटी घालणे म्हणजे पॅराशूट वापरूनही तोंडावर पडण्यासारखे आहे. चर्चा मोठय़ा धीराने, धूर्तपणे सुरू ठेवताना युद्धजन्य परिस्थितीप्रमाणे सज्जता ठेवावी लागेल. जर या चर्चाचे फलित सकारात्मक होत गेले तर अतिरेकी कारवायांना अधिक चेव येईल, प्रसंगी टोकाचा निर्णय पाकिस्तानी आयएसआय घेईल. अधिकृत पाक सरकारचे महत्त्व वाढवत नेत, अतिरेकी तळ नेस्तनाबूत करण्यासाठी संयुक्त  कारवाईस पाक सरकारला तयार करावे लागेल. या संयुक्त कारवाईच्या निर्णयाने पाकच्या अधिकृत सरकारचे अधिष्ठान अधिक मजबूत होईल व निशाणा कोठे साधायचा याचा गोंधळ उडणार नाही.

सर्वप्रथम पाकच्या अधिकृत सरकारलाच त्यांच्या लष्कराच्या दहशतीतून मुक्त करणे गरजेचे आहे अन्यथा ना राहील अधिकृत सरकार आणि ना होतील कोणत्याही चर्चा. पाकिस्तानलाही या दहशती जोखडातून मुक्त व्हायचे आहे व भारतालाही. हाच धागा पकडून पाक लष्कराला त्याच्या मर्यादा दाखवून देणे आवश्यक आहे. त्यासाठी सूडाची, शत्रुत्वाची भावना सोडून पाक सरकारला आपल्या बाजूला वळवावे लागेल. पाकचे भविष्य घडविण्यात भारतच त्यांचा भक्कम आधार होऊ शकतो हे पाकिस्तानी सरकार व जनतेच्या मनावर ठसविणे ही नियतीने भारतावर टाकलेली मोठी जबाबदारी आहे. पाकचा जटिल गुंता याच मार्गाने सुटू शकतो.

सतीश पाठक, पुणे.    

 

खासगीविरोधाकडे दुर्लक्ष कराच, पण..

यूपीएससी शिष्यवृत्ती योजनेद्वारे, यूपीएससीतील मराठी टक्का वाढवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने अत्यंत योग्य असे पाऊल उचलले आहे. कारण मुख्य परीक्षा पास होऊन मुलाखतीपर्यंत पोहोचलेल्या परंतु अंतिम यादीत स्थान  न  मिळू शकणाऱ्या उमेदवारांची महाराष्ट्रातील संख्या मोठी आहे.  यापुढे अंतिम यादीत स्थान मिळविण्यासाठी दिल्लीच्या संस्थांची निश्चित पणे मोलाची मदत होईल. खासगी स्पर्धा परीक्षा संस्थांनी केलेल्या विरोधाकडे दुर्लक्षच केलेले  सध्या तरी योग्य ठरेल.

पुण्यातील खासगी  मार्गदर्शन संस्थांचा दर्जा जाणून घेण्यासाठी, पुण्यात यूपीएससी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे अभिप्राय नोंदवण्यासाठी व्यापक सर्वेक्षण शासनाने करावे! त्यातून ‘खरी परिस्थिती ’ शासनाच्या लक्षात येईल. याचबरोबर महाराष्ट्र  शासनाच्या भारतीय नागरी सेवापूर्व प्रशिक्षण संस्थामधील खालील उणीवांकडे  मी लक्ष  वेधू इच्छितो :

१)प्रशिक्षण कार्यक्रमात मुख्य परीक्षेच्या तयारीकडे होणारे दुर्लक्ष – जानेवारी ते ऑगस्ट या दरम्यान येथे फक्त पूर्व परीक्षेची तयारी चालते आणि ‘वैकल्पिक विषय ’  आणि लिखाणाची तयारी या बाबींकडे दुर्लक्ष केले जाते.

२)पूर्व  परीक्षा  (ऑगस्ट  ते ऑक्टोबर) ते पूर्व परीक्षा  निकाल  या कालावधीत येथे कोणत्याच प्रकार चा प्रशिक्षण कार्यक्रम राबवला जात नाही. हा दोन महीन्यांचा काळ परीक्षा तयारी साठी वास्तविक अत्यंत महत्त्वाचा  असतो.

३)निर्वाह भत्ता वेळेवर  न मिळणे,तज्ज्ञ प्रशिक्षकांची उपलब्धता,अध्यापनाचे तास आणि लिखाणाची तयारी या बाबींकडे तातडीने लक्ष घालणे गरजेचे आहे.

४) परीक्षेचे स्वरूप, त्यातील जीवघेणी स्पर्धा विद्यार्थ्यांच्या गरजा, परीक्षेविषयी दृष्टिकोन या मुद्दय़ांसंदर्भात येथील कर्मचारी वर्गाचे प्रबोधन होणे गरजेचे  आहे, जेणेकरून  विद्यार्थ्यांना सुविधा उपलब्ध  होताना, त्यांच्याकडून  अडथळे निर्माण होणार नाहीत.

५) विद्यार्थी क्षमता आणि प्रशिक्षण  केंद्रे वाढविणे गरजेचे; जेणेकरून, या संस्था खासगी संस्थांना पर्याय म्हणून उभ्या राहतील.

डॉ. कुणाल शंकर सोनवणे, भुवनेश्वर (तालुका रोहा, जि. रायगड)ु

 

विज्ञान-तंत्रज्ञान संस्थांचे भले आता आपल्या सरकारनेच करावे

‘विज्ञान-तंत्रज्ञान संस्थांपुढील आव्हाने’ हा लेख (८ जाने.) वाचला. भारताची आर्थिक स्थिती अशी नाही की विज्ञान-तंत्रज्ञान शिक्षणावर हवा तेवढा खर्च सरकारला करता येईल, पण सर्वप्रथम आपल्या विज्ञान-तंत्रज्ञान संस्थांकडून आपल्या अपेक्षा काय आहेत हे नि:संदिग्धपणे सांगितले गेले पाहिजे. त्यातील काहींचा स्तर जर जागतिक दर्जाच्या संस्थांशी बरोबरी करण्याचा अपेक्षित आहे तर उर्वरित संस्था त्यामागे फरफटत जाण्याचे कारण नाही, पण राष्ट्रीय तंत्रज्ञान नियामक मंडळ तसे सांगत नाही. त्यांना ‘सब घोडे बराबर’ हेच सांगायचे आहे. फक्त २ टक्केवाल्यांना चांगले जागतिक दर्जाचे शिक्षण देऊ, अन्यांना कमी स्तराचे हे सांगण्याची त्यांची नीती नाही.

दुसऱ्या बाजूला प्राध्यापकांना प्रमोशनकरिता त्यांचे शोधकार्य कोणत्या जागतिक दर्जाच्या मासिकात प्रसिद्ध झाले, त्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर किती ‘रेफर’ केले गेले हे जाणूनच मग त्यांच्या प्रमोशनचा विचार करतात. तो बिचारा मग व्यक्तिगत प्रगतीच्या दिशेने वळतो. ते मग सोहोनीच्या भाषेतील, भारतीय संदर्भातील कुतूहल विज्ञानच असते. त्याचा साधारणपणे भारताला उपयोग करण्याची स्थिती नाही. आपण जे थोडे पैसे अशा संस्थांत खर्च करतो व त्यातून मग जे निर्माण होते ते विज्ञान प्रगत देशांना आपसूक फुकटात वापरायला मिळते. याला फक्त तीन मुख्य अपवाद आहेत. ती क्षेत्रे आहेत अणू, अवकाश व सामरिक विज्ञान व तंत्रज्ञान. याला आवश्यक ज्ञान जगात आपल्याला पैसे मोजूनही मिळत नाही. त्यामुळे ते भारतातच तयार व्हावे म्हणून सरकार पुरेसा पैसा खर्च करते. अनेक विद्यापीठात मोजके प्राध्यापक या संबंधित कार्य करून त्याला हातभार अवश्य लावतात. हाच खरे तर काही प्राध्यापकांचा राष्ट्र उभारणीतील सहभाग. असा प्राध्यापक एक-दोन प्रतिशत असेल.

उर्वरित जवळपास बहुतांशी प्राध्यापकांना कोणताही उद्योग साधारणपणे जवळ करीत नाही. एकतर या खासगी उद्योगांना जमल्यास फुकट किंवा अत्यंत कमी पैशात नवीन विज्ञान-तंत्रज्ञान हवे असते. वर ते ‘फूल-प्रूफ-टेस्टेड’ म्हणजे ‘गॅरंटीड’ असे हवे असते. हा माझ्या क्षेत्रातील प्रत्यक्ष अनुभव आहे.

मुळात हे लक्षात घेतले पाहिजे की एकेकाळी भारतीय बनावटीच्या धातूच्या, सिरॅमिक्सच्या, चामडय़ाच्या, कापडाच्या इत्यादी वस्तू आंतरराष्ट्रीय बाजारात अग्रक्रमाने विकल्या जायच्या. तेव्हा आंतरराष्ट्रीय बाजारात भारताचा एक-चतुर्थाश हिस्सा होता. त्या प्रदीर्घ कालखंडातून येथे एक व्यापारी जमातच उदयाला आली, ज्यांना आपण बनिया किंवा वैश्य म्हणतो. त्यांनी पैसे मिळवूनही व ती मिळवण्याच्या जिद्दीतूनही पाश्चात्यांप्रमाणे भारतात औद्योगिक क्रांती केल्याचा इतिहास नाही. कारण त्यातून येथे व्यापारीच जन्माला आले उद्योजक नाही. या दोन्हींच्या मनोवृत्तीत एक मूलभूत फरक आहे.  मात्र पाश्चात्यांनी व्यापारातूनच पुढे उद्योजक निर्माण केले, हाही इतिहास आहे.

त्यामुळेच पाश्चात्यांची अनेक विद्यापीठे दरवर्षी नवीन प्रॉडक्टस्, विधी किंवा डिझाइन्स शोधून नवी उत्पादने बाजारात आणतात. आपण झटपट उत्पादनाकरिता स्वातंत्र्योत्तर काळात तंत्रज्ञान विकत घेण्यावर जो भर दिला त्याने आपली सृजनशीलता पुरेशी मारली गेली. त्यातच आपल्या समाजवादी दृष्टीमुळे, सर्वाना फारसे काही करता एक तारखेच्या पगाराची शाश्वती  देण्याकडे कल राहिला. बुद्धिमत्ता हा ब्राह्मणी निकष म्हणून त्याला नाकारण्यात आले. कर्तृत्वाला डावलण्याचे अनेक मार्ग आपण शोधून काढून ते क्रियान्वित केले. असल्या अत्यंत जटिल सामाजिक अवस्थेत सृजन, नावीन्याची ओढ इत्यादी सर्व शिक्षण संशोधन संस्थांत पहावयास मिळते.

आता एवढी सर्व आव्हाने पेलण्याची शक्ती फार कोण्या विज्ञान-तंत्रज्ञान संस्थांत शिल्लक नाही. या संस्थांतून काही उपयुक्त निर्माण होण्याची प्रक्रिया फार जटिल झाली आहे. ही कोंडी कोणी कशी व कोठून फोडावी हे कळेनासे झाले आहे. अर्थात यात सरकारचीच जबाबदारी अधिक. त्यांनीच अग्रक्रमाने काही केले तर होईल.

रामचंद्र ह. तुपकरी, नागपूर

 

मध्यमवर्गालाही चटके

‘अल्पबचतीवरील व्याजदरात घट’ हे वृत्त (लोकसत्ता, १४ जानेवारी) वाचले. अल्पबचत योजनातील गरीब आणि निवृत्तांची गुंतवणूक वाढत्या महागाईला तोंड देत कराव्या लागणाऱ्या स्वत:च्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी असते. वातानुकूलित कार्यालयातील सुदैवी कर्मचारी यांच्याव्यतिरिक्त वाढणारा महागाई भत्ता निर्देशांक आणि वेतन आयोग यांसारख्या संकल्पनांशी दूरान्वयानेही संबंध नसलेला लोकसंख्येचा एक मोठा हिस्सा देशात आहे, याचे भान या सरकारला नाही हे स्पष्ट दिसत आहे. आधी कामगार कायद्यातला बदल, भूसंपादन कायद्यातला प्रस्तावित बदल आणि आता संस्थेच्या इमारतींच्या पुनर्वकिासासाठी बांधकाम व्यावसायिकांना मिळालेले सर्वाधिकाराचे कोलीत!  बनिया वृत्तीच्या उद्योगपती, बिल्डर लॉबी आणि शासकीय नोकरदार यांच्यासाठी ‘अच्छे दिन’ असा सरकारचा प्रयत्न यातून दिसतो.

आता तर आपल्या कष्टसाध्य मिळकतीच्या व्याजावर दिवस ढकलणारा ज्येष्ठ नागरिक यांनाही सरकारच्या या भूमिकेचे चटके बसू लागले आहेत. आतापर्यंत सुपात असलेला कनिष्ठ मध्यमवर्गही आता जात्यात यायला सुरुवात झाली आहे. या वर्गाने आता आपल्या डबक्यातून बाहेर पडण्याची आणि वेळीच जागे होण्याची गरज आहे.

प्रमोद तावडे, डोंबिवली 

 

चैत्रा वाघीण त्याच दिवशी माघारी येते?

‘व्यथा ‘वैशाख’ विरहाची’ हा अन्वयार्थ (१४ जाने.) वाचला. एखाद्या तांत्रिक गोष्टीविषयी तिचे वैज्ञानिक पलू हलके होऊ न देता, हृदयाला स्पर्श करेल असे लिखाण साहित्यकाराकडूनच घडू शकेल. वनाधिकाऱ्याला कदाचित ते झेपणार नाही. आदरणीय व्यंकटेश माडगूळकर एकेकाळी नागझिऱ्याला जाऊन आले, एक अप्रतिम पुस्तक ‘नागझिरा’ नावानेच घडून गेले. या पुस्तकात वाघाचा उल्लेख क्वचितच असेल, परंतु संपूर्ण अरण्यजीवन त्यांच्या लेखणीने जिवंत केले होते.

मी सेवानिवृत्त होण्याअगोदर एकदा िपजऱ्यातून एक बिबटय़ा पळून गेला. चूक उघड होती; परंतु अनवधानाने घडलेली होती. चौकशीदरम्यान असे निदर्शनास आले की, हा नर बिबटय़ा रोज रात्री िपजऱ्याबाहेर येऊन प्रणयाराधन(?) करीत होता. जेव्हा पत्रकारांनी आम्हाला घेरण्याचा प्रयत्न केला, मी सहज बोललो ‘आजतक दो प्रेमियों को कोई सलाखों  में  कैद कर सका है क्या?’ वातावरण एकदम हलके झाले. ते लोक पुढे कोणताही प्रश्न न विचारता हसत-हसत निघून गेले!

शब्दांची किमया वेगळीच असते. परंतु पर्यावरण, वनसंरक्षणाविषयी एवढा गाजावाजा करूनही वनांमध्ये खरे साहित्यकारांना आम्ही आकर्षति नाही करू शकलो. जे येतात, ते फक्त  वाघाच्या नादी लागणारे. त्याची व्यथा न समजता त्यास चिडवणारे आणि वनपर्यटनाला निव्वळ विरंगुळा समजणारे. वनजीवन किती सहज आहे, कसे सार्वभौम आहे, हे खरे तर संवेदनशील साहित्यिकाच्या लेखणीतूनच कळू शकेल.

तशी संवेदनशीलता ‘अन्वयार्थ’मध्ये होती, मात्र एका मुद्दय़ावर मतभेद असू शकतो.  वाघाचे जीवन म्हणजे एक मोहीमच असते. भक्ष्याच्या तसेच जोडीदाराच्या शोधात आणि जीवनातील ‘शांतते’करिता ८० काय, शे-दोनशे, पाचशे-हजार कि.मी.चे अंतरही वाघ कापेल.. तो जाऊन कुठे स्थिरावेल, कुणास ठाऊक! परंतु चत्रा ‘दररोज ८० किमीचा पल्ला गाठून’ वैशाखला भेटण्याचा प्रयत्न करते आणि वैशाखच्या बाहेरख्यालीने कंटाळून ‘त्याच दिवशी माहेरघरी परतते’, हे जरा अतिशयोक्त वाटते.

श्यामसुंदर मिश्र, भारतीय वन सेवा (सेवानिवृत्त)

 

,३३,००० कोटी रु. विरून कसे गेले?

माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांचे ‘इंडियन एक्सप्रेस’ व  ‘लोकसत्ता ’मध्ये प्रकाशित होणारे लेख वाचले. आज आंतरराष्ट्रीय बाजारात प्रचलित असलेल्या तेलाच्या किमतीत उत्पादन खर्चही भरून निघू शकत नाही याची सर्वानाच जाणीव आहे, पण तरीही या किमती इतक्या कमी का? आणि त्या अजून किती काळ  कमी राहतील हेही सांगणे अवघड आहे.  मात्र, या दरम्यान रुपया-डॉलर विनिमय दर बदलल्यामुळे आयात मूल्यावर होणाऱ्या परिणामाविषयी चिदंबरम यांनी  मौन बाळगले आहे. अर्थात, कोणाच्याही चष्म्यातून पाहिले तरी वस्तुस्थिती बदलणार नाही. भारतात पेट्रोल, डिझेलच्या किंमती कमी झालेल्या आहेत आणि  आयात मूल्य कमी झाले आहे, मूल्यवान परकीय चलनाची बचत होत आहे, भारताचा तेलाच्या आयातीवर होणारा खर्च कमी झालेला आहे. ही बचत गेल्या वर्षभरात  नेमकी २,३३,००० कोटी रु.आहे की  १,४०,००० कोटी  रु., यावर चर्चा /वाद होऊ शकतील पण बचत झाली हे कोणीही नाकारू शकत नाही.

आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा या वाचलेल्या पशाचे लोकांनी काय केले? आणि सरकाने काय केले? आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमती कमी होत असताना भारतात त्या कमी केल्या नसत्या व ती रक्कम सरकारच्या तिजोरीत कर म्हणून जमा केली असती तर  ही बचत वास्तव स्वरूपात सरकारच्या हातात आली असती आणि तिचा विनियोग करता आला असता.  पण हा पर्याय  पी. चिदंबरम, काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांनी स्वीकारला असता का? या वाचलेल्या पशातून वित्तीय तूट कमी करता आली असती;  पायाभूत सोयी सुविधा निर्माण करता आल्या असत्या. आजकाल याच पायाभूत सुविधा क्षेत्रात काम करणाऱ्या कंपन्यांची कर्जे वाढत चालली आहेत त्यांची पुनर्रचना करता आली असती, उपयुक्त सबसिडी वाढवता आली असती, शिक्षण, आरोग्य, प्रदूषण निवारण आदी आवश्यक योजनांवरील खर्च वाढवता आला असता.  अर्थात यासाठी विरोधकांची पर्वा न करता घेतल्या जाणाऱ्या कठोर निर्णयांची गरज आहे.

व्यापारी बँकांनी थकीत कर्ज बुडीत  होत असताना काही रकमेची तरतूद करण्याची पद्धत आहे, तसेच किमती कमी होत असताना अनपेक्षित लाभ निर्माण होत असतील तर काही प्रमाणात ही रक्कम बाजूला काढून केवळ कागदोपत्री दिसणारी ही बचत वास्तव स्वरूपात  उत्पादक कार्यासाठी वापरता यावी, अशी पद्धत का आणू नये?

शिशीर सिंदेकर,नासिक.

गरीब व मध्यमवर्गीयांच्या क्रयशक्तीवरच गदा

$
0
0

‘बिनलाभाचे घबाड’ हा लेख (१२ जाने.) व ‘राम कारे म्हणाना..!’ हा अग्रलेख (१५ जाने.)  वाचला. कच्च्या तेलाच्या किमती मागील दहा वर्षांच्या तळाला जाऊन पोहोचल्या, मात्र त्याचा लाभ सध्या तरी सर्वसामान्य लोकांपर्यंत पोचविण्यात सरकारला अपयश आल्याचे स्पष्टपणे जाणवते. तेल दरातील घसरणीचा लाभ विमान प्रवास करणाऱ्या मूठभर श्रीमंतांना मिळाला, मात्र बसने प्रवास करणारे बहुसंख्य या लाभापासून वंचित राहिले. देशात इंधनाच्या किमती कमी झाल्या, मात्र प्रमाण अगदीच नगण्य आहे. जागतिक बाजारात मंदीची अवस्था असल्याने आपल्या निर्यातीवर त्याचा प्रतिकूल परिणाम होणार हे नक्की. अशा परिस्थितीत सरकारने स्वदेशी लोकांची क्रयशक्ती वाढविणे अपेक्षित आहे. त्यामुळे आपल्या उत्पादनास आपल्या देशात तरी मागणी राहील व संभाव्य नुकसान टाळता येईल. त्यासाठी सरकारने पेट्रोल, डिझेलच्या दरांत त्याच प्रमाणात घट केली असती तर वाहतूक खर्च कमी होऊन वस्तूंच्या किमती कमी झाल्या असत्या. त्यामुळे औद्योगिक क्षेत्रास प्रोत्साहन मिळाले असते व या क्षेत्रातील २०१ पासूनची सर्वात मोठी घसरण टाळता आली असती. पी. चिदम्बरम यांच्या मते सरकारला तेल दरात घट झाल्याने अंदाजे २ लाख ३३ हजार कोटी रुपयांचे घबाड मिळाले, मात्र ते बिनलाभाचे ठरले. कच्च्या तेलाच्या दरातील ही घट कायमस्वरूपी नाही हे आपल्याला माहीत आहेच. आज ना उद्या हे दर पूर्वीच्या उच्च पातळीस जातील. दरम्यान सरकारने तेलाची साठवण करण्यासाठी या घबाडाचा वापर केला असेल तर बरे. त्यामुळे पुढे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर वाढले तरी देशांतर्गत इंधनाच्या किमती दीर्घकालावधीसाठी सध्याच्या पातळीस स्थिर ठेवून त्याचा लाभ जनतेपर्यंत पोहोचविता येईल. मात्र आपली एवढय़ा तेलाची साठवण करण्याची क्षमता आहे की नाही याबाबत शंका आहे.

दुसऱ्या बाजूस मोदी सरकारने वित्तीय तूट कमी करण्यासाठी सरकारी खर्चास कात्री लावली. जन धन खाते, अपघाती विमा यांसारख्या योजना आणून अत्यंत चलाखीने गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबांकडून अब्जावधी रुपये सरकारी तिजोरीकडे वळविले व त्यांची क्रयशक्ती कमी केली. खरे तर योजना श्रीमंत व अतिश्रीमंत लोकांचे पसे काढून घेणाऱ्या असाव्यात. कारण अर्थशास्त्रीय सिद्धांतानुसार त्यांची मागणी अलवचीक असते.

प्रा. दिनेश जोशी, लातूर     

 

रामबाण उपाय!

‘राम कारे म्हणाना..!’ हा अग्रलेख (१५ जाने.) वाचला. संघ परिवाराने हा सल्ला ‘शब्द’श अमलात आणण्याचे यापूर्वीच मनावर घेतले आहे.

‘‘मोदी यांच्या आधीचे मनमोहन सरकार धोरणलकव्याने ग्रस्त होते. मोदी सरकारला त्याची बाधा अद्याप तरी झालेली नाही. परंतु म्हणून ते धडधाकट असल्यासारखेही वागत नाही.’’ हे सरकार असे सुकाणूविरहित आणि प्रवाहपतित होऊन वाहवत आणि फरफटत जात चालले आहे असे दिसते.

केवळ धार्मिक अजेंडा अमलात आणणे हाच संघ परिवाराचा अंतस्थ हेतू असावा. आíथक सुधारणा, काळा पसा हा निवडणूक मुखवटा तोंडदेखला आणि मतदारांना केवळ भुरळ पाडणे या एकमेव उद्देशाने घेतला असावा अन्यथा आíथक प्रश्नाबाबत तपशीलवार अभ्यास करून ठोस आणि व्यावहारिक कार्यक्रम राबविला असता. पूर्वतयारी न करणे हे भूसंपादन किंवा जीएसटी अशा महत्त्वाच्या प्रश्नीसुद्धा उघड झाले आहे.

त्यामुळे राम मंदिर उभारणी हा एकमेव तरणोपाय  शिल्लक राहिलेला असावा. मला वाटते की, राम अशी काही एक संकल्पना खरोखरच अस्तित्वात आहे, मंदिर बांधून त्यास प्रसन्न केले की भारताच्या सर्व समस्या दूर होतील, सुदाम्याचे दारिद्रय़ चुटकीसरशी दूर केले हे वास्तव असल्याचे या अध्र्वयूना मनापासून वाटत असावे. अशी मनोभूमिका असेल तर आíथक कार्यक्रम,  ‘सुधारणांना हात घालण्याची िहमत’ याची आवश्यकताच वाटत नसेल.

राजीव जोशी, नेरळ.

 

ज्येष्ठांसाठी वैद्यकीय खर्च कायदा आवश्यकच

‘वैद्यकीय खर्चाला कायद्याचा वचक’ ही बातमी (१५ जाने.) वाचली. खर्च नियंत्रण कायदा ज्येष्ठ नागरिकांसाठी त्वरित होणे आवश्यक आहे.

बातमीत कॉर्पोरेट कंपन्यांनी सामाजिक जबाबदारी म्हणून नफ्याच्या २% रक्कम द्यावी असे नमूद आहे. ती तर त्यांनी द्यावीच, पण औषधी कंपन्यांनी तर त्यांच्या नफ्याच्या १०% रक्कम द्यावी.

शस्त्रक्रियेचा व औषधपाण्याचा खर्च एवढा प्रचंड आहे की, ज्या ज्येष्ठ नागरिकांना निवृत्तिवेतन नाही त्याना तो परवडत नाही. अ‍ॅँजिओप्लास्टी चा खर्च ३ लाख येतो. त्यानंतर घ्याव्या लागणाऱ्या औषधांचा खर्च प्रचंड असतो. उदा. “Ticaglore Brilinto” नावाची गोळी ७०० रुपयांना १४ या भावात मिळते. अशी उदाहरणे अनेक देता येतील. म्हणूनच वरील कायद्यात औषधपाण्याचा खर्च कसा कमी करता येईल याचा विचार करावा ज्येष्ठ नागरिकांसाठी हे फार आवश्यक आहे.

म. न. ढोकळे, डोंबिवली

 

योग-याग-विधी, येणे नोहे सिद्धी..

सध्या धार्मिक विधींचे स्तोम वाढत आहे. देवळातील पुजारी, पुरोहित इत्यादींना याचा लाभ होतो. म्हणून ते अशा विधींचा धूर्तपणे प्रचार करीत असतात. याग म्हणजे होम-हवन. विधी म्हणजे अभिषेक, एकादशी, लघुरुद्र, सत्यनारायण इ. कर्मकांडे. यांतील कुठल्याही विधीमुळे कुणाचे काहीही भले होत नाही. ‘योग-याग-विधी। येणे नोहे सिद्धी।’ असे हरिपाठाच्या अभंगात ज्ञानेश्वरांनी म्हटले आहे. तुमचे हजारभर रुपये व्यर्थ खर्च होतात. माणसाच्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांचा आणि अशा विधींचा काहीही कारण-परिणाम संबंध (कार्य-कारण भाव) नसतो. ‘मी देवासाठी काही तरी केले. आता देव माझे भले करील,’ असे मानीव समाधान मिळते एवढेच. काही भाविक म्हणतात, ‘देवच आपल्याला सर्व काही देतो. मग त्याच्यासाठी थोडा खर्च केला तर काय बिघडले?’ तुमच्या खिशातील पसे भटजींच्या खिशात गेले म्हणजे देवाला मिळाले का? मंदिरात अवश्य जावे. पेटीत पाच/ दहा रु. टाकावे. पण आपली श्रमा-घामाची कमाई उगीच वाया घालवू नये. त्या पशांचा उपयोग कुटुंबासाठी, मुलाबाळांसाठी, गरिबांच्या मदतीसाठी करावा. सत्कारणी लावावा. असे विधी केले नाहीत तर काय होईल? काही वाईट होणार नाही. तुमचे हजार-बाराशे रुपये वाचतील. स्वबुद्धीने विचार करावा.

प्रा. य. ना. वालावलकर

loksatta@expressindia.com

साहित्य संमेलनांची चुकलेली वाट..

$
0
0

‘उरुसाची उपयुक्तता’ हा अग्रलेख (१६ जाने.) वाचला. आपल्या शनिवारच्या संपादकीयाचा विषय प्रासंगिक आहे. पण एकूण त्याचे वर्तमान स्वरूप ध्यानात घेतले तर सन १८७८ पासून सुरू झालेले हे साहित्यिक आणि साहित्यप्रेमी यांना एकत्र आणणारे वार्षकि संमेलन आपली वाट चुकले आहे हीच वस्तुस्थिती आहे. प्रसंगी त्याचे प्रयोजन तरी राहिले काय असा प्रश्न पडावा अशी परिस्थिती गेल्या काही वर्षांत निर्माण झाली आहे. ती चिंतनीय आणि चिंताजनकसुद्धा आहे. स्वातंत्र्यपूर्व काळातील १९३८चे मुंबई येथील संमेलन, जे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या अध्यक्षतेखाली झाले होते ते, १९४२चे प्रल्हाद केशव अत्रे अध्यक्ष लाभलेले संमेलन असो कीमग वि. स. खांडेकरांचे.. तो तत्कालाशी सुसंगत इतिहास झाला.
आत्माराम रावजी देशपांडे, गदिमा, गो. नी. दांडेकर, गंगाधर गाडगीळ, राम शेवाळकर, शांता शेळके अध्यक्ष असलेली आणि गेल्या सहस्रकाच्या शेवटच्या पाच दशकांमध्ये झालेली इतर संमेलने साहित्याधारित होती. राजकीयदृष्टय़ा सशक्त सकारार्थी कारणासाठी गाजले ते १९७५चे आणीबाणी काळातील साहित्य संमेलन. स्थळ- कराड. अध्यक्षा- दुर्गा भागवत. पाश्र्वभूमी : वैचारिक मुस्कटबाजीची. ते होते खरे विचारमंथन. साहित्यातील विद्रोहीपण. दस्तुरखुद यशवंतराव चव्हाण (जे स्वत: साहित्यप्रेमी राजकारणी) यांच्या समक्ष दुर्गाबाई यांनी खणखणीत शब्दांत सरकारचा विरोध केला. कारावाससुद्धा भोगला. पद्मश्री, ज्ञानपीठसारखे पुरस्कार नाकारून सत्त्वशीलता प्रकट केली.
नाही तर आजचे आमचे मधे साहित्यसम्राट पाहा. साखरसम्राट, शिक्षणसम्राट यांच्या प्रायोजकत्वापायी कसे सत्त्वहीन वाटतात. मुदलात काही विचार गाठीशी नसताना आव आणून राज्यकर्त्यांवर बरळून नंतर कान धरायचे. शिवाय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद बाटवायचे. गणेशोत्सवापासून साहित्याच्या उरुसापर्यंत राजकीय मंडळींची मदत हा समाज घेत राहिला तर ती एक शोकांतिका ठरेल.
– गजानन उखळकर, अकोला
सबनीस गुरुजींचा सत्यनारायण!
श्रीपाल सबनीस यांचे भाषण (छापील नव्हे) ऐकणे म्हणजे कानांना आणि मेंदूला शिक्षाच होती. संध्येच्या सुरुवातीला चोवीस नावे घेतात तशी संबोधनात मंचावरील व मंडपात उपस्थित असलेल्या व नसलेल्या मान्यवरांची नावे घेण्यात नमनाला अर्धा घडा तेल खर्च झाले. नंतर भूतकाळातील महापुरुषांची सहस्र नामावली आणि सर्वमान्य विचारांची तुळशीपत्रे वाहून स्वत:च्या विचारांचा लंगडा बाळकृष्ण पूर्णपणे झाकण्यात सबनीस गुरुजी खणखणीत आवाजाने यशस्वी ठरले.
– गजानन गुर्जरपाध्ये, दहिसर (मुंबई)

साहित्यिकांनी सत्याला सामोरे गेले पाहिजे
साहित्य संमेलनाध्यक्ष श्रीपाल सबनीस यांच्या अध्यक्षीय भाषणाबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो. अत्यंत समर्थपणे अनेक ऐतिहासिक आणि वाङ्मयीन दाखले देत त्यांनी महाराष्ट्राच्या मानवी मूल्याधिष्ठित परंपरेचा उद्घोष केला. आपला देश सहिष्णू आहे असे म्हणत असताना आपण असहिष्णू हसक घटनांचा निषेधही केलाच पाहिजे हे त्यांनी अधोरेखित केले. चातुर्वर्णाच्या असहिष्णू प्रथेवर बोट ठेवीत इतर अनेक विचारप्रवर्तक प्रश्न ज्वलंत शैलीत उपस्थित केले. अध्यक्षांनी बुद्ध-महावीर-गांधींच्या शिकवणीचे जे माहात्म्य सांगितले ते कधी तरी जगाच्या किंवा किमान भारतातील सत्ताधाऱ्यांच्या गळी उतरेल का, हा मात्र एक कळीचा प्रश्न आहे! साहित्यिकांनी निर्मिती करीत असताना कशाचीही भीड न बाळगता सत्याला सदैव सामोरे गेले पाहिजे, हे मात्र निश्चित !
– सुकुमार शिदोरे, पुणे
मराठी भाषेच्या नावानं चांगभलं!
‘उरुसाची उपयुक्तता’ या अग्रलेखातून साहित्याच्या उत्सवाचा उरूस झालेल्या अतिखर्चीक मराठी साहित्य संमेलनाच्या उपयुक्ततेची यथायोग्य चिरफाड केली आहे. खरं तर शालेय जीवनात मराठी भाषेच्या झालेल्या सुसंस्कारांमधून व तेथे भेटलेल्या वि. स. खांडेकर, कुसुमाग्रज, आचार्य अत्रे, पु. ल. देशपांडे अशा अनेक थोर साहित्यिकांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले असल्याने मराठी साहित्य संमेलन म्हणजे पवित्र्याने भारलेला साहित्याचा आणि साहित्यिकांचा अमृतसोहळा अशी भावना आणि प्रतिमा मराठी साहित्य संमेलनाविषयी प्रत्येक मराठी साहित्यरसिकांच्या मनात वर्षांनुवष्रे कोरलेली आहे; परंतु साहित्यबाह्य़ समाजघटकांनी विशेषत: राजकारण्यांनी गेल्या दहा-पंधरा वर्षांपासून संमेलनाच्या आयोजकत्वाच्या आणि प्रायोजकत्वाच्या नावाने साहित्याच्या या मेळ्यात चंचुप्रवेश केल्यापासून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वरूप हे अखिल भारतीय मराठी साहित्यबाह्य़ ‘चमको’ लोकांचे स्नेहसंमेलन असे झाले आहे. अतिखर्चीक ठरलेले ८९वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे त्याचेच दृश्य परिणाम आहे. मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनात गेल्या पाच वर्षांत मिळून जेवढा खर्च झाला नसेल तेवढा खर्च या एका िपपरी-चिंचवडच्या आयोजनात झाल्याचे सकृद्दर्शनी दिसत आहे. याला कालाय तस्म नम: म्हणावे की मराठी भाषेच्या नावानं चांगभलं हे ज्याचे त्यांनी ठरवावे.
-प्रदीप शंकर मोरे, अंधेरी (मुंबई)
मरण नोकरदार मध्यमवर्गाचेच!
‘अल्पबचतीवरील व्याज दरात घट’ ही बातमी (१४ जाने.) वाचली. प्रचंड प्रमाणात वाढलेली महागाई, जीवनावश्यक वस्तूंचे गगनाला भिडलेले भाव आणि तेवढय़ाच वेगाने खाली येणारे गुंतवणुकीवरच्या व्याजाचे दर यामुळे मध्यमवर्गीयच नव्हे तर, उच्च मध्यमवर्गीयही मेटाकुटीला आला आहे. मुदत ठेवींवरील कमी झालेले व्याज दर आणि त्यात भर म्हणून की काय, रिकरिंग डिपॉझिटवरील व्याज १० हजारांवर गेल्यास प्राप्तिकर कापला जातो. म्हणजे मध्यमवर्गाची ही सर्व बाजूंनी चालवलेली कोंडी आणि पिळवणूक आहे. ज्या प्रमाणात महागाई वाढते आहे, त्या प्रमाणात आयकरातून मिळणारी सूट वर्षांनुवष्रे तितकीच आहे आणि तिच्यात भरीव वाढ होताना दिसत नाही. म्हणजे, पगारदाराला आपला पगार लपवता येत नसल्यामुळे त्याची यातून सुटका नाही. उद्योगपती आणि व्यावसायिक त्यांचे उत्पन्न जेवढे दाखवतील तितकेच ग्राह्य़ धरले जाते. झोपडपट्टीवासीयांनाही सर्व सुविधा मोफत उपलब्ध असतात. त्यामुळे मरण नोकरदार मध्यमवर्गाचेच होते!
– उज्ज्वला सूर्यवंशी, ठाणे
सेन्सॉर बोर्ड बरखास्त केलेलेच बरे
चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी प्रमाणपत्र देणे हे चित्रपट प्रमाणन मंडळाचे (सेन्सॉर) काम आहे; चित्रपटावर आक्षेप घेत त्यावर बंदी आणणे आणि कात्री लावणे हे नव्हे, असे ज्येष्ठ दिग्दर्शक श्याम बेनेगल यांनी स्पष्ट केले आहे. त्यांना नेमके काय अभिप्रेत आहे? चित्रपटाची पटकथा, दिग्दर्शन, अभिनय, छायालेखन, ध्वनियोजना, प्रकाशयोजना, कलादिग्दर्शन, पाश्र्वगायन, संगीत दिग्दर्शन ही अंगे बारकाईने तपासून त्याला प्रमाणपत्र दिले जावे, इतकीच अपेक्षा असेल तर प्रश्नच मिटला. मग मंडळावर तज्ज्ञ हवेतच कशाला? परिणामी चित्रपटाला प्रौढांसाठी वा सर्वासाठी असे प्रमाणपत्रही द्यावे लागणार नाही. सध्या तरी चित्रपट भारतीय संस्कृती आणि समाजमूल्यांच्या जपणुकीच्या निकषांवर तपासला जातो. तेच जर होणार नसेल तर प्रमाणन मंडळ बरखास्त केलेलेच बरे. त्यामुळे मंडळाच्या कारभारात सुधारणा घडवून आणण्याचा बेनेगल समितीचा त्रास वाचेल, चित्रपट दिग्दर्शकांचे अभिव्यक्तिस्वातंत्र्य अबाधित राहील आणि मनाला येईल ते दाखवायला त्यांना मोकळे रान मिळेल.
– अनिल रा. तोरणे, तळेगाव दाभाडे
सेल्फीवेडय़ांवर दंडात्मक कारवाई हवी
‘सेल्फीच्या नादात दोन तरुण खाडीत’ ही बातमी (१७ जाने.) वाचली. सुदैवाने पोलीस आणि स्थानिकांच्या प्रसंगावधानामुळे दोघांनाही वाचविण्यात यश आले. बॅण्ड स्टॅण्डजवळ सेल्फी काढण्याच्या नादात एक मुलगी वाहून गेली आणि तिला वाचवायला गेलेला तरुणही मृत्युमुखी पडला. ही घटना अगदी ताजी असतानाही दोन तरुणांना अशा धोक्याच्या ठिकाणी सेल्फी काढण्याचा मोह आवरता आला नाही याचे वाईट वाटते. सेल्फी काढण्याचा नाद ही आता एक नवीन सामाजिक समस्या होऊ पाहते आहे. अशा घटना घडू नयेत म्हणून प्रशासनाने काही ठिकाणी सेल्फी काढण्यास बंदीच केली आहे. परंतु बंदी मोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करणे गरजेचे आहे, असे वाटते.
– रविकांत श्रीधर तावडे, नवी मुंबई
बोधचिन्ह विदेशात बनवणे हास्यास्पद
‘मेक इन इंडिया’ या उपक्रमाचे बोधचिन्ह ‘विडेन-केनेडी’ या अमेरिकन आस्थापनाच्या भारतीय शाखेत सिद्ध झाल्याचे ‘माहिती अधिकारा’च्या अंतर्गत समोर आले आहे. १२५ कोटींहून अधिक लोकसंख्या असलेल्या या राष्ट्रात एक बोधचिन्ह बनवण्यासाठी केंद्र शासनाला कोणीच पात्र वाटले नाही का? की भारतीयांपेक्षा विदेशी नक्कीच काही आगळेवेगळे सिद्ध करू शकतात याबाबत शासनाला भलताच आत्मविश्वास आहे, असे वाटते. भारताने सर्वच क्षेत्रांत स्वबळावर अधिकाधिक गोष्टींची निर्मिती करण्याकडे कायम वाटचाल ठेवली पाहिजे. ऊठसूट विदेशी आस्थापनांची मदत घेणे म्हणजे आपणच आपले हसे करून घेणे होय.
– जयेश राणे, भांडुप (मुंबई)

नर्मविनोदाला अज्ञान समजू नये..

$
0
0

‘उद्यमारंभ आणि आरंभशूरता’ या अग्रलेखात (१८ जानेवारी) मांडलेले विचार अभ्यासपूर्ण आहेत. सरकारला दिलेला सावधगिरीचा इशारा तर मान्य व्हावा असाच आहे; परंतु याच अग्रलेखात ‘दुसरा अडथळा सरकारच्या डोक्यातील वास्तवाचा. नवउद्यमता म्हणजे काय या संदर्भात सरकार सुस्पष्ट नाही,’ हे सांगताना पुढे असे म्हटले आहे – ‘याचे उदाहरण खुद्द औद्योगिक धोरण आणि प्रसार खात्याचे गौरवांकित सचिव अमिताभ कांत. पंतप्रधान मोदींसमोर ओयो रूम्स सेवेचे संस्थापक रितेश अगरवाल यांना पाचारण करताना त्यांच्या परिचयात कांत यांनी, रितेश हे ताज समूहापेक्षाही अधिक हॉटेलांचे मालक आहेत, असे सांगितले. ही बाब अगदीच हास्यास्पद. कारण अगरवाल यांच्या मालकीचे एकही हॉटेल नाही. ते फक्त हॉटेल नोंदणी सेवा देतात.. ’
अर्थशास्त्रातील पदव्युत्तर शिक्षण घेतलेले, १९८० च्या तुकडीतील आयएएस दर्जाचे अधिकारी, केंद्र व राज्य सरकारांच्या अनेक नवीन व अपारंपरिक धोरणांचे व योजनांचे जनक, ब्रिटिश ‘शीव्हनिंग स्कॉलर’ व ज्यांचा नुकताच ‘वर्षांतील धोरण बदलाचे दूत’ म्हणून इकॉनॉमिक टाइम्सचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला, त्यांना एवढेही समजत नाही का, असा समज वाचकांच्या मनात निर्माण होऊन एखाद्या व्यक्तीविषयी अजाणतेपणाने पण का होईना गंभीर गरसमज निर्माण होऊ नयेत.
हा कार्यक्रम चित्रवाणीवर मी प्रत्यक्ष पाहिला होता. त्यात कांत यांनी काय म्हटले हे आठवत होते पण तरीसुद्धा वरील वक्तव्याची खातरजमा करण्यासाठी त्या कार्यक्रमाचे चित्रीकरण ‘यूटय़ूब’वर पुन्हा पाहिले. हे चित्रीकरण https://www.youtube.com/watch?v=jbzevV85k80 येथे उपलब्ध आहे. त्यात कांत ह्यंनी असे म्हटल्याचे स्पष्ट ऐकू येते की ‘ताज समूहाच्या हॉटेल्सपेक्षा रितेश अधिक हॉटेल खोल्यांचा मालक आहे.’ (ताज समूहाच्या हॉटेल्सच्या खोल्यांपेक्षा असा ध्वनित अर्थ अभिप्रेत असावा.) नर्मविनोदाच्या अंगाने रितेश यांच्या नवउद्यमाची गौरवशाली ओळख करून देणाऱ्या कांत यांच्या विधानाने सभागृहातील श्रोत्यांच्या चेहऱ्यावर उमटलेली स्मित हास्याची लकेरही या चित्रफितीत स्पष्ट दिसते.
असो. एकुणात अग्रलेख अभ्यासपूर्ण असल्यामुळे विचार करायला लावणारा आहे.
– विजय त्र्यंबक गोखले, डोंबिवली (पूर्व)

सौरपंप खरेदीचा निर्णय जरा सबुरीने बरा..
‘महाराष्ट्रातील सौरपंप खरेदी गुजरात व आंध्र प्रदेशपेक्षा महाग’ अशी बातमी वाचण्यात आली. मुख्यमंत्री महोदयांनी पाच वर्षांत पाच लाख सौरपंप पुरविण्याची महत्त्वाकांक्षी घोषणा केली. त्याचा भाग म्हणून प्रायोगिक तत्त्वावर दहा हजार सौरपंप खरेदी करावयाचे आहेत. साडेपाच लाख रुपयांचा एक पंप याप्रमाणे दहा हजार पंपांची किंमत ५५० कोटी रुपये इतकी होते. मला वाटते प्रायोगिक तत्त्वावर एवढी मोठी रक्कम खर्च करण्याएवढे आपले राज्य श्रीमंत नक्कीच नाही. प्रायोगिक तत्त्वावर शंभर पंप जरी घेतले तरी पुरेसे आहेत असे मला वाटते.
मुळात सौरपंप का खरेदी केले जातात हेच मला कळत नाही. आज राज्याच्या सर्वदूर वीज पोहोचलेली आहे. कोणत्या भागातील शेतकरी सौरपंप मागतो हेच मला समजत नाही. सौरपंप लावून विजेवर चालणारा पंप काढून ठेवता येईल अशी परिस्थिती नाही. सौरपंप वापरल्याने बारा महिने २४ तास वीजपुरवठा होईल अशी स्थिती नाही. हा पंपखरेदीचा खर्च कोण करणार माहीत नाही. माझ्या माहितीप्रमाणे काही प्रमाणात अनुदान व उरलेली रक्कम कर्ज स्वरूपात देण्यात येईल. त्यामुळे कदाचित शेतकऱ्याला आज काही पसे मोजावे लागणार नाही. मात्र त्याच्या नावावर कर्ज लागेल हे नक्की. नेमकी योजना काय आहे व त्याचा उद्देश काय आहे याचा खुलासा होणे गरजेचे आहे. शेतीपंपांना सौरपंप हे सिद्ध झालेले तंत्रज्ञान नाही. त्यामुळे यावर व्यापक चर्चा होऊन निर्णय घेण्यात यावा असे मला वाटते.
अरिवद गडाख, निवृत्त मुख्य अभियंता, महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ

मध्यमवर्गाने तक्रारीचा अधिकार गमावला!
‘मरण नोकरदार मध्यम वर्गाचेच!’ (लोकसत्ता, १८ जाने.) हे पत्र मध्यमवर्गाच्या व्यथा सांगताना इतर अनेक बाबींकडे दुर्लक्ष करते. महागाई वाढली आणि व्याज दर खाली आले, हे मान्य करतानाच आज मध्यमवर्ग कमालीचा दुटप्पी झाला आहे, हे ध्यानात घेणे महत्त्वाचे आहे. दहा हजारांवरील व्याजावर ‘टीडीएस’ कापला जातो म्हणताना तुमचे सकल उत्पन्न कर आकर्षति करीत नसेल तर ‘१५ जी’ / ‘१५ एच’ फॉर्म भरून ‘टीडीएस’ कापणे टाळता येते, याचा पत्रात उल्लेख नाही. बरे उत्पन्न करपात्र असेल तर ‘टीडीएस’ कापला जाणेच योग्य नव्हे काय? उतरत्या व्याज दरांबाबात तीव्र नाराजी व्यक्त करणारा हाच मध्यमवर्ग घर आणि वाहनांसारख्या इतर बाबतीत कर्ज घेताना अशा कर्जावरील व्याज दर उतरल्यावर मात्र अगदी खूश असतो, हा दुटप्पीपणा नव्हे काय?
महागाईचा बागुलबुवा करणारा हाच मध्यमवर्ग हॉटेिलग, घराचे नूतनीकरण, वाहन खरेदी, महागडे मोबाइल फोन, ‘फ्लॅट स्क्रीन’ चित्रवाणी संच, परदेशी दौरे अशा सुखलोलुप जीवनांत गुरफटलेला दिसतो. कपडे/ साडय़ांची आणि दागिन्यांची दुकाने आलिशान मॉल आणि नाटक सिनेमांची थिएटर्स तुडुंब भरलेली असतात. महाग मोटरसायकली कॉलेज तरुणांकडे सर्रास पाहायला मिळतात. अशा या वर्गाला तूरडाळ आणि कांदा महागल्यावर मात्र अनावर संताप येतो, याचे हसू येते. हाच मध्यमवर्ग महागडय़ा शाळांमध्ये आपल्या पाल्याला प्रवेश मिळवण्यासाठी वर्षांकाठी हजारो रुपये खर्च केल्याचा टेंभा मिरवण्यात धन्यता मानतो. सातव्या वेतन आयोगामुळे याच मध्यमवर्गाला वाढ मिळणार आहे आणि यांचे व्यक्तिगत पेन्शनच सरासरी २५-३० हजारांच्या घरात असते.
या सगळ्याचा विचार केला तर वीज, दूरध्वनी बिल वाढले, भाजीपाला आणि डाळी महागल्या अशा तक्रारी करण्याचा अधिकार तथाकथित मध्यमवर्गीयांनी गमावला आहे असेच म्हणायला हवे!
– राजीव मुळ्ये, दादर, मुंबई

संमेलनांचा ढाचा तरी बदला..
‘उरुसाची उपयुक्तता’ हा अग्रलेख (१६ जानेवारी) वाचून काही प्रश्नही उपस्थित झाले. खरेच साहित्य संमेलन मराठी साहित्याच्या प्रसाराचे, संवर्धनाचे काम करते का? अलीकडच्या काळात संमेलन आले की कोणता तरी वाद घेऊनच येणार, हे जणू काही समीकरणच बनले आहे, मग तो संमेलनाच्या यजमानपदापासूनचा राजकीय हस्तक्षेप तसेच संमेलनाध्यक्ष निवड, स्वागताध्यक्ष निवड.. एकंदर संमेलन पार पडेपर्यंत कोणत्या ना कोणत्या कारणावरून संमेलन लोकांच्या चच्रेत जरूर राहते.
परंतु या सबंध प्रकारामधून साहित्य क्षेत्रावरच कोरडे ओढण्याचे काम सुरू होते. मग कधी त्याला विचारसरणीची जोड मिळते. संमेलनाध्यक्ष पुरोगामी की प्रतिगामी यावरून मोजमापाला सुरुवात होऊन मग मुख्यमंत्र्याने उद्घाटनाला जायचे की नाही यावर विचार होऊ लागतो. दर वर्षी असाच प्रकार चालणार असेल तर यावर विचार करण्याची हीच वेळ आहे.. एकीकडे तरुण पिढी मराठी साहित्यापासून दुरावत आहे याची ओरड सुरू होते, तर साहित्य परिषद दर वर्षी अशा संमेलनाचा सोहळा आयोजित करीत असते, या विरोधाभासावर जरूर विचार केला जावा. नाही तर भालचंद्र नेमाडेंच्या मतानुसार ते रिकामटेकडय़ांचे संमेलन कायम राहील. संमेलन म्हणजे राजकीय भाषणाच्या मेजवानीचे केंद्र बनू नये. या वर्षीच्या कार्यक्रमपत्रिका पाहिल्यास बऱ्याच शंका उपस्थित होतात, बरेच परिसंवाद मराठी साहित्यास पूरक असे नाहीत, त्यामुळे सबंध रूपरेषेवर विचार करावा लागेल. असाही प्रश्न पडतोच की संमेलनांच्या ढाच्याचा तोच तो कंटाळवाणा कित्ता आपण किती दिवस गिरवत बसणार आहोत?
दीपक मोहन बाबर, पुणे

असले अध्यक्ष पुन्हा न व्हावे!
कधीही नाव न ऐकलेल्या लोकांना ‘कोण हे सबनीस?’ अशा वर्तमानपत्रातल्या बातम्या वाचून माहीत झालेले अध्यक्ष साहित्यापेक्षा स्वत:च्या चाणक्यनीतीने प्रकाशझोतात आले. मराठी भाषा समृद्ध करण्यासाठी, फुलविण्यासाठी भौगोलिक सीमारेषेच्या पलीकडे नेण्यासाठी ज्यांच्याकडे त्यांची धुरा दिली, त्यांनी सध्या तरी त्या अपेक्षेचा पूर्ण चुराडा करून टाकला आहे. अशा संमेलनाध्यक्षांनी तर राजकारणातच यावे! भूतकाळात कधीही न लाभलेले एवढे हुशार अध्यक्ष भविष्यातसुद्धा कधीही न लाभोत, एवढीच एका मराठी वाचकाची अपेक्षा.
विशाल भोसले, पेरीड (शाहूवाडी)

‘तिजोरी’ भरली, ‘शिदोरी’ रितीच..
‘भारताचा सलग दुसरा मालिका पराभव’ ही बातमी(१८ जानेवारी) क्रिकेट प्रेमी भारतीयांना चटका लावून जाणारीच. भारतीय क्रिकेट मंडळानी सध्या क्रिकेट दौरे मर्यादित न ठेवणे,भारतीय खेळाडूंना परदेशातील मोठ्ठाली मदाने, चेंडूच्या िस्वगला पोषक हवामान, टणक खेळपट्टय़ा अशा वातावरणात इंग्लिश काउंटी, झटपट ऑस्ट्रेलियन बिग बॅश लीग अशासारख्या स्पर्धामध्ये मध्ये सहभागी होण्याची उसंत न देणे याचा चंगच बांधला आहे; मग एकदिवसीय मालिका जिंकण्याचा चमत्कार होईलच कसा? आपल्याकडे उत्कृष्ट फलंदाज आहेत, त्यांच्याकडून लागोपाठ वैयक्तिक शतकांचा विक्रमही होत आहे परंतु विरुद्ध संघास पाठलाग करण्यास चांगलीच धाप लागेल इतपत धावसंख्या ना आपले फलंदाज उभारताना दिसतात, ना आपले गोलंदाज विरुद्ध संघाला झटपट गुंडाळताना दिसत आहे. परदेशात चेंडू उसळत असताना अंगात वारे शिरल्याप्रमाणे एकाच टप्प्यात स्थिर गोलंदाजी न करता ती स्वैर करण्यातच आपले गोलंदाज भूषण मानताना वारंवार (मागील वाईट अनुभवांवरून शहाणे न होता) दिसत आहेत. भारतीय क्रिकेट मंडळाने भारंभार दौरे आखून खेळाडूंची दमछाक करताना केवळ ‘तिजोरी’ भरण्याच्या नादात आपल्या खेळाडूंच्या अनुभवाची ‘शिदोरी’ रिती राहिली याचाच परिपाक म्हणजे भारतीय संघाचा दुसरा मालिका पराभव असे खेदाने म्हणावे लागेल.
– प्रवीण आंबेसकर, ठाणे

‘अभाविप’सारख्या संघटनांना चाप लावावा

$
0
0

‘शिक्षणाचे राजकारण’ हा ‘अन्वयार्थ ’ वाचला. हैदराबाद युनिव्हर्सिटीमध्ये गेल्या काही दिवसांत ‘आंबेडकर स्टुडन्ट्स असोसिएशन’ आणि युनिव्हर्सिटी प्रशासन यांच्यामध्ये चाललेल्या वादात अखेर रोहित वेमूला या विद्यार्थ्यांचा बळी गेला.‘अन्वयार्थ’मध्ये म्हटल्याप्रमाणे हा राजकीय बळी आहेच, परंतु जातीयही आहे. या प्रकरणाला जातीय रंग देऊ नये असे म्हणणाऱ्यांची कीव करावीशी वाटते. रोहितच्या आत्महत्येचे समर्थन होऊ शकणार नाही, मात्र त्याच्यासारख्या चळवळीत मुरलेल्या व्यक्तीला आत्महत्येशिवाय दुसरा मार्ग उरत नसेल तर गांभीर्याने विचार केला पाहिजे. यापुढे असे रोहित बळी जाऊ  नयेत म्हणून काळजी घेतली पाहिजे. ‘अभाविप’सारख्या स्वयंघोषित संस्कृतिरक्षक संघटनांना चाप लावला पाहिजे. समाजात कुठे काही चुकीचे होत असेल तर त्यासाठी पोलीस आणि सरकार आहे. कोण चूक आणि कोण बरोबर हे ठरवण्याचा आणि त्यानुसार शिक्षा करण्याचा अधिकार ‘अभाविप’ला कुणी दिला? रोहित वेमूला याच्या आत्महत्येला जबाबदार असणाऱ्या सर्वच संबंधितांवर त्वरित कारवाई करावी. ज्यांच्यावर आपल्या सुरक्षेची, कल्याणाची जबाबदारी आहे त्यांच्याकडूनच आपणावर अन्याय होतो ही भावना समाजातील एका वर्गाला सतत डाचत असते. या वर्गाला न्याय मिळवून देऊन दिलासा देण्यात सरकार, शासन-प्रशासन अपयशी ठरत असेल तर यापुढेही असे शेकडो रोहित वेमूला बळी जातील याची जाणीव आपण ठेवली पाहिजे.

प्रकाश लालासाहेब पोळ, कराड (सातारा)

 

दलित विद्यार्थ्यांना हा इशारा तर नाही?

‘शिक्षणातही राजकारण’ हा अन्वयार्थ (१९ जाने.) वाचला. हैदराबाद केंद्रीय विद्यापीठातील रोहित वेमूला या दलित विद्यार्थ्यांने केलेली आत्महत्या ही दलित विद्यार्थ्यांना सावध राहण्याचा इशारा तर दिला नसेल, हा प्रश्न पडत आहे. आंबेडकर रीडिंग ग्रुप, आंबेडकर पेरियार स्टडी सर्कल, अशा दलित संघटनांची गळचेपी करायची नाही तर धमकी देऊन चळवळ हाणून पाडण्याचा प्रयत्न सध्या जोरात सुरू आहे. वेमूला या विद्यार्थ्यांला विरोध करणारी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ही भाजपपुरस्कृत संघटना असल्यामुळे भाजप तसेच केंद्रीय मंत्री बंडारूदत्तात्रयसारख्या नेत्याने यात उडी घेऊन या विद्यार्थ्यांस आत्महत्येस प्रवृत्त केले आहे.

एकीकडे पंतप्रधान मोदी म्हणतात की, ‘दलित बांधव मागे राहता कामा नये, त्यांचा परदेशातील शिक्षणाचा खर्च सरकार करेल’ आणि दुसरीकडे देशात दलितविरोधी कारवाया करणाऱ्यांना पाठीशी घालायचे. हे कसले राजकारण? डॉ. बाबासाहेब आंबेडकर याच्या १२५व्या जयंतीनिमित्त वर्षभर कार्यक्रम ठेवायचे आणि दलित चळवळीला दाबून टाकायचे. या विसंगतीला काय म्हणणार? ‘आंबेडकर स्टुडन्ट्स असोसिएशन’ ही जातीय, अतिरेकी आणि राष्ट्रद्रोही संघटना आहे असा नवीन शोध बंडारू दत्तात्रय यांनी लावला आणि मनुष्यबळ विकास मंत्रालयास पाठवून दिला. त्या खात्याच्या मंत्री स्मृती इराणी यांच्याच पदवीवरून वाद असताना त्यांनीच या विद्यार्थ्यांना दोषी ठरवले.    यापूर्वी मद्रास आयआयटीमध्ये आंबेडकर पेरियार या अभ्यासू दलित चळवळीला भाजपने विरोध केला होता. भाजपने शिक्षणात राजकारण अवश्य करावे पण शिक्षणात जातीचे राजकारण करून दलितविरोधी असल्याचे पुन:पुन्हा सिद्ध करू नये. रोहित वेमूलाच्या आत्महत्येस जबाबदार असणारे कुलगुरू तसेच केंद्रीय मंत्री बंडारू दत्तात्रय यांना पदावरून दूर करून सरकारने निष्पक्षपणे चौकशी करणे गरजेचे आहे. नाही तर भाजप सरकार दलितविरोधी कृत्य करून जातीचे राजकारण करण्यात पुन्हा सज्ज झाला आहे की काय, अशी शंका आणि भीती सर्वसामान्य माणसात निर्माण होऊ शकते.

मारोती संग्राम गायकवाड, नांदेड

 

अर्थसाक्षर होणे हा खरा उपाय

‘मध्यमवर्गाने तक्रारीचा अधिकार गमावला!’ (लोकमानस, १९ जाने.) या पत्रात मध्यमवर्गाच्या चंगळवादी दुटप्पीपणावर नेमके बोट ठेवले आहे. त्याचबरोबर व्याज दर कमी-जास्त होणे यामागे अर्थशास्त्र असते न की कुणाला तरी नाडण्याचा तो प्रकार असतो हेही समजून घेणे गरजेचे आहे. उद्योग क्षेत्रात आलेल्या मंदीवर मात करण्यासाठी व्याज दर कमी करण्याची मागणी या क्षेत्राकडून गेली दोन वर्षे सातत्याने होत होती. पण त्या वेळी महागाई वृद्धी दर १० टक्क्यांच्या वर असल्याने रघुराम राजन यांनी त्यांच्या पतधोरणात व्याज दर कमी करण्याचा दबाव असूनही ते त्यांनी कटाक्षाने टाळले. पण आता महागाई वृद्धी दर निम्म्याने खाली आल्यावर त्यांनी आर्थिक वृद्धीस महत्त्व देऊन व्याज दरकपातीचे धोरण अवलंबले (पायाभूत सोयी-सुविधांची चणचण असलेल्या आपल्या देशात महागाई शून्यावर येणे शक्य नाही, तिचा वृद्धी दर आटोक्यात ठेवणे इतकेच शक्य असते.). सरकारी व खासगी बँकांनी या पतधोरणास प्रतिसाद दिला तरी पोस्टाच्या ठेवीवरील व्याज दर उच्चतम पातळीवरच राहिल्याने आजच्या स्पर्धात्मक काळात व्याज दर लक्षणीयरीत्या कमी करणे शक्य नव्हते, म्हणून बँकांनीच पोस्टाचे व्याज दर कमी करण्याची मागणी सरकारकडे केली आहे.

बाजाराच्या तुलनेत पोस्टाच्या व्याजाचे उच्चतम दर आणि त्याच वेळी या ठेवींना सरकारी संरक्षण, म्हणजे सर्वोत्तम परतावा आणि सर्वोत्तम संरक्षण हे समीकरण अर्थशास्त्राला पूर्ण छेद देणारे. बाजारभावापेक्षा अधिक व्याज दर देण्याचा भार सरकारलाच उचलावा लागत असल्यामुळे महसुली तूट वाढून त्याची परिणती महागाई वाढण्यातच होते. पतधोरणाचा अभ्यास करून व्याज दर जेव्हा उच्चतम पातळीवर असतात तेव्हा आपल्या ठेवी दीर्घकालासाठी गुंतविणे आणि काही बचत जोखमीच्या पर्यायात गुंतविणे हे शिकून घ्यायला हवे. सदासर्वदा सरकारच्या नावाने गळा काढणे हा उपाय नसून अर्थसाक्षर होणे हा खरा उपाय झाला.

अनिल मुसळे, ठाणे

 

यापुढे स्वागताध्यक्षपदच महत्त्वाचे!

‘मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची निवडणूक होऊ  नये, मते मिळवणे आमचे काम आहे, साहित्यिकांनी आमचा कित्ता गिरवू नये’, असे म्हणताना शरद पवार यांनी ‘आमचा’ म्हणजे राजकारण्यांचा संदर्भ घेतला. त्यात क्रीडा आणि विशेषत: क्रिकेट संघटनांचा आपोआप समावेश होतो. कारण या संघटना राजकारण्यांनी व्यापून टाकल्याचे आपण पाहतो. त्या ठिकाणी निवडणुकांत जे चालते ते साहित्य क्षेत्रात होऊ  नये हे सांगण्यात त्यांची सदिच्छा दिसते.  परंतु सध्या होत असलेल्या निवडणुकीतील दोषांवर बोट ठेवताना तीमधील उणिवा दूर करून तिचे व्यापक स्वरूप कायम ठेवण्याऐवजी चार माजी अध्यक्षांवर तो निर्णय सोपवण्याचा त्यांचा सल्ला निर्दोष असेल काय, हा पण प्रश्न आहे. कारण जर ‘वरून चिठ्ठी’ आली (त्यात अशक्य ते काय), तर हे चार माजी अध्यक्ष विरोधात जाऊन स्वत:चा निर्णय घेतील याचा भरवसा कोणी देऊ  शकणार नाही, इतका राजकीय रंग साहित्य संमेलनांना आलेला दिसत आहे. असो.  एकंदरीत हे संमेलन अनेक कारणांनी गाजले असून ऐतिहासिक ठरलेले दिसते. ते यासाठी की संमेलनाचे अध्यक्ष आणि अध्यक्षीय भाषण याला पुढील काळात फारसे महत्त्व न उरता स्वागताध्यक्ष हेच पद जास्त भाव खाऊन जाईल याची शक्यता जास्त वाटते. तसेच संमेलन म्हणजे एक इव्हेन्ट झाल्याने त्याचे स्वरूप अधिक भपकेबाज होऊन त्यावरील उलाढाल कोटीच्या कोटी उड्डाणे करत पुढे जात राहील. प्रायोजकही मिळत राहतील हे अभिमत विद्यापीठाने करून दाखवले आहेच. एकंदरीत साहित्य संमेलनाला आपण म्हणता त्याप्रमाणे ‘उरूस’ किंवा जत्रेचे स्वरूप आलेले दिसेल, पण परंपरा चालू राहील.

मुकुंद नवरे, गोरेगाव (मुंबई)

 

विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त उपक्रम

नव्या विद्यापीठ कायद्याच्या प्रस्तावात प्रत्येक कॉलेजमध्ये विद्यार्थी तक्रार निवारण केंद्र सुरू करण्याची सूचना केली आहे. हा उपक्रम विद्यार्थ्यांना नक्कीच उपयुक्त ठरेल. परीक्षांचे निकाल लांबणे, निकालातील चुका, सुविधांचा अभाव, शिष्यवृत्तीचा परतावा न मिळणे यांसारख्या शैक्षणिक अडीअडचणी, प्रसाधनगृहातील अस्वच्छता, आरोग्यसेवेच्या प्रथमोपचारात कमतरता यासारख्या दैनंदिन समस्या, रॅगिंगसारख्या गंभीर सामाजिक समस्या, शिक्षक-विद्यार्थी असमन्वय तसेच विद्यार्थ्यांच्या शिक्षणेतर गरजा त्यातून मार्ग काढण्यासाठी या तक्रारनिवारण मंचाचा उपयोग होईल.

प्रज्ञा मनीष पंडित, ठाणे

 

रक्तदानातील अनास्था चिंताजनक

‘ऐच्छिक रक्तदानात देश मागेच’ हे वृत्त (१९ जाने.) अतिशय दु:खद असून आजही लोकांना रक्तदानाचे महत्त्वच कळलेले नाही हे सत्य अधोरेखित होते. जेव्हा स्वत:ला रक्ताची गरज भासते तेव्हाच फक्त कुणी तरी रक्तदान केले होते म्हणून आपल्याला रक्त मिळू शकले हे जाणवते. पण ती भावना रक्तदान करण्यात परावर्तित होत नाही. त्यातून आता रक्त विकत मिळायची सोय उपलब्ध झाल्याने ऐच्छिक रक्तदान झपाटय़ाने कमी झाले आहे. वस्तुत: निरोगी व्यक्ती वर्षांला तीन वेळा सहज रक्तदान करू शकते. ज्याचा त्या व्यक्तीला काहीही त्रास होत नाही. पण सध्याच्या स्पर्धात्मक युगात या महत्त्वाच्या गोष्टीकडे लक्ष देण्यास कुणालाही वेळ नाही आणि तशी गरजही वाटत नाही हे दुर्दैव आहे.

माया हेमंत भाटकर, चारकोप गाव (मुंबई)

 

प्रशासकीय सुधारणा अमलात आणा

‘सातवा वेतन आयोग लांबणीवर’ ही बातमी (१९ जाने.) वाचली. सरकारला आयोगानुसार वेतन द्यावेच लागेल, कारण नोकरशहा हा संघटित वर्ग आहे आणि ‘घ्यायचे कसे’ या बाबतीत त्याचा हात कोणीच धरू शकणार नाही.  परंतु आता ‘प्रशासकीय सुधारणा’ अमलात आणण्याचे धाडस मोदी सरकारने दाखवावे.  खासगी आस्थापनांप्रमाणे वेतनवाढ आणि कामगिरी-कर्तृत्व याची सांगड असायला हवी, जेणेकरून विद्यमान ‘सब घोडे बारा टके’ या कार्यसंस्कृतीला छेद बसेल.

सुधीर लक्ष्मीकांत दाणी, बेलापूर, (नवी मुंबई)

loksatta@expressindia.com

निर्भीड आणि मोकळे समर्थन..

$
0
0

 

डॉ अरुण टिकेकर हे हल्लीच्या  काळातील एक सव्यसाची पत्रकार होते. अलीकडे वसई विरार महापालिकेने भरवलेल्या संपादक संमेलनात त्यांचे विचार ऐकण्याचा योग आला होता. अत्यंत निर्भीडपणे आणि मोकळ्या स्वभावाने त्यांनी भांडवलदारी वृत्तपत्रांचे समर्थन केले होते. ‘बडे भांडवलदार अत्यंत व्यावसायिक दृष्टिकोनातून या वृत्तपत्रांकडे बघत असतात. त्या मुळे अशा वृत्तपत्राच्या संपादकांवर त्यांचा दबाव असतो हा सार्वत्रिक गरसमज आहे’ असे मत त्यांनी मांडले होते. त्याचे साधार स्पष्टीकरण देताना त्यांनी आणीबाणी प्रसंगी एक्सप्रेस समूहाने घेतलेल्या भूमिकेचे उदाहरण दिले.

सरकारची यंत्रणा फार  सक्षम व ताकदवान असते, त्याच्या चुकीच्या धोरणाशी लढताना प्रसंगी तितकीच क्षमता असलेल्या यंत्रणेचा पाठिंबा आवश्यक असतो हे त्यांनी प्रांजळपणे कबूल केले होते!

उमेश मुंडले, वसई

 

वेतन आयोग लांबणीवर, ही आनंदवार्ताच

‘सातवा वेतन आयोग लांबणीवर’ अशी बातमी वाचली. खूप आनंद वाटला. खरे म्हणजे तो रद्दच व्हायला हवा. नाही तरी महागाईप्रमाणे त्यांच्या पगारात वेळोवेळी वाढ होतच असते. हा आयोग रद्द झाला तर शेतकरी, असंघटित कर्मचारी आणि छोटे छोटे व्यावसायिक अशांना न्याय देण्यासाठी उचललेले ते एक मोठे पाऊल ठरेल. आर्थिक शिस्त आणून दाखविली, तर हे सरकार सरदार पटेलांसारख्या पोलादी पुरुषाचा वारसा सांगण्यास समर्थ ठरेल.

श्याम केळकर

 

शहर आणि विद्यापीठ, दोहोंवर प्रेम..

‘साक्षेपी साधक’ हा डॉ. अरूण टिकेकरांवरील श्रद्धांजलीपर अग्रलेख (२० जाने.) वाचला. ‘मुंबई शहर’ आणि ‘मुंबई विद्यापीठ’ दोहोंवर टिकेकर यांचे विलक्षण प्रेम होते. ‘लोकसत्ता’तील, ‘स्थल-काल’, ‘बखर मुंबई विद्यापीठाची’ या त्यांच्या लिखाणातून ते प्रकट झाले होते. या व अशा अनेक विषयांवर सरांनी भरभरून लिहिले होते.

‘लोकसत्ता’च्या संपादकपदावरून, मुंबई विद्यापीठाच्या घसरत्या दर्जावर टिकेकर यांनी कोरडे ओढले होते. एका कुलगुरूंच्या गर-वागण्यावर परखडपणे लिहिताना त्यांनी, ‘नव्हाळीचे दिवस संपले, मुंबई विद्यापीठाचा येणारा प्रत्येक कुलगुरू असे काही गुण उधळून दाखवतो, की गेलेला कुलगुरूच बरा होता असे म्हणण्याची वेळ येते,’ असे अत्यंत समर्पक वाक्य लिहिले होते.

त्यांच्या कारकीर्दीत, महाविद्यालयीन जीवनातच मी ‘लोकसत्ता’चा कायमचा वाचक झालो आणि मनोमन टिकेकरांना ‘सर’ म्हणू लागलो. सरांच्या अचानक जाण्याने, ग्रंथविश्व आणि ‘संयमी पत्रकारिता’ या दोन्हीत निर्माण झालेली पोकळी सर्वानाच सतत जाणवत राहील.

अंकुश मेस्त्री, बोरिवली, मुंबई

 

संकल्पित प्रकल्प पूर्ण होवोत..

अरुण टिकेकर  गेले ..  महाराष्ट्रातला एक थोर विचारवंत गेला, ज्ञानविश्वाचा आधारवड गेला. समाजाची केवढी मोठी हानी झाली! त्यांच्या जाण्याने एक केवढं मोठं ज्ञानभांडार लुप्त झालं! त्यांचे काही संकल्पित प्रकल्प असतील ते आता कोण आणि कसे पूर्ण करणार? आमच्यासारख्या चाहत्यांना हा प्रश्न आता कायमचा छळत राहील.

मृदुला प्रभुराम जोशी, मुंबई

 

वाचक जोडणारे संपादक

‘साक्षेपी साधक’ या अग्रलेखात ( २० जाने.) म्हटल्याप्रमाणे टिकेकरांची वैचारिक मांडणी ही आगरकरी परंपरेशी जवळीक साधणारी होतीच.  सर्व वयांचे वाचक त्यांनी जोडले. १८ वर्षांपूर्वी, म्हणजे १९९७  साली ते लोकसत्तेचे संपादक असताना, भारताच्या पन्नासाव्या स्वातंत्र्यवर्षांचे औचित्य साधून त्यांनी ‘गाथा बलिदानाची’ हे सदर सुरू केले होते. इतिहासाच्या पुस्तकात ज्या स्वातंत्र्यसनिकांना स्थान मिळाले नव्हते वा जे स्मृतीआड गेले होते , अशा वीरांविषयी माहिती देणारी ती दिनमालिका होती. या माहितीचे चिकटवहीत संकलन करून  सुयोग्य मांडणी करणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांसाठी एक स्पर्धाही  होती. महाराष्ट्रातून भाग घेतलेल्या हजारो शालेय विद्यार्थ्यांमध्ये मीही एक होतो. या स्पध्रेच्या निमित्ताने मी ‘लोकसत्ता’ चाळावयास लागलो आणि ‘लोकसत्ता’ परिवाराचा भाग झालो.

डॅनिअल मस्करणीस, वसई

 

मध्यमवर्गाला संताप का येतो, हेही पाहा..

‘मरण नोकरदार मध्यम वर्गाचेच!’ या माझ्या १८ जानेवारीच्या पत्रावरील ‘मध्यमवर्गाने तक्रारीचा अधिकार गमावला!’ अशा प्रतिक्रियेचे पत्र (१९ जानेवारी) वाचले.

‘१५ जी’ आणि ‘१५ एच’ फॉर्म भरून देण्यासाठी अनुक्रमे त्या व्यक्तीचे वार्षकि उत्पन्न रु. २,५०,०००/- च्या आत असावे लागते आणि ती व्यक्ती ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक असावी लागते. सरसकट कोणीही हे फॉर्म भरून देऊ शकत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे घर  या आत्यंतिक प्राथमिकतेच्या आणि जिव्हाळ्याच्या गोष्टीवरील कर्ज दर थोडे कमी झाले म्हणून मध्यमवर्गीय माणूस खुश झाला तर, त्यात दुटप्पीपणा कुठून आला? आपल्या खिशावरील भार थोडा हलका झाला म्हणून त्याने आनंदीही होऊ नये का? आपल्या खिशाला परवडेल अशी आणि क्वचित कधीतरी न परवडणारी चन मध्यमवर्गाने करू नये का? की तीही फक्त गर्भश्रीमंतांचीच मक्तेदारी आहे? घरखरेदी, घराचे नूतनीकरण, अगदी चारचाकी नसली तरी, स्कूटर वा मोटरसायकल ही आता चनीची गोष्ट राहिली नाही.

मध्यमवर्गाच्या मिळकतीतील प न प चा हिशोब ठेवून त्यावर डोळा ठेवणारे सरकार मोठे व्यावसायिक, उद्योगपती, व्यापारी यांच्या मिळकतीबाबत काणाडोळा का करते? सरकारी बँकांचे ‘एनपीए’ (बुडीत/ थकित कर्जे) वाढवून त्या डबघाईला आणण्यात काही अपवाद वगळता मोठय़ा उद्योगपतींच्याच कंपन्या आहेत, हे वास्तव आहे. तूरडाळ, कांदा आणि जीवनावश्यक गोष्टींची कृत्रिम दरवाढ होण्यास व्यापारी लोकांची साठेबाजी कारणीभूत आहे, त्यामुळेच मध्यमवर्गाला अनावर संताप येतो.

उज्ज्वला सु. सूर्यवंशी, ठाणे पश्चिम.

 

भारत हे राष्ट्रआधीपासून होतेच.. 

प्रा. शेषराव मोरे यांच्या ‘संस्कृती-संवाद’ या सदरातील ‘भारत राष्ट्र होते काय?’ हा लेख (२० जानेवारी) सर्वसाधारणपणे मननीय असला तरी त्यातील मुख्य विचार मात्र पटायला कठीण जातो. एक राजा, एक कायदा, एक सन्य, एक प्रशासन या राजकीय समुच्चयाला प्रा. मोरे ‘राष्ट्र’ या संज्ञेला पात्र ठरवितात. केवळ सांस्कृतिक ऐक्य त्यांच्या मते पुरेसे ठरत नाही. आता राजा म्हटले की राज्य आलेच. म्हणजेच मोरे ‘राज्य’ आणि ‘राष्ट्र’ समानार्थी मानतात. पण हे बरोबर वाटत नाही.

राष्ट्र म्हणजे ‘आम्ही एक आहोत’ अशी भावना ज्यांच्या मनात खोल रुजली आहे असे लोक. आणि अशी भावना केवळ सांस्कृतिक ऐक्यामुळेच निर्माण होऊ शकते. याचे ढळढळीत उदाहरण म्हणजे इस्राएल. उणीपुरी दोन हजार वष्रे ज्यू समाज जगभर विखुरलेल्या अवस्थेत होता. पण त्यांच्यात एकत्वाची भावना कायम होती. म्हणजेच ते एक ‘राष्ट्र ’ म्हणून जगत होतेच. त्यांना त्यांचा स्वत:चा भूप्रदेश मिळताच ते जगाच्या नकाशावर दृश्यमान झाले. त्यांच्यातील सांस्कृतिक एकत्वाच्या आधारावर ते विद्यमानच होते.

याउलट सोव्हिएत युनियनचे उदाहरण घेता येईल. अनेक ‘राज्ये’ एकत्र येऊनसुद्धा केवळ या एकत्वाच्या भावनेच्या अभावी ते टिकू शकले नाही व सांस्कृतिक एकत्वाच्या आधारावरच त्याची शकले झाली.

तेव्हा सांस्कृतिक एकतेची भावना हाच ‘राष्ट्रा’चा मूलाधार मानायला हवा. देश किंवा राज्य ही राष्ट्राची दृश्य रूपे होत. संगणकाच्या भाषेत सांगायचे तर सांस्कृतिक एकता हे राष्ट्राचे सॉफ्टवेअर आहे तर देश किंवा राज्य हे हार्डवेअर आहे. ‘राज्य’ आणि ‘राष्ट्र’ यांची गल्लत करू नये.

या दृष्टीने पाहता ब्रिटिशांच्या आगमनाच्या फार पूर्वीपासून केवळ सांस्कृतिक एकतेच्या आधारावर भारत हे ‘राष्ट्र’च होते या म्हणण्यास प्रत्यवाय नसावा.

भालचन्द्र काळीकर, पुणे

 

विधान परिषद रद्द केल्यास खर्च वाचेल

सरकारी तिजोरीवर ताण पडतो म्हणून राज्य सरकार शासकीय नोकऱ्या , समाजहिताच्या योजनांवर गदा आणते आहे. नोकरभरती कमी करून  सरकार जर राज्याच्या तिजोरीची  काळजी  असल्याचा आव आणत असेल तर विधान परिषदेसाठी खर्च करण्याचे कारणच काय ?

भारतात फक्त  सहा राज्यांत विधानपरिषद आहे. तेथे फक्त विधानसभाच विधिमंडळाचे कामकाज करते. इतक्या वर्षांत तेथे कोणतीही शासकीय अडचण आल्याचे  ऐकिवात नाही

इकडे महाराष्ट्रात विधानपरिषदेमुळे कामकाजात गतिमानता आल्याचेही दिसत नाही. उलट विधिमंडळच्या कामकाजाला विलंब होत असल्याचे बऱ्याचदा दिसून येते. तसेच विधानपरिषदेचा वापर राजकीय सोयीसाठीच जास्त होताना दिसतो. महाराष्ट्रातील एकत्रित आमदार संख्या व त्यामुळे शासकीय कामावर होणारा अवाढव्य खर्च बघता विधानपरिषद विसर्जति केल्यास सरकारी कामकाजात २० टक्के बचत होईल. यामुळेच शासनाने व  राजकीय पक्षांनी विधानपरिषद रद्दबातल करण्याचा गांभीर्याने विचार करावा, असे मला वाटते.

हेमंत नेरपगारेचोपडा (जळगाव)

loksatta@expressindia.com


भारत असा कणखरपणा कधी दाखविणार?

$
0
0

‘वाकडी वाट न करताही’ हे संपादकीय (१९ जाने.) वाचले. त्यात म्हटल्याप्रमाणे ‘जागतिक राजकारणात इराणने नेहमीच आपणास पािठबा दिल्याचे अनेक दाखले दाखविता येतील’- हे केलेले विधान वस्तुस्थिती दर्शविते. असे असतानाही अमेरिकन दबावाला बळी पडत इराणशी त्यांच्या पडत्या काळात आपण फिरविलेली पाठ हे आपल्या परराष्ट्र धोरणाचे मोठे अपयश मानायला हवे. आपल्यापेक्षा किती तरी लहान असलेल्या देशांनी अमेरिकन दबाव झुगारून स्वतंत्र धोरण राबविल्याची उदाहरणे आताही दिसतात. या कडीतील सध्याचे ठळक उदाहरण म्हणजे दक्षिण अमेरिकन देश व्हेनेझुएला याचा उल्लेख करता येईल. भौगोलिकदृष्टय़ा अमेरिकेच्या जवळ असूनही या देशाने दाखविलेले धाडस नक्कीच कौतुकास्पद आहे. अर्थात याची किंमतही त्यांना चुकवावी लागली आहे. त्यांच्या या स्वतंत्र नीतीमुळे चिडून अमेरिकन अध्यक्ष ओबामा यांनी ९ मार्च २०१५ रोजी एक प्रशासकीय आदेश पारित करून व्हेनेझुएला या देशाला राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोका असणारे राष्ट्र म्हणून घोषित केले. यानंतरही या देशाने अमेरिकेपुढे नमते घेण्यास नकार दिला.

काही महिन्यांपूर्वी इराणचे भारतातील राजदूत गुलाम रजा अन्सारी यांनी ‘इंडियन एक्स्प्रेस’ला दीर्घ मुलाखत दिली होती. सदर मुलाखतीत त्यांनी त्यांच्या देशाचा भारताकडे बघण्याचा दृष्टिकोन व आपल्याकडून त्यांना असलेल्या अपेक्षा याबाबत सुस्पष्ट व परखड विचार मांडले होते. या निमित्ताने यातील काही बाबींचा उल्लेख करणे उपयुक्त ठरेल असे वाटते. त्यांचे म्हणणे होते की, आपण फार संयमी आहोत, ते मात्र तसे नाहीत. त्यांनी असेही सूचित केले की, आपण जर त्यांना सहकार्य देण्याचे प्रयत्न थांबविले तर तो आपला दोष असेल इराणचा नाही. या त्यांच्या इशाऱ्याचा भारतीय नीतिनिर्धारणकर्त्यांनी योग्य तो अर्थ समजून घेणे आवश्यक आहे. काश्मीरबाबत त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली. त्यांनी ठासून सांगितले की, काश्मीर हा भारताचाच भाग आहे. त्यांची अपेक्षा आहे की, आपण याबाबत बोलत राहिले पाहिजे व इराणला मार्गदर्शन करीत राहिले पाहिजे. कोणत्याही मुस्लीम राष्ट्राने काश्मीरबाबत भारताच्या बाजूने ठाम भूमिका घेण्याचे हे कदाचित एकमेव उदाहरण असावे. भारताचे इराणबरोबर घनिष्ठ व सौहार्दाचे संबंध असते तर १९९९ सालचे कंदहार विमान अपहरण प्रकरण आपण नक्कीच भारताला अनुकूल अशा पद्धतीने हाताळू शकलो असतो असे वाटते. काश्मिरात पाक-पुरस्कृत आतंकवादाने पुन्हा मुसंडी मारल्यास याला काटशह म्हणून इराणच्या सहकार्याने व सदिच्छेद्वारे बलुचिस्तानात पाकिस्तानला योग्य तो इशारा देता येईल व पाकिस्तानी मनसुबे धुळीस मिळविणे शक्य होईल. यासाठी कणखर, प्रगल्भ व दूरदर्शी धोरण राबविणे मात्र क्रमप्राप्त आहे.

इराणचे भौगोलिक महत्त्व लक्षात घेता वेळ न दवडता आपण निश्चित धोरण ठरविणे क्रमप्राप्त आहे. संपादकीयात उल्लेख केल्याप्रमाणे ‘इराणकडे दुर्लक्ष होण्यामागे आपली अनास्था कारणीभूत असू शकते’- ही व्यक्त केलेली भीती अनाठायी नक्कीच नाही. पाकिस्तानने मात्र याही बाबतीत आपल्यावर आघाडी घेतल्याचे दिसते. पंतप्रधान नवाझ शरीफ व सेनाप्रमुख राहिल शरीफ यांनी सौदी अरेबिया व इराण या देशांना ताबडतोब भेटी देऊन मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला व मध्यपूर्वेत पाकिस्तानचाही सहभाग कसा महत्त्वाचा आहे हे जगास दाखवून दिले. पाकिस्तानच्या बाबतीत सेनाप्रमुखाने पंतप्रधानांबरोबर दुसऱ्या देशाला भेट देण्याची ही कदाचित पहिलीच घटना असावी. यावरून पाकिस्तान जागतिक घटनांप्रति किती गंभीर व जागरूक आहे हेच दिसून येते. आपण मात्र अजूनही याबाबतीत चाचपडत आहोत ही खेदाची बाब आहे. आपले असेच ढिसाळ धोरण राहिल्यास देशाला याची जबर किंमत मोजावी लागू शकते हे मात्र निश्चित.

सतीश भा. मराठे, नागपूर

 

दोन्ही गटांची असंवेदनशीलता

रोहित वेमुला या विद्यार्थ्यांने आत्महत्या केली. सगळा देश पेटून उठला. प्रत्येक राजकीय पक्ष या घटनेचे भांडवल करण्यात आज मग्न झाला आहे. मुळात या घटनेचे  कोणतेही गांभीर्य न पाळता तो दलित होता म्हणून त्याच्यावर अन्याय झाला असे म्हणणारे विरोधी पक्षाचे लोक आणि याकूब मेननच्या फाशीला त्यांनी विरोध केला, विवेकानंदांबद्दल त्यांनी अनुदार उद्गार काढले म्हणून त्याच्या आत्महत्येबद्दल आम्हाला सोयरसुतक नाही ही भूमिका घेणारे लोक हे दोघेही आपली असंवेदनशीलता या निमित्ताने दाखवत आहेत.  मुळात त्या मुलाचे विमनस्क अवस्थेत लिहिलेले पत्र वाचले तरी या आत्महत्येचे कारण समजू शकते. त्या मुलाची विद्यापीठाकडून येणारी शिष्यवृत्ती थकली होती हे एक कारण दिसतेच. पण एकूणच त्याची मनोभूमिका निराशावादी आहे हे वास्तवही यातून समोर येते. म्हणून प्रशासनातील औदासीन्य आणि लालफीत नष्ट करणे आणि विद्यार्थ्यांच्या मानसिकतेत सकारात्मक बदल व्हावेत व त्याचे औदासीन्य जावे म्हणून प्रयत्न करणे हाच यावरचा उपाय आहे

अविनाश माजगावकर, पुणे

 

सुमारसद्दी थांबवा!

राज्यकर्त्यांच्या नव्या टीममध्ये सुमार मंत्र्यांचा जबाबदारीच्या पदावर भरणा झाला आहे. संसदप्रणाली आणि राज्य कारभाराबाबत किमान प्रशिक्षण देण्याची गरज आहे. संबंधित खात्याने विद्यार्थी संघटनेचा सल्ला ग्राह्य़ मानण्याऐवजी सोनिया गांधींच्या ‘नॅक’सारख्या त्या त्या क्षेत्रातील निष्णात लोकांचा सल्ला घेतला असता तर आजची नामुष्कीची वेळ सत्ताधाऱ्यांवर आली नसती. न्यायालयाचा निकाल धुडकावून आदेश हा केवळ नाइलाजाने शेवटचा उपाय म्हणून काढायचा असतो, लोकानुनयासाठी नव्हे, हे समजले असते.  मोजक्या धनदांडग्यांसाठी कोटय़वधी रुपयांच्या योजना आणि सवलती जाहीर करताना त्यांनी निर्माण केलेली संपत्ती तळागाळातील लोकांपर्यंत झिरपत जाते हा भ्रम दूर झाला असता आणि सार्वजनिक आरोग्य, शिक्षण, वीज-पाणीपुरवठय़ासाठी खर्च करताना हात आखडता घेतला नसता. अजून वेळ गेली नाही. साडेतीन वष्रे शिल्लक आहेत.

प्रभा पुरोहित, मुंबई

 

नवउद्यमांची व्याख्या अस्पष्टच कशी?

‘उद्यमारंभ आणि आरंभशूरता’ या अग्रलेखात (१८ जाने.) उद्यमारंभी भारत या योजनेबाबत उपस्थित केलेल्या मुद्दय़ांकडे नजर टाकल्यास, ‘आरंभा’तच या योजनेच्या यशस्वितेबद्दल प्रश्नचिन्ह उभे राहते. मुळात जनकल्याणकारी (!) योजनांचे लोकार्पण करताना आजवरचा, नियमांमध्ये शक्य तितकी लवचीकता ठेवणे, हा अलिखित नियम या वेळीदेखील पाळला गेला. ज्या नवउद्यमांसाठी ही योजना आहे त्या नवउद्यमांची ‘स्पष्ट’ व्याख्याही न करणे ही बाब इतर उद्योगांना या नवउद्यमांसाठीच्या सवलतींचा लाभ घेण्यास मोकळे रान उपलब्ध करील.

आधीच दिवाळखोरीत निघालेले उद्योग पुन्हा या पोकळ नियमांचा आधार घेऊन नवउद्यमांच्या नावाखाली बँकांना बुडवणारच नाहीत असे म्हणणे वेडेपणाचे ठरेल. मुळात या योजनेच्या भांडवलपुरवठय़ाचा बहुतेक भार बुडीत कर्जाने अगोदरच दबलेल्या सार्वजनिक बँकांवर टाकणे हे शहाणपणाचे नाही. सुरुवातीची तीन वष्रे करमुक्तीची तरतूद निर्थक वाटते. कारण एकदा फुकटेपणाची सवय लागली की मग तीन  वर्षांनंतर हे नवउद्यम कर भरताना नखरे करणारच! त्यामुळे सरसकरट करमुक्तीपेक्षा कमी दराने कर आकारणी हे दूरदृष्टीचे ठरले असते.

माहिती तंत्रज्ञानकेंद्रित नवउद्यमांमधील सगळा कामगारवर्गही उच्चशिक्षितच असणार, तेव्हा या कामगारवर्गासाठी नवा कामगार कायदा आवश्यक ठरतो. ‘उद्यमारंभी भारत’सारख्या योजनेची गरज कुणीही नाकारणार नाही; परंतु नवउद्यम या संकल्पनेचा गाभा असणारे ‘सूक्ष्म पृथक्करणा’चे (अ‍ॅनालिटिक्स) तत्त्व पाळले गेले तरच हा आरंभ सफल शेवटाला पोहोचेल.

किरण बाबासाहेब रणसिंग, नवी दिल्ली

असंघटित दुकान-कामगारांचेही आता हाल..

राज्यातील दुकाने रात्री ११ पर्यंत सुरू ठेवण्याच्या सरकारच्या निर्णयाचे सार्वत्रिक स्वागत होत असले तरी या धोरणाच्या दुसऱ्या पलूकडे दुर्लक्ष झाल्याची बाब लक्षात घेणे आवश्यक आहे. केवळ नफा कमावण्यास चटावलेले व्यापारी त्यांच्या दुकानातील कामगारांना या जादा तासांच्या कामासाठी अधिक पगार देतील वा अतिरिक्त कामगारांची भरती करून रोजगाराच्या संधी वाढवतील, अशी शक्यता या व्यापाऱ्यांचे आतापर्यंतचे वर्तन लक्षात घेता, कमीच. अशा वेळी या असंघटित कामगारांच्या होणाऱ्या पिळवणुकीला वाचा कोण फोडणार, हा कळीचा मुद्दा दुर्लक्षित राहतो. नाही तरी आता सगळे कामगार कायदे मालकधार्जणिे करण्याकडेच सरकारचा कल असल्याची बाब लपून राहिलेली नाही. विकासाची आस आणखी कुणाकुणाचे बळी घेणार, हे एक तो काळच जाणे.

डॉ. किरण शां. गायतोंडे, चेंबूर

 

आपण आजही राजकीय राष्ट्र

प्रा. शेषराव मोरे यांचा लेख (२० जाने.) वाचला.  आपण सध्या वास्तव्य करीत असलेला भारत १९४७ नंतरच एक अखंड देश म्हणून अस्तित्वात आला असून तत्पूर्वी कधीही या देशात आम्ही ‘भारतीय’ असल्याचा उल्लेख नाही. राजकीय एकता, एक अस्मिता, एक भाषा, एक समान इतिहास, असा वारसा भारताला कधीच लाभला नाही, कारण आपल्याकडे राजे आणि राज्ये आणि त्या त्या राज्यांची शासनपद्धती अस्तित्वात होती.  म्हणजेच ‘एक’ समान अशी ओळख आणि राजकीय ओळख आणि अस्मिता नव्हतीच.

जर आपण ‘सांस्कृतिक राष्ट्र’ होतो तर उत्तर भारत आणि दक्षिण भारत आणि आजचा ईशान्य भारत केवळ ‘सांस्कृतिक राष्ट्र’ या एका साच्यात बसेल का हे पाहावे.

राष्ट्र या भावनेला तडा देणारी जातीयता जर भारतात स्वातंत्र्यापूर्वी आणि आत्ताही सुखाने नांदत असेल तर आजही आपण राजकीय राष्ट्र आहोत. सामाजिक आणि ‘सांस्कृतिक राष्ट्र’ अजूनही आपण झालो नाहीत. हा उल्लेख मात्र मोरे यांच्या लेखात नव्हता याची खंत वाटली. आज भारत या राष्ट्रामध्ये दलित जाळले जातात, त्यांना या देशाचे अधिकृत नागरिक म्हणून ओळख नसेल तर आपल्या ‘राष्ट्रप्रेमा’लाच दाद द्यावी लागेल.

प्रा. स्वप्निल कांबळे, पुणे

 

विचारधारा जरा बाजूला ठेवा..

रोहित वेमुला या दलित संशोधकाच्या आत्महत्येने नऊ वर्षांपूर्वीच्या एका कार्यक्रमाची आठवण प्रकर्षांने  झाली. मुंबई, चेन्नई आणि कोलकाता विद्यापीठांना १५० वर्षे झाल्याच्या निमित्ताने मुंबई विद्यापीठात झालेल्या कार्यक्रमात इतिहास संशोधक आणि विचारवंत प्रा. रामचंद्र गुहा (रा. स्व. सं. आणि िहदुत्ववाद्यांचं नावडतं व्यक्तिमत्त्व) यांनी केलेल्या एका प्रतिपादनाची ही आठवण आहे.

गुहांनी महाविद्यालये वा विद्यापीठातील वर्गानी ‘प्ल्युरलिझम’ स्वीकारण्याची गरज व्यक्त केली होती. यात त्यांना शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी वर्गात आपली विचारधारा बाजूला टाकून शिक्षणाची गरज व्यक्त केली होती. विद्यापीठ वा महाविद्यालयीन स्तरावर ही अशी डावे-उजवे, दलित-सवर्ण  वादाची  झळ देशाला घातक आहे. जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालय हे समाजशास्त्रांसाठीचे ‘आयआयटी’ आहे, पण तिथले ‘डावे’ वैभव मोडून काढण्यासाठी भाजप आणि संबंधितांचे अलीकडे प्रचंड प्रयत्न चालले आहेत. एफटीआयच्या वादालासुद्धा राजकीय रंग देण्याची भाजपला गरज नव्हती, पण डाव्या विचारसरणीच्या वा इतर विचारसरणीच्या संघटनांनी मोदी सरकारच्या विरोधात ब्र जरी काढला तरी ते देशद्रोही म्हणून म्हणायची सवयच भाजपला लागली आहे.

म्हणूनच गुहा म्हणाले त्याप्रमाणे विद्यार्थी, शिक्षक वा प्राध्यापक यांनी विचारधारा बाजूला ठेवून वर्ग चालवावेत. खरी जबाबदारी प्राध्यापक वा शिक्षक यांच्यावर आहे. कारण तरुण वयात विद्यार्थ्यांचे रक्त सळसळणार. वादविवाद, चर्चा हे आवश्यक आहेत पण अशा प्रकारे गोष्टी घडायला लागल्या तर ते देशाला घातक आहे.

यावर एक उपाय म्हणजे डाव्या-उजव्या विचारसरणीच्या नेत्यांनी स्वत: याबाबत पुढाकार घेऊन असे वाद टाळण्याचा प्रयत्न करणे. पण सध्याचे भक्त आणि त्यांचे विरोधक बघता एवढय़ा समजूतदारपणाची अपेक्षा करणे हे दिवास्वप्नच ठरेल.

अमेय  फडके, कळवा (ठाणे)

 

आधी आयटीआयचे मूलभूत प्रश्न सोडवा

‘आयटीआयचे दुखणे’ या लेखात (२० जाने.) मांडलेली आयटीआयची व्यथा अत्यंत सार्थ आहे. देशातील व्यवसायाभिमुख आणि रोजगाराभिमुख शिक्षणाचा मुख्य घटक म्हणून राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे स्थान महत्त्वाचे आहे.  देशाच्या आíथक विकासात या प्रशिक्षित मनुष्यबळाची भूमिका निश्चितच महत्त्वपूर्ण आहे. त्याचप्रमाणे बेरोजगारीचा मूलभूत सामाजिक प्रश्नही त्याच्याशी निगडित असल्याने व्यावसायिक शिक्षणाला असणारे महत्त्व वादातीत आहे. त्यामुळेच कौशल्य विकासाला प्राधान्य देताना आयटीआयचे सर्व स्तरांवरचे, सर्व प्रकारचे मूलभूत प्रश्न सोडवून त्यास ऊर्जतिावस्था प्राप्त करून देण्यासाठी या क्षेत्राशी संबंधित असणाऱ्या प्रत्येकाने (कर्मचारी, निदेशक, प्रशासकीय खाते, राज्य / केंद्र सरकार) आपले राष्ट्रीय कर्तव्य समजून झटले पाहिजे.

सचिन अ. पांडे, यवतमाळ

 

खासगी तंत्रशिक्षणाला बळ जरा जपून..

विनोद दुर्गपुरोहित यांचा ‘आयटीआयचे दुखणे’ हा लेख (२० जाने.) वाचला. त्याखेरीज आणखी एक मुद्दा असायला हवा होता की आयटीआय ही फक्त प्रमाणपत्र देणारी संस्था नसून कार्यकुशल कामगार बनवणारा तंत्रकौशल्याचा कारखाना  आहे, पण सध्या यातून बाहेर पडणारे विद्यार्थी ‘कागदोपत्री’ आयटीआय उत्तीर्ण होत आहेत, हे दुर्लक्षित करून चालणार नाही. सरकारी प्रशिक्षण संस्था काही सलाइनवर तर खासगी संस्था (काही अपवाद वगळता) गरीब विद्यार्थ्यांचे रक्त शोषत आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रोत्साहनपर निर्णयाने अशा खासगी संस्थांना आणखीच  ताकद व बळ मिळाले आहे. बेरोजगार तरुणांची भाबडय़ा आशेने (नोकरीच्या) आíथक पिळवणूक व मानसिक खच्चीकरण न होईल कशावरून?

सौदागर किसन काळे, टाकळी (पंढरपूर)

 

ब्रिटिशांचा वैचारिक प्रभाव दीडशे वर्षांनंतरही कायम

‘भारत ‘राष्ट्र’ होते काय?’ हा  शेषराव मोरे यांच्या ‘संस्कृती-संघर्ष’ सदरातील लेख (२० जाने.) वाचला. या लेखातील दोन-तीन मुद्दे खटकणारे आहेत.

१.  पहिले म्हणजे, ‘अंदमान-निकोबार द्वीपसमूह प्राचीन भारतीय संस्कृतीचा भाग असल्याचा पुरावा उपलब्ध नाही,’  असे जे शेषराव म्हणतात, ते वस्तुस्थितीला धरून नाही.  पौराणिक आख्यायिकांचा विचार केल्यास, ‘अंदमान’ हे नाव रामायणातील ‘हनुमान’ या नावावरून पडल्याचे सांगितले जाते. (हनुमान – हन्दुमान – अन्दुमान -अंदमान). तर ‘निकोबार’चे मूळ तमिळ नाव नक्कवरम (अर्थ- नग्न लोकांचा प्रदेश) असे आहे. राजेंद्र चोल (इ.स. १०१४  ते इ.स. १०४२) हा तमिळनाडूच्या प्रसिद्ध चोल राजघराण्यातील एक पराक्रमी राजा होऊन गेला. त्याने अंदमान-निकोबार द्वीपसमूहाचा ताबा घेऊन, सुमात्रा (इंडोनेशिया)च्या श्रीविजय साम्राज्याविरुद्ध लढण्यासाठी तिथे आपला कायमस्वरूपी आरमारी तळ स्थापन केला. त्या बेटांना त्या काळी तिनमत्तीवू असे संबोधले जाई. चोल राजवंशाच्या आमदानीत निकोबार बेटांचे नाव नक्कवरम असल्याचे तंजावरच्या इ.स. १०५०च्या शिलालेखांवरूनही स्पष्ट होते. इसवी सनाच्या बाराव्या-तेराव्या शतकातील प्रसिद्ध जगप्रवासी मार्को पोलो यानेही आपल्या प्रवास वर्णनांत या बेटांचा उल्लेख  ‘नेकुवेरन’ (Necuveran) असा केलेला आढळतो.

२.  दुसरे म्हणजे, शेषराव यांच्या म्हणण्यानुसार, ‘ब्रिटिशांनी भारतीयांत धर्मभेद, पंथभेद, जातिभेद निर्माण करून त्यांची एकराष्ट्रीयत्वाची भावना नष्ट केली हा आरोप खरा नसून, उलट त्यांच्यामुळेच जास्तीत जास्त भारत एकराष्ट्रीय झाला. आपण एकराष्ट्रीय आहोत, ही जाणीव भारतीयांत (ब्रिटिशांमुळे) निर्माण झाली. भारताला एकराष्ट्र बनवावे, या दृष्टीने त्यांनी येथे राज्य स्थापन केल्यावर एकराष्ट्रीयत्वासाठी अडथळे असणारी भारतीय संस्थाने खालसा करण्याचा उपक्रम हाती घेतला.’(!)  पुढे १८५७चा ‘उठाव’ मोडून काढला गेला, याला शेषराव ‘सुदैव’ म्हणतात. कारण त्यामुळेच १९४७ला अखंड भारताच्या मागणीसाठी ब्रिटिश भारत शाबूत राहिला. ब्रिटिशांच्या संस्थाने खालसा करण्यामागे -साम्राज्य- विस्तारवाद, वसाहतवाद किंवा साध्या शब्दात सांगायचे तर उघडा स्वार्थ होता, असे समजले जाते. पण तसे नसून, केवळ ‘भारतीयांमध्ये एकराष्ट्रीयत्व निर्माण व्हावे’ या नि:स्वार्थ हेतूने, त्या एकराष्ट्रीयत्वात ‘अडथळा’ बनणारी संस्थाने खालसा केली गेली, हे खरोखरच कौतुकास्पद आहे! अर्थात, १८५७च्या ‘उठावा’ला आपण आजवर उगीचच ‘पहिला भारतीय स्वातंत्र्यसंग्राम’ वगरे म्हणत आलो. ते तर  एकराष्ट्रीयत्वात ‘अडथळे’ बनू पाहणाऱ्या संस्थानिकांचे ‘बंड’च म्हणायचे.(?!) बरे झाले. सातासमुद्रापलीकडून परोपकारी, नि:स्वार्थी ब्रिटिश आले आणि त्यांनी ते ‘बंड’ चिरडून, भारतीयांना एकराष्ट्रीयत्वाचे ‘वरदान’ दिले!

३. लेख वाचताना मार्च १९४२च्या ‘स्टॅफर्ड क्रिप्स योजने’अंतर्गत झालेल्या वाटाघाटींची आठवण होणे साहजिक आहे. मोरे यांचे या संबंधीचे विचार (जानेवारी २०१६ मधील) समजले, तर इंग्लंडमधील ज्या कुठल्या कबरीत सर क्रिप्स चिरनिद्रा घेत असेल, तिथे त्याच्या आत्म्यास आनंदाच्या उकळ्या फुटतील, यात शंका नाही. कारण सर क्रिप्स यांचे- प्रांतांना संघराज्यातून फुटून बाहेर निघण्याचे ‘स्वयंनिर्णयाचे’ स्वातंत्र्य देणारी धूर्त क्रिप्स योजना पुढे रेटताना- जे विचार होते, नेमके तेच विचार मोरे जवळजवळ पाऊण शतकानंतर (स्वतंत्र भारतात) मांडत आहेत!

स्वयंनिर्णयाच्या गोड नावाखाली, पाकिस्तानची मागणीच मुस्लिमांच्या/ मुस्लीम लीगच्या पदरात सरळ टाकण्याचा ब्रिटिशांचा डाव होता. ‘ िहदुस्थान हे अभिन्न, एकछत्री राज्य कधीच नव्हते,’ या क्रिप्स यांच्या म्हणण्याचा भक्कम प्रतिवाद स्वा. सावरकरांनी त्यांच्या क्रिप्सबरोबर झालेल्या भेटीत केला होता. कॅनडा किंवा दक्षिण आफ्रिकेची उदाहरणे, जी क्रिप्स यांनी आपल्या म्हणण्याच्या पुष्टय़र्थ दिली होती, ती भारताला लागू होत नाहीत. कारण येथील परिस्थिती नेमकी उलट आहे, हे सावरकरांनी दाखवून दिले होते (धनंजय कीरलिखित स्वातंत्र्यवीर सावरकर चरित्र, प्रकरण १६,- क्रिप्स शिष्टाई).

ब्रिटिशांनी इथे प्रत्यक्ष राज्य जरी दीडशे वष्रे केले, तरी त्यांचा वैचारिक प्रभाव, आज इतक्या वर्षांनंतरही कायम आहे, हेच त्यांचे खरे यश म्हणावे लागेल.

श्रीकांत पटवर्धन, कांदिवली (मुंबई)

 

कोणती कौशल्ये हवी, याकडे लक्ष हवे! 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच मोठय़ा दणक्यात ‘प्रधानमंत्री कौशल्यविकास योजने’चा शुभारंभ केला. अर्थात आकर्षक आणि लोकप्रिय घोषणा करण्यात मोदीजींचा हात आजवरच्या सर्व पंतप्रधानांमध्ये (काही सन्माननीय अपवाद वगळता) कोणीही धरू शकणार नाही; मात्र या घोषणा कशा व कितपत कार्यान्वित होतात याकडेही लक्ष पुरवले गेले पाहिजे.

पंतप्रधान प्रत्यक्षात सात हजार नवीन आयटीआय उघडण्याविषयी भाष्य करीत असताना, त्यांनी देशातील पूर्वीच अस्तित्वात असणाऱ्या व ओस पडत चाललेल्या (उदा. महाराष्ट्रातच ४१७ शासकीय व ४५४ खासगी) आयटीआयची अवस्था एकदा पाहून घ्यावी. नवीनऐवजी तोच निधी जुन्याच आयटीआयच्या पुनरुज्जीवनासाठी वापरण्यात काहीच हरकत नसावी, ज्यामुळे सद्य:स्थितीपेक्षा दुप्पट विद्यार्थी अधिक चांगल्या रीतीने, उच्च दर्जाचे प्रशिक्षण घेऊ शकतील. त्यातही मागणी नसलेल्या ट्रेड्सच्या जागा कमी करून त्याऐवजी मागणी असणाऱ्या ट्रेड्सचे कुशल प्रशिक्षण देण्यात यावे. (उदा. वेल्डरसारख्या ट्रेड्सचे, ज्याचे कुशल कामगार भारतात अत्यल्प म्हणजेच फक्त चार टक्के आहेत व त्याची मागणी ‘मेक इन इंडिया’सारख्या योजनांमुळे नजीकच्या भविष्यकाळात पाच लाखांहून अधिक असणार आहे.)

रिक्त पदे, तज्ज्ञ शिक्षक, उपलब्ध जागा, यंत्रसामग्री यांवाचून जी अवस्था आयटीआयची झाली आहे तशीच, किंबहुना त्याहून वाईट अवस्था खासगी अभियांत्रिकी महाविद्यालयांची झाली आहे. त्यावरून ‘मागणी, पुरवठा व गुणवत्ता’ यांचे गणित कुठे तरी चुकत असल्याचे निदर्शनास येईल. जागतिक पातळीवर विकसित देशांच्या तुलनेत (६० ते ७० टक्के युवक प्रशिक्षित-कौशल्यधारक) भारतातील कौशल्यधारक युवकांचे प्रमाण अत्यंत कमी (तीन ते चार टक्के)आहे. यामध्ये सुधार घडवून आणण्यासाठी विद्यार्थ्यांना महाविद्यालयात शिकत असतानाच ‘उद्योगसंलग्नित शिक्षण’ (इंडस्ट्री अटॅच्ड एज्युकेशन) शिक्षण मिळणे गरजेचे आहे. ज्यायोगे पुस्तकी अभ्यास आणि प्रत्यक्ष कार्यानुभव, म्हणजेच ‘उपलब्ध ज्ञान व त्याचा प्रत्यक्ष उपयोग’ यांच्यामध्ये समन्वय साधला जाईल.

असे झाल्यास, निश्चितच स्वयंरोजगार क्षमता देखील वाढीस लागेल!

जगदीश दळवी (बी. ई.मेकॅनिकल) मु.पो. बुद्रुकवाडी (ता. माढा, सोलापूर)

‘फायटोप्लॅटन’वर भरपूर संशोधन

$
0
0

‘फायटोप्लॅटनने जुहूचा समुद्रकिनारा निळाभोर’ ही बातमी (२१ जाने.) वाचली. हा नवीन प्रकार नसून आपल्याकडे यावर फार संशोधन झाले आहे. मत्स्य महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. आर. प यांनी या विषयावर पीएच.डी. केली आहे.  Vibrio harveyi हा जिवाणूचा प्रकार आहे. तो आपल्याकडील सर्व समुद्रकिनाऱ्यांवर सापडतो. रत्नागिरीमध्ये शिकत असताना आम्ही अनेकदा रात्री हा प्रकार पाहायला जात असू. कोळंबी संवर्धन करणाऱ्यांसाठी हा जिवाणू अपायकारक असून अन्य सागरी जीवांना त्याचा फारसा धोका नसतो.
– मुरारी भालेकर

दिलखुलास मुलाखत
‘लोकसत्ता’च्या वर्धापन दिनप्रसंगी ‘खुर्चीपलीकडचे मुख्यमंत्री’ या कार्यक्रमात घेतलेली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत खरोखर अप्रतिम होती. एक उत्तम निर्मिती पाहायला मिळाली. जितेंद्र जोशी यांनी एखाद्या कसलेल्या पत्रकार किंवा मुलाखतकाराप्रमाणे कार्यक्रमात जान आणली. आपले मुख्यमंत्री कोणत्याही पक्षाचे असोत, पण एक जमिनीवर पाय असलेला माणूस मुख्यमंत्री आहे याचा आनंद आणि समाधान वाटलं.
तरुण वर्गात फडणवीस यांची बरीच क्रेझ आहे. प्रत्येक तरुणाने आदर्श ठेवावा असेच त्यांचे व्यक्तिमत्त्व आहे. आज माध्यमे आक्रमक नसून आक्रस्ताळी बनली आहेत. या पाश्र्वभूमीवर ‘खुर्चीपलीकडचे मुख्यमंत्री’ पाहून मन खूश झाले. काही तरी सकारात्मक ऐकल्याचे समाधान वाटले.
– आदित्य बोकारे, नागपूर

मोदींचा खरा चेहरा हिंदुत्वाचाच
अमित शहा यांची भाजपचे अध्यक्ष म्हणून फेरनिवड झाल्याच्या निमित्ताने ‘द इंडियन एक्स्प्रेस’च्या २१ जानेवारीच्या अंकात ‘अमित शहा सेट टू स्टार्ट फुल टर्म अ‍ॅज बीजेपी चीफ संडे’ या शीर्षकाखाली प्रसिद्ध झालेल्या वृत्तात सुरुवातीलाच म्हटले आहे की, विकास आणि हिंदुत्व ही मोदींच्या राजकीय कार्यक्रमातील महत्त्वाची कलमे आहेत. मला वाटते की, मोदींना वैचारिक पातळीवर सेक्युलॅरिझमच्या मुद्दय़ावरून प्रखर विरोध का होतो हे यावरून स्पष्ट व्हावे. भारतीय राज्यघटनेचा गाभा ‘निधर्मी राष्ट्रवाद’ हा आहे, तर हिंदुत्वाच्या विचारसरणीचा आत्मा ‘सांस्कृतिक राष्ट्रवाद’ आहे. भारताच्या जडणघडणीच्या दृष्टीने हा मुद्दा अत्यंत मूलगामी असून त्याकडे तथाकथित विकासाच्या नावाखाली दुर्लक्ष करणे, हे आपल्यासाठी सतत डोकेदुखी ठरलेल्या पाकिस्तानच्या उदाहरणावरून भविष्यात भलतेच धोकादायक ठरू शकते, याचे भान आपण ठेवायला हवे.
भारतीय राजकारणाच्या संदर्भात एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की, भाजप व शिवसेनेचा अपवादवगळता इतर कुठल्याही पक्षाला सांस्कृतिक राष्ट्रवादाची व पर्यायाने ‘राष्ट्रा’ची संकल्पना मान्य नाही. सबब, जोपर्यंत मोदी निसंदिग्धपणे व जाहीरपणे सांस्कृतिक राष्ट्रवादाची संकल्पना नाकारत नाहीत, तोपर्यंत त्यांना प्रखर विरोध होतच राहणार व खुद्द भारतीय राज्यघटनेच्या अंगाने विचार करता तसेच व्हायला हवे. सतत ‘विकास, विकास’ म्हणत मोदी असे भासविण्याचा प्रयत्न करतात की, आतापर्यंत भारत जणू मागास राहिलेला आहे. वस्तुस्थिती अशी आहे की, भारत जर मागास राहिलेला असेल तर तो वैचारिक दृष्टीने आहे. दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी यांना अभिप्रेत असलेला विवेकवाद व जीवनासंबंधीचा वैज्ञानिक दृष्टिकोन ज्यात देवभोळेपणा व अंधश्रद्धेला अजिबात स्थान नाही, त्यापासून आपला समाज आज तुटलेला आहे. संस्कृती, परंपरा, पावित्र्य यांचे हितसंबंधीयांकडून जाणीवपूर्वक इतके स्तोम माजविले जात आहे की, राज्यघटनेला अभिप्रेत असलेल्या स्वातंत्र्य, समता व बंधुभाव या मूलभूत संकल्पनांचा समाजाला विसर पडावा. आणि या दृष्टीने कोणी प्रयत्न केला की, धर्माचे स्वयंघोषित हिंदुत्ववादी ठेकेदार त्याला धर्मद्रोही ठरवणार. विशेष म्हणजे राज्यघटनेशी बांधिलकी असल्याची शपथ घेऊन पंतप्रधानपदी विराजमान झालेल्या मोदींना या बाबतीत काहीही देणे-घेणे नाही. अन्यथा विज्ञान परिषदेत गणपतीची सोंड हा वैदिक काळात आपल्याकडे प्लॅस्टिक सर्जरी होत असल्याचा पुरावा आहे, असे तद्दन भंपक विधान त्यांनी केले नसते. तसेही ठोकून द्यायचे हा मोदींचा स्वभावविशेष आहेच. अगदी ताजे उदाहरण म्हणजे ब्रॉडगेज रेल्वे व वीजनिर्मितीच्या अनुषंगाने आसाममधील जाहीर सभेत त्या राज्याच्या सरकारला अतिउत्साहाच्या भरात कानपिचक्या देण्याच्या नादात मोदींनी केलेली बेफाम विधाने. सबब, मोदींसारखा नखशिखान्त संघप्रचारक जोपर्यंत पंतप्रधानपदी आहे, तोपर्यंत त्याला प्रखर विरोध होणारच.
– संजय चिटणीस, मुंबई

इरावतीबाईंचे विचार दीपस्तंभासारखे!
सध्या प्रा. शेषराव मोरे यांच्या लेखावरील आणि डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या विचारावरील चर्चा तसेच काही काळापूर्वी भालचंद्र नेमाडेप्रेरित देशीवाद चर्चा हे सर्व वाचत असताना इरावती कर्वे लिखित ‘आमची संस्कृती’ या पुस्तकाची आठवण झाली. देशमुख आणि कंपनीने १९६० मध्ये हे पुस्तक प्रकाशित केले होते. त्यांचे विचार व संशोधनात्मक अभ्यास, जो १९५६ मध्ये मांडलेला होता त्यात आणि आजच्या परिस्थितीत काडीचाही बदल झालेला नाही, एवढे आम्ही विचारांनी गोठून गेलेले आहोत हे जाणवले. इरावतीबाई ६० ते १०० वष्रे विचारांनी आम्हा सर्वाच्या पुढे होत्याच. त्यांच्या लिखाणात त्यांचे समकालीन डॉ. आंबेडकर किंवा फुले दाम्पत्य यांचा उल्लेख नाही; परंतु आगरकरांबद्दलचे आदरणीय उल्लेख येताना दिसतात. असो. तरीही त्या विचाराने आज दीपस्तंभच ठरतात.
– रंजन र. ई. जोशी, ठाणे

ही होरपळ कधी संपणार?
पाकमध्ये दहशतवाद्यांनी यावेळी विद्यापीठाला लक्ष्य केले. दहशतवादाशी सामना करण्यासाठी पाकिस्तान सज्ज असल्याचे तेथील लष्कर व नेते सांगत असतात. पण त्यांच्या दृष्टीने काही दहशतवादी चांगले तर काही वाईट आहेत. मग दुसरे काय होणार? खरे तर दहशतवाद्यांमध्ये असा भेदभाव करताच येत नाही. भारतद्वेषातूनच पाकिस्तान दहशतवादाला पोसत असून ते असा भेद न करता दहशतवादावर प्रभावी कारवाई करतील तेव्हाच तेथील लोकांची होरपळ थांबेल.
– संदीप संसारे, ठाणे

महत्त्वाकांक्षी योजनेची राखरांगोळी

$
0
0

‘आपण सारे हंगामी’ हा अग्रलेख (२२ जाने.) वाचला. आज तंत्रशिक्षण संचालनालयातील हंगामी पदांप्रमाणेच ७०% महाविद्यालयांमध्येदेखील हंगामी/तात्पुरत्या स्वरूपाचे प्राचार्य महाविद्यालयाचा कारभार ढकलत आहेत. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने घालून दिलेल्या नियमांची, अटी व शर्तीची राजरोसपणे पायमल्ली केली जात आहे. आज ‘मेक इन इंडिया’च्या अंतर्गत ‘स्किल इंडिया’ ही योजना राबविण्यासाठी सरकारने कटिबद्धता दाखवायला सुरुवात केली आहे; परंतु वास्तविकता अतिशय सुन्न करणारी आहे. जी महाविद्यालये स्किल इंडिया या अंतर्गत कम्युनिटी कॉलेजची संकल्पना राबविण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहेत, त्यांनी सर्व प्रकारच्या परवानग्या २०१२ मध्येच प्राप्त केल्या आहेत व सद्य:स्थितीत अनेक प्रकारांनी कौशल्य विकासाचे शिक्षण देत आहेत अशा महाविद्यालयांना मनुष्यबळ विकास व अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद यांनी मान्यता देऊनही अद्यापपर्यंत तीन वर्षांत एकाही रुपयाची मदत प्राप्त झालेली नाही. एकीकडे सरकार दाखवीत असलेला उत्साह, तर दुसरीकडे अकार्यक्षम हंगामी कर्मचारी यांमध्ये तंत्रशिक्षणाशी निगडित असलेल्या ‘मेक इन इंडिया’ या महत्त्वाकांक्षी योजनेची व ‘कौशल विकास योजना’ या स्वप्नांची राखरांगोळी होत आहे. हंगामी कर्मचाऱ्यांची अशीच परिस्थिती मुंबई विद्यापीठ व विद्यापीठाशी संलग्न असलेल्या महाविद्यालयांमध्येही आहे. माहितीच्या अधिकारामध्ये प्राप्त झालेल्या माहितीनुसार आज जवळपास ३०० कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयांमध्ये पूर्णवेळ प्राचार्य नाहीत. तसेच १९९९ पासून विद्यापीठाने सुरू केलेल्या विनाअनुदानित तत्त्वावरील विषयांसाठी हंगामी शिक्षक कार्यरत आहेत. हेच शिक्षक विद्यापीठात परीक्षांचे पेपर काढणे व पेपर तपासणे, मॉडरेशन करणे अशी कामेही सर्रासपणे करत आहेत. एकीकडे उच्च व सर्वोच्च न्यायालय शैक्षणिक क्षेत्रातील गुणवत्तेबाबत संवेदनशील आहे; परंतु शिक्षण क्षेत्रातील मातब्बर मंडळी यांकडे सोयीस्करपणे कानाडोळा करीत आहेत. अग्रलेखातून सरकारने खरोखरच काही बोध घेतला, तर शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी नक्कीच मदत होईल. तसेच ‘मेक इन इंडिया’, ‘स्किल इंडिया’ या महत्त्वाकांक्षी व रोजगाराभिमुख योजना प्रभावीपणे राबविता येतील.
– सुभाष आठवले, अंबरनाथ
कन्या‘दान’पेक्षा कन्या‘कल्याण’ महत्त्वाचे
राज्य सरकारने बाळासाहेब ठाकरे कन्यादान योजना सुरू केली. या योजनेची जाहिरात वाचून आपले सरकार सांभाळणाऱ्यांनी काळाच्या पुढे जाऊन विचार करायचे सोडा, निदान बदलत्या काळाप्रमाणे विचार करायला शिकणे किती आवश्यक आहे हे प्रकर्षांने जाणवते. एसटी महामंडळ मुलींची काळजी घेणार म्हणजे काय? तर म्हणे २१ व्या वर्षी लग्नासाठी एक लाख रुपये देणार! म्हणजे मुलीसाठी करायचा एकमेव खर्च म्हणजे लग्नाचा खर्च, असे सरकारला सुचवायचे आहे का? आपल्या कर्मचाऱ्यांनी मुलींना त्यांच्या इच्छेप्रमाणे शिकवावे यासाठी त्यांना प्रोत्साहन म्हणून सरकारने मदत करणे जास्त आवश्यक आणि कालसुसंगत आहे. मुलगी जन्माला आल्यानंतर आता तिच्या लग्नासाठी पसा कसा आणायचा, अशी चिंता आत्ताच्या काळातील पालक करत नाहीत. तर मुलांप्रमाणे मुलीसुद्धा शिकण्याची व आपले भविष्य ठरवण्याची संधी देण्याची मानसिकता समाजामध्ये जम धरू लागली आहे. मात्र याचे भान आपल्या सरकारला नसेल तर पुढील धोरणे ठरवताना अजून काय घडेल हे सांगणे अवघड आहे.
जलयुक्त शिवारसारखी योजना ज्याप्रमाणे अत्यंत मूलभूत विचार करून आणली व यशस्वी केली गेली त्याचप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी या विषयात लक्ष घालून मुलींना शिक्षण, रोजगाराच्या मुबलक संधी आणि सुरक्षित वातावरणाची संधी देणारी व कन्या‘दान’ करण्यापेक्षा कन्या‘कल्याण’ करण्यासाठी प्रोत्साहन देणारी योजना आणण्याचा तातडीने विचार करावा.
– चेतन एरंडे, पुणे
भारावून टाकणारी मित्र-भेट
डॉ. अरूण टिकेकर या मूर्तिमंत ज्ञानवंत, थोर तत्त्वज्ञ, ज्ञानोपासक ज्येष्ठ पत्रकाराच्या निधनानंतर समाजमाध्यमातून त्यांच्या माजी सहकाऱ्यांकडून काही उलटसुलट प्रतिक्रिया उमटल्या तरी त्यांची एक आठवण मी सांगू इच्छितो. ही १९९३ सालच्या मे महिन्यातील घटना होय. वसईतील निर्मळ गावच्या जीवन विकास मंडळाच्या वर्धापन कार्यक्रमासाठी ते आले होते. त्या कार्यक्रमात माझ्या ‘छोटा शास्त्रज्ञ’ या मुलांसाठीच्या तीन पुस्तिकेचे प्रकाशन होते आणि टिकेकरसाहेबांना मुंबईतून आणण्याची जबाबदारी माझ्यावर होती. त्यांच्या गाडीतून येताना आमच्या खेळीमेळीत गप्पागोष्टी झाल्या. वाटेत त्यांनी मला वसईत स्थायिक झालेल्या त्यांच्या जुन्या मित्राला भेटण्याची इच्छा व्यक्त केली. ते मित्र म्हणजे माणिकपूरला राहणारे भिडस्त स्वभावाचे सुप्रसिद्ध लेखक अनंत कदम होत. वसईत अडगळीत पडलेल्या आपल्या या साहित्यिक मित्राला ते मुंबईतून पिकलेल्या आंब्याची भेट घेऊन आले होते. त्यांची गळाभेट झाली व त्यांनी कदमांची आपुलकीने चौकशी केली. इतकेच नव्हे, तर त्यांना ‘लोकसत्ता’मध्ये पुस्तकांची परीक्षणे लिहिण्याचे कामदेखील देऊ केले. ती एक भारावून टाकणारी मित्र-भेट होती.
– जोसेफ तुस्कानो, बोरिवली (मुंबई)
ही असमानता कमी करता येणे शक्य
‘येऊरच्या लखलखाटात जांभूळपाडा मात्र अंधारलेलाच!’ ही बातमी (२१ जाने.) वाचली. जांभूळपाडाच कशाला, असे अनेक आदिवासी पाडे आणि गावे अजूनही अगदी मूलभूत गोष्टींपासून वंचित आहेत. शहरातील मोठमोठय़ा दुकानांतील तसेच बाहेरील दिव्यांचा झगमगाट पाहिला की या विरोधाभासाचे खूप वाईट वाटते. आलिशान मॉल्समध्ये तर दिवसाही दिव्यांचा लखलखाट असतो. एवढा विजेचा अपव्यय थांबवला तर अनेक पाडे उजळू शकतात. याचा अर्थ असा की, ज्यांची ऐपत नाही, त्यांच्या नशिबात अंधारात चाचपडणे आणि धनिकांना मात्र या मौल्यवान ऊर्जेची वाट्टेल तशी उधळपट्टी करण्याची मुभा! ही दरी आणि असमानता कमी करता येणे शक्य आहे. हवी आहे ती फक्त इच्छाशक्ती आणि ती कोण दाखवणार, हाच खरा प्रश्न आहे!!
– उज्ज्वला सु. सूर्यवंशी, ठाणे

हे असे का व्हावे?
‘मेड इन इंडियाचे काय?’ हा गिरीश कुबेर यांचा लेख (अन्यथा, २३ जाने.) वाचला. सत्य कोणी सांगितले तर ते कटू असल्यामुळे कडू लागते. आपला माणूस नवे यंत्र शोधू शकत नाही, पण जुने जास्त टिकवू शकतो. १९५० पासून मला साधारण असे दिसते की, इंजिनीयिरग, मेडिकल शिक्षणाकडे बुद्धिमान (म्हणजे परीक्षेत जास्त गुण मिळवणारे) लोक गेले, त्यांनी उच्च पदे मिळवली, पण आपल्या विषयात नवे आणि मूलभूत असे फारसे काहीही निर्माण केले नाही. उद्योजक नवी तंत्रे वापरायचे त्या वेळी आमच्याकडे जणू इंजिनीयिरगचा जुना अभ्यासक्रम म्हणजे इंजिनीयिरगचा इतिहास शिकविला जायचा! आपल्या लोकांमध्ये संशोधक वृत्ती आणि दृष्टी नाही का? गोऱ्या साहेबाने सांगितले आणि आम्ही मान डोलावली. साहेबाला कोणी प्रश्न विचारला नाही, कारण आम्हाला तो कधी पडलाच नाही. जे विद्या क्षेत्रात धुरंधर होते त्यांनी संशोधन का केले नाही? का आपल्याला ती दृष्टीच नाही?
माझे एक संशोधक मित्र आहेत, त्यांनी मला एकदा सांगितले की, साहेबाच्या संशोधनाला आव्हान देण्याची माझी वृत्ती असल्यामुळे मी नवे काही तरी करू शकलो. त्यांच्या आजूबाजूचे वरचे आणि खालचे सगळे आत्मसंतुष्ट. जरा यांनी काही नवा विचार मांडला, की वरिष्ठ जळायचे, कनिष्ठ टर उडवायचे. पठडीतल्या वृत्तीला भारी पगार आणि नोकरीतल्या मानमरातबाची साथ असली की कुठले आले संशोधन! सगळे पोटार्थी का निघावेत? सुविधा, पशाचे पाठबळ नाही हे कारण होतेच आणि आहेच, पण आमच्या रक्तात तो गुण नाही का? असेल तर त्याला पोषक वातावरण निर्माण करायला नको का? परदेशी जाणाऱ्यांमुळे ब्रेनड्रेन होतो हे म्हणणेही खरे नाही. त्या लोकांनी तिथे फारसे मूलभूत संशोधन केल्याचे ऐकिवात नाही. इथे भारी पगार नाहीत, वातावरण पटणारे नाही म्हणून लोक तिकडे जातात. अपवाद असतातच. त्यांनी ते इथे असते तर काही भारी केले असतेच असेही नाही.
– यशवंत भागवत, पुणे
पुस्तकाविषयी औत्सुक्य
‘लोकसत्ता’मधील ‘बुकबातमी’ हे सदर मी आवर्जून वाचतो. गुन्हेगार सुरेश छारा आणि पत्रकार रेवती लौल यांच्याविषयी छोटीशी (परंतु माझ्या मते बऱ्यापकी महत्त्वाची) माहिती ‘हिंसेचा पुनशरेध घेताना’ मध्ये (२३ जाने.) वाचायला मिळाली. नरोडा पटियामधील २००२ सालच्या दंगलीतला छारा हा एक गुन्हेगार. तो जुल २०१५ मध्ये जामिनावर सुटला. गुरुवारी (२१ जाने.) रेवती छाराला भेटल्या, त्या वेळी त्याने त्यांना मारहाण केली इ. इ. २००२ ते २०१५ या तेरा-चौदा वर्षांत छाराने कसे आयुष्य व्यतीत केले असेल? पोलिसांच्या ताब्यात असताना पोलिसांनी त्याला किती आणि कशा भयंकर प्रकारे छळले असेल, हे कुणीही सहज, नीट समजू शकतो! त्यानंतर तुरुंगातल्या इतर कैद्यांनी त्याच्यावर काय अत्याचार केले असतील, हे तोच जाणे! २००२ साली, जेव्हा तो त्या दंगलीत सहभागी झाला, तेव्हा त्याची मन:स्थिती काय होती? कोणी सांगू शकेल छातीठोकपणे? तो स्वत:हून त्या दंगलीत गेला होता, दंगलखोरांचा म्होरक्या होता, की कोण्या गलिच्छ राजकारण्याच्या चिथावणी देणाऱ्या भाषणामुळे चिथावला गेला होता? जर तो गुन्हेगारी प्रवृत्तीचाच असेल तर आणि नसेल तर या कैदेतल्या काळाचा त्याच्यावर काय आणि किती मोठा प्रभाव पडला असेल?
समजा, तो गुन्हेगारी वृत्तीचा नसेल, तर इतक्या वर्षांत आपल्या ‘मायबाप’ न्यायसंस्थेने त्याचे पुनर्वसन केले, की त्याला गुन्हेगारीच्या गत्रेत, चिखलात अजून खोल ढकलले? रेवती लौल यांच्या या पुस्तकाविषयी खूप औत्सुक्य निर्माण झाले आहे.
– डॉ. राजीव देवधर, पुणे

मोदी यांची अवैज्ञानिक विधाने दुर्दैवी; पण कोणते सरकार बुद्धिवादी होते?

$
0
0

‘मोदींचा खरा चेहरा हिंदुत्वाचाच’ पत्र वाचले. शेजारीच गिरीश कुबेरांचा लेख आहे, त्यात आपल्या समाजात विज्ञाननिष्ठता कशी रुजलेली नाही, याचे विवेचन आहे. त्या अवैज्ञानिक मानसिकतेचा परिणाम संस्कृती, परंपरेतल्या अवैज्ञानिक गोष्टींचे अस्मितेच्या नावाखाली समर्थन करण्यात होतो. पंतप्रधानपदावरून मोदी अत्यंत अवैज्ञानिक अशी विधानं करतात, हे दुर्दैवी आहे, पण याची दुसरी बाजू पाहायला गेलं तर; आज समाज जो धार्मिक एकांगतेकडे, ध्रुवीकरणाकडे झुकलेला दिसतो, त्याची बीजं स्वातंत्र्यापासूनच हळूहळू पेरली जात होती, असे वाटते. ‘मोदी सरकार’ हे ‘कारण’ नसून ‘परिणती’ आहे. कारण गेली कित्येक दशकं कोणत्याही राज्य अथवा केंद्र सरकारनं निखळ धर्मनिरपेक्ष, विज्ञानवादी, बुद्धिवादी भूमिका घेतल्याचं माहिती नाही. वेळोवेळी पुस्तकांवर बंदी घालणं, सिनेमांवर र्निबध घालणं, वेळ पडल्यास सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय फिरवणं, जादूटोणाविरोधी कायदा संमत न करणं, असले आचरट चाळे ‘निधर्मी राज्यघटना’ मानणाऱ्या पक्षांच्या सरकारांनी केले आहेत. हे मतांसाठीचे लांगूलचालन कधी मुस्लिमांचे झाले तर कधी हिंदूंचे. ‘भावना दुखावल्याच्या’ नावाखाली आंदोलने, हिंसा केली की कोणतेही सरकार नमते घेते, हे या लोकांना कळले आहे. हे अगदी वंदे मातरम्च्या काटछाटीपासून, आताच्या गोहत्या बंदीपर्यंत चालू आहे. प्रत्येक प्रसंगातील तपशिलात फरक असला तरी, प्रतिगामी शक्तींना बळ देण्याचे कार्य हे धर्मनिरपेक्ष सरकारांनीच पार पाडले आहे. शिवाय सरकारी अथवा बिगरसरकारी पातळीवरून विज्ञानाचा प्रसार, तुरळक अपवाद वगळता, कधी जोमाने झालाच नाही. या सर्वाचा परिणाम म्हणजे समाज विज्ञानवादी होण्यापेक्षा धार्मिक, परंपरावादी होण्यात जास्त समाधान मानतो. या मानसिकतेच्या अतिरेकी प्रवृत्ती वाढत आहेत. त्याचेच परिणाम आपण भोवती पाहतो आहोत.
त्यामुळे, मोदीविरोधक ‘संघप्रचारक’ मोदींना हरवू शकतील; पण समाजाचा लंबक जो आधीच कट्टरतेकडे झुकला आहे, तो जागेवर कसा आणतील? मोदी सत्तेवरून गेल्याने सर्व काही आलबेल होईल असे मानणे, हा एक तर भोळेपणा आहे किंवा वेड पांघरून पेडगाव गाठण्याचा प्रकार आहे. निधर्मी, विज्ञानवादी राष्ट्रवाद जोपासायचा असेल तर; पुरोगामी शक्तींनी ‘मोदी सरकार’ हे ‘कारण’ नसून स्वातंत्र्यापासून आतापर्यंत झालेल्या बेगडी, स्वार्थी आणि संधिसाधू राजकारणाचा ‘परिणाम’ आहे, हे लक्षात घेतले पाहिजे.
आशीष चासकर, पुणे

मोदींनी कृतीतून विश्वास कमवावा
हैदराबाद विद्यापीठाचे कुलगुरू अप्पा राव यांचा दलितद्वेष नवीन नाही. मी २००२-०३ साली हैदराबाद विद्यापीठात एक विद्यार्थी असताना अप्पा राव पोडिले हे एका वसतिगृहाचे वॉर्डन होते. त्या वेळी त्यांनी दलित विद्यार्थ्यांचा पदोपदी अनन्वित छळ केला आणि त्यांना अपमानित केले. या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी दलित विद्यार्थ्यांच्या आंबेडकर संघटनेने व इतर डाव्या विचारांच्या विद्यार्थ्यांनी जेव्हा विद्यापीठाच्या मुख्य इमारतीवर निषेध-मोर्चा काढला तेव्हा याच अप्पा राव पोडिले यांनी सवर्ण विद्यार्थ्यांना चिथावून या विद्यार्थ्यांवर सशस्त्र हल्ला करविला. तेथे अचानक एकच धुमश्चक्री झाली आणि या सर्व गोंधळात अनेक विद्यार्थ्यांसह स्वत: अप्पा राव हेदेखील जखमी झाले; पण या हिंसक हल्ल्यास आंबेडकर संघटनेच्या सदस्यांनाच जबाबदार धरण्यात येऊन संघटनेच्या तत्कालीन पदाधिकाऱ्यांनाच विद्यापीठातून कायमचे काढून टाकण्यात आले. हे सर्वच पदाधिकारी ‘जेआरएफ’/ ‘एसआरएफ’ शिष्यवृत्तीप्राप्त होते. विशेष म्हणजे त्या वेळीदेखील केंद्रात भाजपचे सरकार होते आणि आतादेखील आहे आणि सप्टेंबर २०१५ मध्ये याच भारतीय जनता पक्षाच्या सरकारने अप्पा राव यांची जाणीवपूर्वक आपला दलितद्वेषी आणि जातीय हिंदू अजेंडा राबविण्यासाठीच विद्यापीठ कुलगुरूपदी नेमणूक केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंबेडकरांच्या १२५ व्या जयंती वर्षांत त्यांना चांगलीच श्रद्धांजली वाहिली होती.. मोदींनी आपणास सर्वच समान आहेत हे त्यांच्या कृतीने दाखवावे, वाणीने नव्हे. असे जर त्यांनी केले तर त्यांना समानतेचा डांगोरा पिटण्याची काहीच गरज राहणार नाही. लखनऊ विद्यापीठात मगरीचे अश्रू गाळल्याने मी दलितांना मूर्ख बनवू शकतो, असे समजून मोदींनी स्वत: मूर्खाच्या नंदनवनात नांदू नये. मोदींनी त्यांना जनतेने दिलेल्या मतरूपी प्रेमाची जाणीव ठेवावी आणि ‘सब का साथ सब का विकास’ या घोषणेस जागावे. तात्काळ पक्षातील वाचाळवीरांना स्पष्ट शब्दात प्रसार माध्यमांसमोर समज द्यावी आणि यानंतरही जर त्यांनी आपले कुकर्म चालूच ठेवले तर त्यांना पक्ष व पदांवरून निलंबित करून आपण नुसते बोलतच नाही तर बोलतो तसे चालतो हे दाखवून द्यावे.
प्रा. सुरेंद्र आठवले, खारघर, नवी मुंबई

बाळासाहेबांबाबतचा आक्षेप निंदनीय
‘शासकीय योजनांच्या नावातील ‘हिंदुहृदयसम्राट’ शब्दास आक्षेप’ हे वृत्त (लोकसत्ता, २३ जानेवारी) वाचले. एक तत्त्व/धोरण म्हणून हा आक्षेप योग्य आहेच, पण त्याशिवायही बाळासाहेब ठाकरे यांच्या नावामागे ही उपाधी/किताब लावणे हे पुढील कारणास्तव वास्तवाला धरून होणार नाही. ‘शिवसेना’ ही संघटनाच मराठी नागरिकांच्या हिताचे रक्षण करण्याच्या उद्देशाने आणि विशेषत: साठाव्या दशकाच्या प्रारंभीच्या वर्षांत दाक्षिणात्यांच्या, म्हणजे मद्रासी, केरळी, कानडी लोकांकडून स्थानिक म्हणजे मराठी लोकांच्या नोकऱ्या, व्यवसाय यावर होणाऱ्या अतिक्रमणाविरोधात होते. हे दाक्षिणात्य सर्व हिंदूच होते ना? मग त्यांच्याविरोधात बाळासाहेब गेलेच कसे? शिवाय त्यांचे प्रबोधनकार ठाकरे हे वडील आणि ‘मार्मिक’ साप्ताहिकाची जबाबदारी सांभाळणारे काकासुद्धा बऱ्याच कारणांसाठी स्वातंत्र्यवीर सावरकरांचे समर्थक आणि अभिमानी होते. त्यांनी कधी बाळासाहेबांना हिंदुहृदयसम्राट म्हटले नाही. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी शेवटच्या आजारात निर्धारपूर्वक प्रायोपवेशन करून जीवन संपवले त्याच्या दुसऱ्या दिवशीच्या त्या वेळी पुण्याच्या दैनिक ‘केसरी’त या वृत्ताचे शीर्षकच ‘हिंदुहृदयसम्राट स्वा. वीर सावरकरांचे दु:खद निधन’ असे होते. शिवसेनेने हिंदुत्वाचे समर्थन आणि संरक्षण करण्याची भूमिका ही त्यानंतर बऱ्याच वर्षांनी सत्तेत येण्यासाठी त्या वेळच्या जनसंघाबरोबर हातमिळवणी करताना घेतली हे सत्य डोळ्याआड करता येणार नाही.
साधारण १९८५/८६ च्या सुमारास आदरणीय स्व. बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख ‘हिंदुहृदयसम्राट’ असा करणारे वृत्त ‘लोकसत्ता’तूनच आले होते आणि याच पत्रांच्या माध्यमातून मी माझा असणारा सकारण आक्षेपही नोंदवला होता याची आज प्रकर्षांने आठवण झाली. एरवी सरकारी म्हणजे जनतेच्याच पशातून दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्ती, आíथक साहाय्य यांना आपल्या पक्षाच्या पंतप्रधानांचेच काय पण त्यांच्या कुटुंबीयांचेही नाव देणाऱ्या काँग्रेसला बाळासाहेबांच्या बाबतीत असा आक्षेप घेणे निंदनीय आहे, असे मला नम्रपणे म्हणावेसे वाटते.
राम ना. गोगटे, वांद्रे

स्वकीयांवर शंका; परकीयांवर विश्वास?
आयसिस-संशयितांना राज्यात अटक ही २३ जानेवारीची, तर या कारवाईसाठी अमेरिकेची मदत ही २४ जानेवारीची बातमी वाचली. संशयितांची धरपकड योग्य पण ते ‘सीआयए’च्या तालावर होत असेल तर मात्र शंकास्पद म्हणता येईल. कारण मुंबई हल्ल्याच्या वेळीही त्यांनीच दोन आठवडे पूर्वी भारतीय यंत्रणेला सविस्तर व सखोल माहिती पुरविली होती. तेव्हा प्रश्न असा की त्यांना ते कसे कळले? त्यांच्याच देशाने डेव्हिड हेडलीला खोटय़ा नावाने पारपत्र कसे काय दिले? ते त्यांच्या तपासात कसे काय आढळले नाही? तो भारतात येऊन पूर्वपाहणी (रेकी) करून जात होता. ती माहिती अमेरिकेने भारताला का दिली नाही? केन हेवूडबद्दलसुद्धा त्यांनी माहिती लपविली नसेल कशावरून? भारताबद्दल त्यांना खरोखरच पुळका असता तर ते स्वत: हल्ला थांबवू शकले असते आणि सर्व माहिती अनेक दिवसांपूर्वी मिळूनही हल्ले थांबत नाहीत; यावरून काय समजायचे तेच कळत नाही.
राहिला प्रश्न भारतीय यंत्रणांचा.. इतरांपासून माहिती घ्यायला हरकत नाही, पण कारवाई मात्र दोषी असणाऱ्यांवरच झाली पाहिजे. तेव्हा तपास करताना हजारो मल दूर असणाऱ्यांनी दिलेल्या माहितीवर डोळे झाकून विश्वास ठेवण्यापेक्षा संशयितांच्या जवळपास राहणाऱ्या लोकांनाही विचारले पाहिजे, एव्हाना कायद्यातही पंचनाम्याची जी तरतूद आहे ती यासाठीच. स्थानिक लोकांतील पाच जणांनी दिलेली माहिती तथ्यहीन असू शकत नाही. एखाद्या स्थानिकाबद्दल माहिती स्थानिक लोक देऊ शकत नसतील तर अमेरिकेने दिलेली माहिती विश्वसनीय कशी? जे लोक हेडलीची चौकशी करण्याची साधी परवानगीसुद्धा आपल्या अधिकाऱ्यांना देत नव्हते, ते अचानक आपल्यासाठी मेहेरबान का होतात?
ज्या संशयिताना अटक झाली त्याबद्दल जी माहिती समोर आली त्यातही विरोधाभास असा की, ‘तो स्थानिक लोकांत जास्त मिसळत नव्हता’ पण ‘तरुणांमध्ये आपले जाळे पसरवत होता’ या दोन्ही गोष्टी एकाच वेळी सहज शक्य होणाऱ्या नाहीत- जरी तो तंत्रज्ञान वापरत असला तरीही.
या सर्व गोष्टी आपल्या उच्च प्रशिक्षित व विशेष प्रशिक्षण घेतलेल्या अधिकाऱ्यांना कळत नसतील, असे समजणेही खुळेपणाचे ठरेल. ‘आयसिसचा बागुलबुवा हा स्वतंत्र काश्मीरच्या आंदोलनाला दडपण्यासाठी केलेला कट आहे,’ असे आरोप करणारा सय्यद अली शाह गिलानी फुटीरतावादी आहे, हे मान्य केले तरीही अशा घटनांमुळे काश्मिरी तरुणांचे देशप्रेम यातून वाढेल की कमी होईल, याचा विचार एक राष्ट्र म्हणून प्रत्येकाने केला पाहिजे.
सय्यद मारुफ सय्यद महमूद, नांदेड.

सुधारणावादय़ांचे बळीच हवेत का?

$
0
0

‘समोरच्या बाकावरून’ या पी. चिदम्बरम यांच्या सदरातील ‘माझा जन्म एक जीवघेणा अपघात’ हा लेख (२६ जाने.) वाचला. मुळात दलितांवर हल्ले हे विशिष्ट सरकारच्या काळातच होतात असाच या लेखाचा रोख जाणवला. वस्तुत: सरकार कोणाचेही असो, त्यामध्ये दलित, अल्पसंख्याक, सुधारणावादीच भरडले जातात, ही वस्तुस्थिती आहे. हे काम काही जण सुधारणावादाची झूल पांघरून करतात तर काही जण परंपरांच्या खांद्यावर बंदूक ठेवून लीलया पार पाडतात.
प्रश्न हा आहे की, प्रत्येक वेळेस सरकारला जाग येण्यासाठी एखाद्याच्या बळीचीच का गरज भासते? अंनिसने पाठपुरावा केलेले जादूटोणाविरोधी विधेयक असो किंवा मग हा हैदराबाद विद्यापीठातील निलंबनाचा प्रश्न असो, अशा गोष्टींमध्ये सकारात्मक निर्णयासाठी बळी जाण्याची वाट का पाहिली जाते, हे न उमगणारे कोडे आहे.
– दुष्यंत सुर्वे, बीड
रोहितच्या मृत्यूची न्यायालयीन चौकशी हवी
‘माझा जन्म, एक जीवघेणा अपघात’ हा पी. चिदम्बरम यांचा २६ जानेवारीच्या अंकातील लेख वाचला.
आपल्या लेखाच्या तिसऱ्या परिच्छेदात लेखक भूमिका मांडण्याचे स्वातंत्र्य आणि अधिकार (मग तो याकूब मेमनला दिलेल्या फाशीबद्दल असेल तरीही) दोन्ही गटांना होता आणि असे स्वातंत्र्य असणे कोणत्याही खुल्या समाजातील लोकशाहीचे प्राणतत्त्व असते असे म्हणतात, पण तेच लेखक आठव्या परिच्छेदात (सक्षम विरुद्ध अक्षम) तक्रार करण्याचा अधिकार विद्यार्थी संघटनेला कोणी दिला? मनुष्यबळ मंत्रालयाला पत्र लिहिण्याचा अधिकार मंत्र्यांना (जे लोकशाहीच्या प्राणतत्त्वानुसार झालेल्या निवडणुकीत निवडून आलेले स्थानिक खासदार आहेत) कोणी दिला? आणि विद्यापीठाला पत्र पाठविण्याचा अधिकार मनुष्य विकास मंत्रालयाला कोणी दिला? असे प्रश्न विचारतात हा तद्दन दुटप्पीपणा आहे.
जर स्थानिक खासदार मंत्री असतील (आणि जरी नसले तरी) आपल्या संबंधित तक्रारी त्यांच्याकडे मांडण्याचा अधिकार स्थानिक लोकांना (मग ते कोणत्याही पक्षाचे असोत) याच लोकशाहीने दिला आहे. स्थानिक खासदाराने आपल्या मतदारसंघातील तक्रार संबंधित मंत्रालयाला कारवाईसाठी पाठवली तर कोणत्या लोकशाही तत्त्वांचा भंग होतो?
मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडून या आलेल्या तक्रारीची शहानिशा करण्यासाठी विद्यापीठाकडे विचारणा केली तर ते त्यांचे कर्तव्य आणि अधिकार नाही का? माझ्या माहितीप्रमाणे खासदाराने (मग तो कुठल्याही पक्षाचा असला तरी) पाठविलेल्या पत्राला- तक्रारीला, त्यासंबंधी पूर्ण माहिती घेऊन केलेल्या कार्यवाहीबद्दल उत्तर देणे सरकारच्या संबंधित कार्यालयास बंधनकारक आहे. अशा प्रकारचे पत्रव्यवहार काँग्रेस राजवटीतदेखील नक्कीच झाले असणार. मग आजच त्यांना विपरीत असे काय दिसले? गेल्या वर्ष ते दीड वर्षांत या देशात अशा कुठल्या घटना लेखकाला दिसल्या (ज्या गेल्या ६० वर्षांच्या भारताच्या वाटचालीत कधीही, कोणत्याही स्वरूपात घडल्या नाहीत) की त्यांना ‘घोंघावते वादळ’ या परिच्छेदात या देशाचे भवितव्य एकदम धोक्यात आलेले वाटते?
भारतासारख्या बहुभाषिक, बहुधर्मीय आणि वेगवेगळ्या श्रद्धांवर आस्था असणाऱ्या विशाल लोकशाहीवादी देशात स्वातंत्र्योत्तर काळात आजपर्यंत अनेक चांगल्या-वाईट घटना घडल्या आहेत, पण त्यांचा असा एकांगी व कलुषित दृष्टीने विचार करणे योग्य नाही. माझ्यासारख्याला अजूनही या घटनेबद्दल सत्य कळलेले नाही आणि हे कळायचे असेल तर लोकशाही तत्त्वानुसार न्यायालयीन चौकशी आयोग नेमून निर्धारित वेळेत त्याकडून सत्य (मग ते कटू असेल तरीही) काय आहे ते जाहीर व्हावे.
– सुधीर निफाडकर, ठाणे
‘कालचा गोंधळ बरा होता’ म्हणावे लागेल!
स्पर्धा परीक्षांच्या मुलाखतीसाठी दिल्लीत गेलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना येणारे अनुभव कडवटच असतात. ‘लोकसत्ता’ने अलीकडेच ‘महाराष्ट्र सदनाची मराठी विद्यार्थ्यांकडेच पाठ’ या बातमीद्वारे (१६ जाने.) जळजळीत वास्तव मांडले आहे. महाराष्ट्र सदनात चपात्या चांगल्या मिळत नाहीत म्हणून सवंग स्टंट करणारे महाराष्ट्राचे दिल्लीतील खासदार तसेच मंत्री अत्यंत मूलभूत बाबींकडे कसे दुर्लक्ष करतात याचा हा एक नमुना आहे.
राज्यातील आणि केंद्रातील सरकारची कामगिरी तशीही सुमार राहिली आहे. निवडणूकपूर्व केलेल्या घोषणा व आश्वासने पूर्ण करता येणे शक्य नसल्यामुळे सध्या शिवशाही व रामराज्य हे शब्द उच्चारण्याचे धाडसही सेना-भाजपमध्ये राहिलेले नाही. मुख्यमंत्र्यांभोवती कायम लोढा-पुरोहित अशा धनाढय़ांचा गराडा पडलेला. सत्तेचे हाडूक मिळताच मंत्री व सेना नेतेही वाघाचे कातडे पांघरलेल्या शेळीसारखे झालेत. हजारो कोटींची बुलेट ट्रेन, कोस्टल रोड आणि अन्य कामे की ज्यांद्वारे मलिदा मिळतो, त्यांकडेच साऱ्यांचे डोळे लागलेले आहेत. अशा परिस्थितीत वरील अत्यंत गंभीर गोष्टीकडे लक्ष द्यायला कोणाला वेळ आहे?
शंभर कोटी खर्चून उभारलेल्या दिल्लीतील महाराष्ट्र सदनात एक जबाबदार मराठी अधिकारी तुम्हाला नेमता येत नसेल व तेथे मराठी विद्यार्थ्यांना सहकार्य मिळणार नसेल तर शिवाजी महाराजांचे नाव घेण्याचा अधिकारही विद्यमान सत्ताधाऱ्यांनी गमावला आहे, असे माझे स्पष्ट मत आहे. ऊठसूट मागच्या सरकारवर टीका करण्यापेक्षा या सरकारने काही चांगले करून दाखवावे. अन्यथा ‘.. कालचा गोंधळ बरा होता’ असेच म्हणावे लागेल.
-चंद्रहास त्रिंबक तावडे, ठाणे
केवळ पक्षीय स्वार्थासाठी?
‘प्रजासत्ताकाचा जळमटी कोपरा’ हा अन्वयार्थ (२६ जाने.) वाचला आणि कुठेतरी हृदयात एक कळ उठली. अशीच राजकीय खेळी स्व. राजीव गांधी यांनी पंतप्रधान असताना सहा मार्च १९८६ रोजी केली होती. गुलाम मोहम्मद शाह यांनी काँग्रेसच्या पाठिंब्याने श्री फारुख अब्ब्दुला यांचे सरकार उलथवले. गुलाम मोहम्मद शाह यांनाही दोन वर्षांच्या आत हटवले गेले होते. यानंतर, आम्ही रीतसर निवडून दिलेल्या सरकारला केंद्रीय सत्ता कस्पटासमान लेखते आणि आमच्यावर हुकूमशाही लादते असे वाटून स्थानिकांमध्ये संताप निर्माण झाला. पाकिस्तानने याचा अचूक फायदा घेऊन तरुणांची माथी भडकवली होती. काश्मीरमध्ये िहसाचार आणि अंदाधुंदी माजवली.
.. हा सारा इतिहास सर्वाना ठाऊक आहेच. भारताची ती जखम अजूनही पूर्णपणे भरलेली नाही. जसा काश्मीर पाकिस्तानला लागून आहे तसा अरुणाचल प्रदेश हा चीनला लागून आहे. जसा पाकिस्तान काश्मीरवर हक्क सांगतो तसा चीन अरुणाचल प्रदेशावर हक्क सांगतोच आहे.
..आणि हाही इतिहास माहीत असूनसुद्धा, केवळ पक्षीय स्वार्थासाठी भाजप अरुणाचल प्रदेशात राष्ट्रपती राजवट लादण्याची खेळी करत असेल तर अरुणाचल प्रदेश दुसरे काश्मीर होण्यास वेळ लागणार नाही.
– नरेन्द्र थत्ते, अल खोबर (सौदी अरेबिया)
.. तेणे आहे योगसुख। आपणपायी!
‘योग-याग-विधी, येणे नोहे सिद्धी..’ हे आजच्या काही धार्मिक विरोधी सात्त्विक संताप व्यक्त करणारे पत्र (लोकमानस, १६ जाने.) वाचले. पत्रातील विचारांची दिशा व एकूणच मांडणी, बाळबोध स्वरूपाची वाटते. आज तळागाळापर्यंत शिक्षणाचा प्रसार होत असला तरी समाजातील थोडा भाग या अभिषेक, एकादशी, सत्यनारायण इ. करण्यास का प्रवृत्त होतो, त्याच्या आयुष्यात कोणत्या स्वरूपाच्या समस्या, आर्थिक अडचणी आहेत याचा अभ्यास सार्वत्रिक दृष्टिकोन ठेवून समाजशास्त्रज्ञांकरवी होणे जरूर आहे. सर्वच जण मोबाइल, टेलिव्हिजन, स्मार्ट फोन्स, वाहतुकीची आधुनिक साधने वापरण्याचा प्रयत्न करतात. विज्ञान, तंत्रज्ञान, आरोग्यतंत्रे विकसित होत आहेत, पण मानवी जीवनातील ताणतणाव, द्वेष, मत्सर, अशांती, अनारोग्य, वाढते प्रदूषण व त्याने ढासळणारी निसर्गचक्रे वाढतानाच दिसत आहेत. विज्ञान व अध्यात्म यांची सांगड घालून जगण्याचा त्यांचा अल्बर्ट आइनस्टाइन यांचा संदेश कोठेच व्यवहारात येताना दिसत नाही.
जनता, लोकेषणा, भपका, दिखावट, ईष्र्या यासाठी हजारो रुपये खर्च करेल, पण भटजीच्या खिशात पाच-दहा रुपये गेले तर लगेच काहींचा जळफळाट सुरू. अभिषेक, पूजा, सत्यनारायण इ. विधींना मुळात धर्मशास्त्रात काही बैठक नाही मान्य, पण त्याने कोणाला तात्पुरते समाधान मिळत असेल तर? मूळ पत्रातील विषय- ‘योग-याग-विधी’. विधी म्हणजे निर्माता, नियामक शक्ती, त्याने दिलेले विधान म्हणजे यज्ञ-याग (भगवद्गीता- ३.१०) करण्याला ‘प्रत्येकासाठी श्रेयस्कर असा स्वधर्म’ म्हणून संबोधलेले आहे. (भ. गी. ३.३५) तर हे न करणारा केवळ इंद्रियसुखात रममाण होणारा व धरणीला भारभूत आहे (भ. गी. ३.१६) असे भगवान सांगतात. असे श्रेष्ठ कर्म ज्या व्यक्ती करतात, त्यांचे अनुसरण सामान्यजन करत असतात. (भ.गी. ३.२१) हेही भगवान सांगतात.
संत ज्ञानेश्वर योगी व द्रष्टा आहेत. ते खोटे सांगणार नाहीत. परकी आक्रमणाच्या व अत्यंत धकाधकीच्या काळात सोप्या नामजपावर भर देण्यासाठी, ते योग-याग-विधी म्हणजे असले तरी दुसरीकडे ‘म्हणोनि अग्निसेवा न सांडिता। कर्मरेखा नोलांडिता। तेणे आहे योगसुख। आपणपायी’ असेही सांगतात, तसेच यज्ञ-दान-तप सोडू नये, कारण यानेच मन:शुद्धी होत असते, अशीही कबुली देतात.
– श्यामसुंदर गंधे, पुणे.
‘लोकमानस’साठी काही वाचक हाती लिहिलेल्या पत्राचे छायाचित्र काढून ईमेलने पाठवितात. त्याने वेळ वाचतो हे खरे; परंतु छायाचित्रातील लेखी मजकूर संपूर्ण वाचता येईल तसेच कागदाबाहेरील अन्य तपशील छायाचित्रात येणार नाही, अशी काळजी घ्यावी.

संविधानातील अनुच्छेद ३५६ चा दुरुपयोग कधी थांबणार?

$
0
0

‘थोबाडफुटीचा आनंद’ हे संपादकीय (२८ जाने.) वाचले. अरुणाचल प्रदेश राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या कृतीला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने महाधिवक्त्यांना-१५ मिनिटांत राज्यपालांचा अहवाल सादर करा- हे दिलेले निर्देश व त्या अनुषंगाने त्यांची झालेली धावपळ यातच केंद्र सरकारची अब्रू गेली आहे. आणखी लक्तरे वेशीवर टांगली जाण्यापूर्वी सरकारने इशारा लक्षात घेऊन चुकीची दुरुस्ती करत व संबंधित राज्यपालांना तत्काळ माघारी बोलावत समंजसपणा दाखवावा हेच योग्य ठरेल. अर्थात या सरकारची आत्तापर्यंतची कार्यशैली बघता असे होण्याची सुतराम शक्यता नाही.
संपादकीयात उल्लेख केल्याप्रमाणे इंदिरा गांधींच्या दबावाला बळी पडत १९५९ साली केरळमधील नंबुद्रिपाद यांचे जगात लोकशाही मार्गाने निवडून आलेले पहिले कम्युनिस्ट सरकार पंडित नेहरूंच्या काळात बरखास्त करण्यात आले होते. येथून घटनेतील अनुच्छेद ३५६चा स्वतच्या राजकीय स्वार्थासाठी दुरुपयोग करण्याची मालिका सुरू झाली. इंदिरा गांधी पंतप्रधान असताना १९६६ ते १९७७ या कालावधीत ३९ वेळा या कलमाचा आधार घेत राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती. उत्तर प्रदेशात चरणसिंह मुख्यमंत्री असताना व आपले राष्ट्रपती युक्रेनची राजधानी कीव्ह येथे दौऱ्यावर असताना विशेष दूत पाठवून अध्यादेशावर स्वाक्षरी प्राप्त करत त्यांचे सरकार बरखास्त करण्यात आले होते.
या घटनेचा सूड म्हणून जनता पार्टी सरकारात चरणसिंह गृहमंत्री होताच त्यांनी ३० एप्रिल १९७७ रोजी बहुमत असतानाही काँग्रेसशासित नऊ राज्यांची सरकारे बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू केली होती. ११ फेब्रु. १९७७ ते २५ जुल १९७७ या कालावधीत बी. डी. जत्ती हे हंगामी राष्ट्रपती होते. त्यांनी सुरुवातीला या अध्यादेशावर स्वाक्षरी करण्यास नकार दिला होता. यावर जनता पार्टीच्या काही नेत्यांची ‘साइन ऑर रिझाइन’ असे म्हणण्यापर्यंत मजल गेली होती. अशा वर्तनाने ते राष्ट्रपती पदाच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवत आहेत याचेही भान राजकारण्यांना राहिले नव्हते. या कृतीचा बदला म्हणून इंदिरा गांधींनी परत सत्ता प्राप्त करताच १७ फेब्रु. १९८० रोजी बहुमत असतानाही अनेक राज्यांची सरकारे बरखास्त केली होती.
संपादकीयात ‘आसामचे मुख्य सचिव म्हणून निवृत्त झालेल्या राजखोवा यांना मोदी सरकारने कोठून शोधून काढले?’ असा प्रश्न उपस्थित केला आहे. अशाच एका माजी सनदी अधिकाऱ्याचा शोध इंदिरा गांधींनीही लावला होता. १९६७ ते १९६९ या कालावधीत माजी सनदी अधिकारी असलेले डॉ. धर्मवीर यांची पश्चिम बंगालचे राज्यपाल म्हणून नियुक्ती केली होती. त्यांनी इंदिरा गांधींच्या इच्छेनुसार ज्योती बसूंच्या नेतृत्वाखालील वामपंथी सरकारवर लगाम लावण्याचे काम इमानेइतबारे केले होते. राज्य मंत्रिमंडळाने मंजूर केलेल्या अभिभाषणातील केंद्र सरकारला गरसोयीचा असणारा परिच्छेद गाळून डॉ. धर्मवीर यांनी विधानसभेत भाषण केले होते. ही त्यांची कृती घटनेला धरून होती का? यावर त्यावेळी बराच खल करण्यात आला होता.
राजकीय पक्षांनी घटनेतील या कलमाचा वापर स्वतच्या राजकीय लाभासाठी केला हे उघड आहे. याला पायबंद घालण्याच्या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने ‘एस आर बोम्मई विरुद्ध भारत सरकार’ या प्रकरणात महत्त्वपूर्ण निवाडा दिला. या आदेशात त्यांनी अनुच्छेद ३५६चा उपयोग कोणत्या परिस्थितीत करावा याबाबतची मार्गदर्शक तत्त्वे घालून दिली. या निवाडय़ानंतर अशा गरवापरावर आळा बसला होता. अरुणाचलबाबतची केलेली कृती यावर सर्वोच्च न्यायालय योग्य तो निर्णय देईलच. मुख्य मुद्दा शिल्लक राहतो तो असा की, आपले राजकीय पक्ष राजकीय हेवेदावे व राजकीय हिशेब चुकते करण्याच्या मानसिकतेतून कधी बाहेर येणार? लोकांनी त्यांना जनकल्याणासाठी निवडून दिले आहे याचे भान जसे १९७७ व १९८०साली ठेवण्यात आले नव्हते तसे ते आताही ठेवण्यात आले नाही, असेच दुर्दैवाने म्हणावे लागेल.
अरुणाचलवर चीनचा दीर्घकाळापासून डोळा आहे. अशा परिस्थितीत या सीमावर्ती राज्यात पक्षीय हेवेदावे दूर सारत स्थिर सरकार कसे कार्यरत राहील हे पाहणे सरकारचे संवैधानिक दायित्व होते. या वास्तविकतेचे भान सरकारने ठेवले आहे असे वाटत नाही.
– सतीश भा. मराठे, नागपूर

आपल्याच विषाची चव चाखावी लागतेच
‘थोबाडफुटीचा आनंद’ हा अग्रलेख वाचला. दीर्घ काळ कॉँग्रेसच्या ताब्यात असलेल्या अरुणाचल प्रदेशात राज्यपालपदाचा झालेला दुरुपयोग दुर्दैवीच आहे, पण वाईटात काही चांगले असते म्हणतात तसे इथेही आहेच. अनेक दशके काँग्रेसी विचारसरणीची सरकारे असल्यामुळे विरोधी पक्ष, माध्यमे, अनेक विचारवंत, अशा अनेकांना एक साचलेपण आले होते. ‘हे असेच चालणार’ असे धरून चालल्यामुळे असे प्रकार पूर्वी घडूनही सहज पचून गेले होते. राज्यपालपदाचा दुरुपयोग, सरकारने एखाद्या धर्माच्या विचारसरणीला पाठबळ देणे, संसदेचे कामकाज आडमुठेपणाने रोखणे, अशी आपल्याच विषाची चव कॉँग्रेस आणि भाजप यांना आलटून पालटून चाखावी लागत आहे आणि त्यामुळे भविष्यात जास्त परिपक्वता दिसेल अशी आशा बाळगायला जागा आहे. सत्तेतून शहाणपण येते तसे ते विरोधी पक्षात राहूनही येतच असणार. कोणावर कोणती वेळ कधी येईल सांगता येत नाही ही जाणीव सर्वानाच झाली तर त्याचा देशाला दीर्घकालीन फायदाच होईल.
एकाने गाय मारली म्हणून दुसऱ्याने वासरू मारू नये हे खरे असले तरी आपण गाय मारल्यास दुसरा वासरू मारू शकतो याची जाणीव गाय मारणाऱ्याला कधी तरी होणे गरजेचे असते.
– प्रसाद दीक्षित, ठाणे

चांगल्या अधिकाऱ्यांना जनतेने पाठिंबा द्यावा
‘ठाणे जिल्हाधिकारी अश्विनी जोशी यांच्या बदलीचा प्रयत्न’ ही बातमी (२८ जाने.) वाचली. एकीकडे पंतप्रधान मोदी सरकारी कारभारामध्ये पारदर्शीपणा आणण्यासाठी कठोर पावले उचलत आहेत. यासाठी केंद्रीय सचिव आणि राज्यांमधील मुख्य सचिवांना स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत की, जनतेच्या समस्यांसंबंधी कारवाई करण्यात जे अधिकारी संवेदनशील नाहीत अशांना शिस्त लावावी. तसेच जे अधिकारी आदेशाची अंमलबजावणी करणार नाहीत त्यांच्यावर कडक कारवाई करावी, असेही आदेशात नमूद करण्यात आले असल्याचेही कळते. दुसरीकडे सत्ताधारी पक्षातीलच नेते कर्तव्यदक्ष व कार्यक्षम अधिकाऱ्याच्या बदलीसाठी जर प्रयत्न होत असतील तर ही बाब पंतप्रधानांच्या धोरणांशी एकदम विसंगत आहे असे वाटते. यासाठी जागरूक नागरिकांनी जोशी यांच्या पाठीमागे उभे राहून, त्यांची बदली होणार नाही यासाठी प्रयत्नशील राहावे. वेळ पडल्यास त्यासाठी आंदोलनही करावे. जोशी यांचा कार्यकाळ अजून पूर्ण झालेला नाही. अशा परिस्थितीत त्यांची बदली नियमांत बसत नाही. या आधी आयएएस अधिकारी चंद्रशेखर यांच्या बदलीच्या विरोधात ठाण्यातील जनता रस्त्यावर उतरली होतीच की.
– रविकांत श्रीधर तावडे, नवी मुंबई

आकसाने बदली अयोग्यच
मीरा-भाईंदर महापालिकेचे प्रस्तावित मुख्यालय ज्या भूखंडावर उभारले जाणार होते तो भूखंड खासगी नसून सरकारी मालकीचा आहे, असे स्पष्ट होताच जिल्हाधिकारी अश्विनी जोशी यांनी तेथील महापालिकेस नोटीस पाठवली. तत्पूर्वी या भूखंडावर स्वत: मुख्यमंत्री फडणवीस यांनी जंगी सोहळ्यात भूमिपूजन केले होते. मीरा-भाईंदर महापालिकेत भाजप सत्तेवर आहे. आता वरील भूखंडावर उभी राहिलेली बेकायदा बांधकामे भाजप नेत्यांची असल्याचे उघडकीस आले आहे. हा गरव्यवहार आपल्याच लोकांचा असल्याने सत्ताधारी त्याचे समर्थन करतीलच. चांगल्या जिल्हाधिकाऱ्यांना जावे लागले तर ते क्लेशकारक आणि अयोग्य आहे.
– मुरली पाठक, विलेपाल्रे (मुंबई)

..तर प्रामाणिक-पारदर्शक प्रशासन अफवाच ठरेल!
गणराज्यदिनी राजपथावर सादर झालेल्या पथसंचलनात ‘महाराट्राचे ‘सोंगी मुखवटे’ लोकनृत्य प्रथम’ हे वृत्त (२८ जाने.) वाचून झालेला आनंद क्षणिक ठरला. त्याला कारण ठरले ते अश्विनी जोशी यांच्या संभाव्य बदलीचे वृत्त. ही दोन्ही वृत्ते वेगवेगळी असली तरी नाटकातले ‘सोंगी मुखवटे’ आणि राजकारणात ‘प्रामाणिक मुखवटय़ाचे सोंग’ करणारी मंडळी हे दोन्ही महाराष्ट्रात अस्तित्वात आहेत याची खात्री या दोन्ही वृत्तांतून झाली. या संभाव्य बदलीमागे भाजप खासदार-आमदारांचा पुढाकार असल्याचे म्हटले आहे.
विद्यमान सरकारचा प्रामणिकता- पारदर्शकता हा मूलमंत्र आहे आणि त्याची वाच्यता गल्लीपासून- दिल्लीपर्यंत भाजप नेते करत असतात. मग प्रश्न निर्माण होतो तो हा की, जे जनतेला दाखवून देण्यासाठी आटापिटा केला जातो ते पक्षाच्या आमदार-खासदारांना सांगितले जात नाही का? सांगितले जात असेल तर ते त्यांना कळते का? मान्य असते का? अर्थातच याचे उत्तर ‘हो’ असेल तर एखाद्या प्रामाणिक जिल्हाधिकाऱ्याच्या एका वर्षांत बदलीचा घाट का घातला जातो? हे सामान्य नागरिकांच्या आकलनापलीकडे आहे आणि त्यानंतर सर्वात मोठा प्रश्न हा आहे की, जर सरकारमधील प्रतिनिधींनाच ‘प्रशासनातील प्रामाणिकता- पारदर्शकता’ नको असेल तर सरकारचा पारदर्शक-प्रामणिकतेचे ‘सोंगी मुखवटे’ धारण करण्याचा अट्टहास कशासाठी?
नुकताच आपण ६७वा प्रजासत्ताक दिन साजरा केला. गेली सहा दशके सत्तेवर असणारे प्रत्येक सरकार, प्रत्येक मुख्यमंत्री स्वच्छ-पारदर्शक प्रशासनाचा दावा करताना दिसतात. असे असताना पायाभूत सुविधा, जनकल्याणकारी योजना यावर काही लाख करोडो रुपये खर्चूनदेखील आजही रस्ते-वीज-पिण्याचे पाणी-सुदृढ आरोग्य व्यवस्था यांची वानवा का आहे? निधी कुठे मुरतो?
या सर्वाचे एकच उत्तर दिसते ते म्हणजे शासन-प्रशासनातील ‘ढोंगी मुखवटे’. जनतेला सर्व ज्ञात आहे. प्रजा एकीकडे तर सत्ता दुसरीकडे या गेल्या सहा दशकांतील वाटचालीमुळे जनतेला या सर्वाची सवय झाली आहे. मामला थंड झाल्यावर तांत्रिक बाजू पुढे करत अश्विनी जोशींना बढती-बदली दिली जाईल. प्रश्न केवळ एका जिल्हाधिकाऱ्यापुरता मर्यादित नाही. प्रश्न आहे प्रामाणिकता अंगी बाळगणे हा प्रशासनात दुर्गुणच ठरतो हे अनुभवातून कळूनदेखील काही व्यक्ती ती वाट सोडत नाही तो. अशा प्रामाणिक अधिकाऱ्यांना जाणाऱ्या संदेशाचा.
पूर्वीच्या काही सरकारबाबत जनतेने काही कृत्ये गृहीतच धरलेली होती. त्यामुळे जनतेचा अपेक्षाभंग होत नव्हता. राज्यातील- केंद्रातील भाजप सरकारने स्वत:च जनतेच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. त्यामुळे अपेक्षाभंग होणार नाही याची काळजी लोकप्रतिनिधींनी घेणे अत्यंत आवश्यक आहे. वारंवार सरकारच्या कृतीतून जनतेचा अपेक्षाभंग होत गेला तर प्रामाणिक मुख्यमंत्री- प्रामाणिक पंतप्रधान या अफवाच ठरतील.
– सुधीर लक्ष्मीकांत दाणी, बेलापूर (नवी मुंबई)

तेव्हाही कर्मकांडाचा सुकाळच!
‘तेणे आहे योगसुख। आपणापायी!’ या पत्रात (२८ जाने.) अभिषेक, एकादशी वगरे कर्मकांड हे आजच्या वातावरणात मानसिक आधारासाठी कसे आवश्यक आहे हे ठसवण्याचा प्रयत्न असून त्यासाठी सोयीनुसार धर्मग्रंथातील संदर्भही देण्यात आले आहेत. आजच्या चंगळवादी आणि अस्थिर वातावरणामुळे लोक कर्मकांडाकडे वळत आहेत हा भ्रम आहे. कारण ज्या काळात विज्ञान आणि चंगळवादाचा उदयच झाला नव्हता, अगदी शांत आणि संथ जीवनक्रम होता त्या काळातही देव-धर्म, जपजाप्य इत्यादी कर्मकांडांचा सुकाळच होता. ‘देव जाले उदंड। देवाचे मांडले भंड। शास्त्रांचा बाजार भराला। देवांचा गल्बला जाला। लोक कामनेच्या व्रताला। झोंबोन पडती॥’ असे समर्थानीच लिहून ठेवले आहे. तेव्हा कर्मकांडाची नशा ही अलीकडची नसून ती पूर्वापारची आहे.
असे कर्मकांड करणारे स्वस्थ-चित्त, निल्रेप मनाचे झालेले असतात असे व्यवहारात पाहायला मिळत नाही. द्वेष, मत्सर, राग-लोभ इत्यादी विकार या लोकांतही असतातच. शिवाय धर्म आणि रूढीकट्टरता हा अधिकचा दुर्गुण ठासून भरलेला असतो. ढासळणारी निसर्गचक्रे याबाबत पत्रलेखक चिंता व्यक्त करतो पण होम-हवन, यज्ञ-याग, अभिषेक यामुळे अन्नधान्य, दूध, तूप, तेल वगरेंची प्रचंड नासाडी होते त्याकडे मात्र दुर्लक्ष करतो. मन:शांतीसाठी अशा कर्मकांडाचे समर्थन करणे म्हणजे दु:ख विसरण्यासाठी दारू ढोसण्याचे समर्थन करण्यासारखेच आहे. वास्तविक खऱ्या मन:शांतीसाठी कर्मकांडविरहित ईश्वर भक्ती योग्य (धर्मग्रंथातही निर्गुण-निराकार भक्तीचा पुरस्कार केलाच आहे. तेव्हा धर्मग्रंथातील कालसुसंगत भाग स्वीकारणे हेच योग्य!). स्वत:चे मन साहित्य, संगीत आणि कलासक्त बनविणे आणि जमेल तितक्या समाजसेवेची आवड जोपासना करणे हाच खरा चिरस्थायी उपाय आहे.
– अनिल मुसळे, ठाणे

शेतकऱ्याचा ‘बळी’
‘शेती क्षेत्रावरील संकट गहिरे’ हा लेख (२८ जाने.) वाचला. हा विषय १९७४-७५ किंवा त्याच्याही आधीपासून चíचला जात आहे. भारतातील शेतीचे प्रति हेक्टर उत्पन्न हे इतर देशाांपेक्षा फारच कमी आहे , हे काही नव्याने कळले नाही. ओलिताखालील क्षेत्र , कालव्यांची संख्या आणि त्यांची लांबी फारच कमी आहे. कालव्यामधून पाण्याची प्रचंड गळती होते आणि चुकीच्या ठिकाणी धरणे बांधून पशाचा अपव्यय झाला हेही सर्वज्ञात आहे. ग्रिबांसाठीचे धान्य खुल्या बाजारात राजरोस विकले जाते.
देशभरातील गोदामात धान्यसाठा पडून आहे. एकीकडे हजारो लोक रोज उपाशीपोटी झोपतात आणि दुसरीकडे खाद्यान्न महामंडळाच्या गोदामातील धान्याची दरवर्षी मोठय़ा प्रमाणात नासाडी होते. आपण धान्य साठवूसुद्धा शकत नाही. जर धान्याचे उत्पादन वाढले तर ते ठेवायचे कुठे हा मोठा प्रश्न निर्माण होईल आणि क्रूड तेलासारखे अन्नधान्याचे भाव कोसळण्याची भीती आहे. शेवटी काय..संकटातील शेतकरी आपला ‘बळी’ देतात म्हणूनच तो बळीराजा..
– सुधीर केशव भावे, मुंबई

आपापल्या धर्मातील धर्माधांना रोखा!
‘आयसिस’शी संबंधित १४ तरुणांना अटक झाल्याची बातमी (२६ जाने.) वाचली. त्यांना पकडण्यात यश आले याचा आनंद व्यक्त करायचा की आपला समाज आणि राजकारण हे त्यांना तिकडे जाण्यास रोखू शकले नाहीत याचे दु:ख मानायचे, याच संभ्रमात मन आहे.
दहशतवाद खरोखरच संपवण्यासाठी सर्व पर्याय खुले ठेवून कारणांचाही विचार करायला हवा. ‘असं काय घडलं की हे तरुण त्यांना जाऊन मिळाले?’ याचा अतिशय सखोल विचार व्हायलाच हवा. यातील अनेक कारणांपकी एक महत्त्वाचे कारण म्हणजे धार्मिक वाद. आपण आजही राजकारण्यांच्या भडकावू भाषणांना बळी पडतो आणि छोटय़ा छोटय़ा कारणांमुळे दंगली घडवतो. मग कोणीच कोणाला कमी नाही या तत्त्वाद्वारे आपण समाजाची आणि माणुसकीची अमाप हानी करतो. चित्रपटांपासून ते विचारवंतांच्या प्रतिपादनांपर्यंत अनेक परींनी हा विषय कित्येक वेळा ढवळून काढलाय, पण तरीही आपल्या डोक्यात काही प्रकाश पडायला तयार नाही.
आमिर खानच्या एका चुकीच्या वाक्यामुळे आपला संपूर्ण देश पेटून उठतो. का? तर असे वक्तव्य देशाची प्रतिमा मलिन करते. मग हाच समाज राजकारण्यांच्या भडकावू भाषणांबद्दल एवढा जागरूक दिसत नाही; जे की संपूर्ण माणुसकीला घातक असते.
आणखी सखोल विचार केला तर ‘आयसिस’च्या आतंकवादाला केवळ सशस्त्र प्रतिकार हे उत्तर जास्त परिणामकारक असू शकत नाही. त्यापेक्षा निदान भारतापुरता विचार जर केला तर हिंदू-मुस्लीम ऐक्य हेच आयसिसला उत्तर असू शकेल. त्या-त्या धर्मातील लोकांच्या मनात त्यांच्याच धर्मातील जे लोक दुसऱ्या धर्माबद्दल द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न करतात त्यांना रोखावे लागेल.
‘आयसिस’शी लढण्यासाठी आपल्याला खऱ्या अर्थाने एक व्हावेच लागेल. सर्वाना हा पर्याय आणि भाषा ‘घासून गुळगुळीत झालेली’ वाटेल; पण याला हाच पर्याय आहे!
– ओंकार चेऊलवार, परभणी

अनिष्ट रूढींविरोधात भूमाता ब्रिगेडने लढावे
शनििशगणापूरच्या चौथऱ्यावर महिलांना प्रवेश मिळावा म्हणून म्हणे ४०० जणींचे भूमाता रणरागिणी ब्रिगेड प्रयत्नशील आहे. मला असे वाटते की, समानतेविषयी या महिलांना आच असेल तर लग्नकार्यात कन्येचे वस्तूप्रमाणे दान करणे, परवडो अगर न परवडो लग्नखर्च केवळ वधू पक्षाकडून करवणे यांसारख्या रूढी बंद करण्यासाठी ब्रिगेडने आपला वेळ व शक्ती खर्च करावी. यामुळे राज्यातील हुंडाबळींची संख्या कमी होऊ शकेल. शनििशगणापूरच्या देवतेचे दर्शन घेतले काय न घेतले काय महिलांच्या जीवनात काही फरक पडणार नाही.
पण लग्नविधी व लग्नखर्च यामुळे लेकीच्या जीवनात आमूलाग्र बदल होऊ शकतो. लग्नात मुलींना वाढवण्याचा व शिकवण्याचा आठवा फेरा घेणे या विषयीही आग्रह धरावा. लेकीच्या जन्मानंतर झाडे लावण्याचा सामूहिक उपक्रम अशा स्तुत्य बाबी बऱ्याच करता येतात.
– रेखा लेले, मुंबई

एकमेकांचे ऐकून तरी घ्या!
‘असहिष्णुतेपासून देशाचे रक्षण आवश्यक’ हा संदेश आपल्या देशाच्या राष्ट्रपतींनी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात केला. दादरी प्रकरणानंतर ज्याप्रमाणे ‘पुरस्कारवापसी’ व असहिष्णुतेचा मुद्दा देशात गाजला, त्याची दखल थेट अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनीदेखील घेतली होती; परंतु भाजप नेत्यांनी पुरस्कार परत करणाऱ्यांना ‘काँग्रेसचे एजंट’ म्हणून हिणवले व किमान पुरस्कार परत करणाऱ्या विद्वानांशी बोलण्याचे सौजन्यदेखील दाखवले नाही.
आता सर्व काही शांत झाले आहे; परंतु आपला भारत देश हा विविधतेने नटलेला आहे. इथे १२ धर्म व पाच हजारांहून अनेक जातींचे लोक राहतात. प्रत्येकाचे विचार एकमेकांशी जुळतील असे होणे शक्य नाही. पण सर्वाचे ऐकून घेतले जाऊ शकते व त्याप्रमाणे कृती आपण करू शकतो. सत्तेवर येण्यापूर्वी प्रत्येक पक्ष जनतेला नको असलेली, न पेलवणारी आश्वासने (गाजरे) देतो व सत्तेत आले की सर्व काही चिडीचूप, शांत पाच वर्षे सत्तेचा उपभोग घेतात.
केंद्रात सरकार काँग्रेसचे आले की लोकांना सबसिडी पुरवते आणि भाजपचे आले की डिजिटल इंडियाचे स्वप्न दाखवते; परंतु जनतेला काय हवे आहे याची कोणत्याच पक्षाला चिंता नाही. एखाद्या कॉर्पोरेट कंपनीसारखे यांचे पक्ष चालू असतात. एखाद्या नेत्यास सामान्य जनतेस भेटायचे म्हटले तर नेतेमंडळी ‘संपर्क कक्षेच्या बाहेर’ असतात.
अशी ही नेतेमंडळी संसदेत सामान्य माणसांच्या प्रश्नांवर चर्चा कशी घडवणार? प्रत्येक अर्थसंकल्पात गरीब हद्दपार असतो. मुळातच आपण सर्व भारतीय म्हणून एकत्र येणे गरजेचे आहे. त्या वेळीच एक सक्षम राष्ट्र म्हणून ‘भारत’ उदयास येईल आणि त्या दिवशीच प्रजासत्ताक भारताचे एकनिष्ठ संवैधानिक नागरिक आपण असू.
– लौकिक आगरवाल, पुणे

शेती उत्पादनातील वाढ नव्हे, सूज!

$
0
0

‘शेती क्षेत्रावरील संकट गहिरे’ या लेखात (२८ जाने.) रमेश पाध्ये यांनी भारतातील शेतीची उत्पादकता इतर देशांच्या मानाने कमी आहे याकडे लक्ष वेधले आहे. ही उत्पादकता वाढवायला हवी यात शंका नाही, पण ती कशी वाढवायची हे खूप महत्त्वाचे आहे. कृत्रिम खते व कीटकनाशके यांच्यामुळे विकसित देशातील शेतीची उत्पादकता जास्त दिसते. पण अशा रासायनिक शेतीमुळे जमिनीची प्राथमिक, नसíगक उत्पादकता कमी होते. त्यामुळे ही प्रगती फसवी आहे, ही वाढ नसून सूज आहे. पेशंटला स्टिरॉइड औषधे दिली की त्याचा तात्पुरता उत्साह वाटतो, पण त्याची नसíगक शक्ती कमी होते तशातला हा प्रकार आहे. या पाश्र्वभूमीवर “भारतातील शेतीला संरक्षक सिंचनाची जोड मिळाली तर शेती-क्षेत्रातील उत्पादकता झपाटय़ाने वाढेल” हे लेखकाचे म्हणणे खूप महत्त्वाचे आहे. ठिकठिकाणचा अनुभव सांगतो की शेतीला हुकमी पाण्याचा पुरवठा झाला तर केवळ तेवढय़ाने उत्पादकता दुप्पट होते. दुसरे म्हणजे अनेक शेतकऱ्यांनी जैविक शेती करून जमिनीची उत्पादकता वाढवली आहे. कृत्रिमरीत्या शेतीची उत्पादकता वाढवण्याच्या, सूज वाढवण्याच्या आंतरराष्ट्रीय स्पध्रेत भाग घेणे व्यर्थ व न परवडणारे आहे.
तीच गोष्ट औद्योगिकीकरणाची. औद्योगिक क्षेत्रातील रोजगार वाढला पाहिजे हे खरे आहे. पण या औद्योगिकीकरणाचा मार्ग पाश्चात्त्यांपेक्षा वेगळा असायला हवा. सेंद्रिय पद्धतीने शेती करून मिळणाऱ्या जैविक उत्पादनाचा आधुनिक तंत्र-विज्ञानाच्या आधारे कृषी औद्योगिक विकासासाठी वापर करायला हवा. असे नवीन प्रकारचे आधुनिक, विकेंद्रित, विखुरलेले औद्योगिकीकरण हाच जनतेच्या दृष्टीने विकासाचा प्रमुख, शाश्वत मार्ग आहे असे द्रष्टे वैज्ञानिक के आर दाते मांडत. तसे धोरण येण्यासाठी जनमताचा दबाव हवा.
-डॉ. अनंत फडके, पुणे
राज्यपाल नेमताना पथ्ये पाळणे गरजेचे
‘थोबाडफुटीचा आनंद’ हे संपादकीय (२८ जाने.) वाचले. राज्यपालांचे एकंदर वर्तन गैर आणि घटनाविरोधी होते. माझ्या मते हा सर्व प्रकार फसवणुकीच्या कलमाखाली येणारा आहे. अरुणाचल हे सीमेवरील राज्य असून त्यावर चीनचा डोळा आहे अशा वेळी भाजपसारख्या जबाबदार व देशभक्त म्हणवणाऱ्या पक्षाने अशी गोष्ट करणे म्हणजे विस्तवाशी खेळण्यासारखे आहे. देशातील न्यायपालिका सक्षम असल्याने मोदी सरकारची यामुळे पुरेपूर नाचक्की झाली.
दिल्लीसारख्या राज्यात तर रोजच्या कारभारातही तेथील उपराज्यपाल लक्ष घालू शकतो. त्यामुळे राज्यात लोकनियुक्त सरकार आहे का उपराज्यपालाचा कारभार चालतो आहे असा प्रश्न सर्वानाच पडला. केजरीवाल सरकार मोदींची लोकप्रियतेची आलेली जंगी लाट फोडून दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदावर आरूढ झाले. पहिल्यांदा ज्या वेळी केजरीवाल सरकारने राजीनामा दिला त्या वेळी विधानसभा बरखास्त करण्याऐवजी मोदी सरकारने केवळ राष्ट्रपती राजवट जारी केली व आयारामांसाठी सोय केली. राजकीय पक्ष कोर्टात गेले व आता निवडणुका घेण्यासाठी कोर्टाचा दणका बसणार हे नक्की झाल्यावर मोदी सरकारने विधानसभा बरखास्त करून निवडणुका जाहीर केल्या. तोपर्यंत दिल्लीचा कारभार बिनविरोध वर्षभर उपराज्यपालांद्वारे भाजपला चालवता आला.
साहजिकच राज्यपालपदावरील नेमणुका करताना कोणती पथ्ये पाळली जावीत ते सर्वच राजकीय पक्षांनी एकत्र येऊन ठरवणे गरजेचे बनले आहे. त्यासाठी सर्व पक्षांनी मिळून याबाबत नियमावली तयार करवून घ्यावी. अन्यथा भाजप हा पक्ष इतरांपेक्षा वेगळा नसल्याने याच चुकीच्या पद्धती अवलंबण्यात येऊन विरोधकांच्या सरकारांना धोका संभवतो.
– ओम पराडकर, पुणे
वीजबिलाचा ढाचा पाण्यालाही लागू करावा
‘कुणाच्या खांद्यावर..?’ या लेखात (२८ जाने.) श्याम आसोलेकर यांनी उल्लेखिलेली पाणीवाटपाबाबतची ‘आहे रे’ आणि ‘नाही रे’ यांच्यातील दरी हे एक बोचरे वास्तव आहे. आपल्या राजकीय हितसंबंधातून, महापालिका अधिकाऱ्यांना मलिदा चारून या बेकायदेशीर जोडण्या सर्रास दिल्या जात आहेत. हे वास्तव सहजासहजी बदलण्यातले नाही. विजेच्या वापराबाबत ज्याप्रमाणे पहिल्या अत्यावश्यक युनिट्सना सर्वसाधारण दर लागू होतो व त्यानंतरच्या युनिट्सच्या वाढत्या वापर स्तरांवर वेगवेगळे वाढते दर लागू होतात तोच बिल आकारणीचा ढाचा पाणीवाटपाबाबत लागू करण्याची गरज आहे. अशा रीतीने उपलब्ध होणारा निधी पाण्याचे अन्य स्रोत जसे की, विहिरी, पाणी जिरविणे वा रिसायकल करणे यासाठी वापरण्यात यावा.
– प्रभा पुरोहित, जोगेश्वरी (मुंबई)
किरकोळ मुद्दय़ावर आंदोलन करणे निर्थक
आज मानव विज्ञान युगात असून त्याच्या रोजच्या जीवनातपण तो यातील तत्त्वांचा अंगीकार सहजपणे करीत असतो. पण काही ठिकाणी काळाची चक्रे उलटी फिरवण्याचा नाहक प्रयत्न होताना दिसत आहे. यातील काही ताजी उदाहरणे म्हणजे स्त्रियांसाठी बंदी असलेला शबरीमला अथवा दग्र्यावरील प्रवेश. आता त्याच्यात उडी घेतली शनििशगणापूरने! भूमाता ब्रिगेडने याबाबत आंदोलन सुरू केले आहे. आज धर्माची बांडगुळे कापून टाकण्याची वेळ आली असताना ‘देवदर्शनासाठी’ कुणी आंदोलन करणे समजण्यापलीकडचे आहे. महिलांचे यापेक्षा अन्य प्रश्न अधिक गंभीर आहेत. ते बाजूला ठेवून अशा किरकोळ मुद्दय़ांवर आंदोलन करणे चुकीचे, निर्थक आहे. मागचा इतिहास पाहता (शहाबानो खटला) न्यालायाकडे प्रलंबित असलेल्या याचिकांवर काहीही निकाल लागो, धर्माचे तथाकथित रक्षक हे कधीही शक्य होऊ देणार नाहीत. आणि मतपेढीच्या राजकारणात कोणतेही शासन काहीही मदत करणार नाही.
भूमाता ब्रिगेडच्या समर्थकांनी गेल्या वर्षी ‘लोकसत्ता’मधील बहुचर्चित ‘मानव- विजय’ हे शरद बेडेकर यांचे सदर वाचले असते तर त्यांना विवेकवाद म्हणजे काय याची कल्पना आली असती व आपली शक्ती कुठे वापरावी याबाबत समज आली असती. अजूनही वेळ गेलेली नाही आणि सुरुवात म्हणून त्यांनी ग्रामीण भागातील स्त्रियांच्या आरोग्याच्या समस्येवर लक्ष्य केंद्रित करावे.
– दिलीप राऊत, उमेळे, वसई


कायदेही बँकबुडव्यांसाठी पोषक!

$
0
0

रिझव्‍‌र्ह बँकेच्या डेप्युटी गव्हर्नरांनी सर्व बँकांना ताळेबंद साफ करण्यास मुदतवाढ देणार नाही, असे सांगितल्याची बातमी (३० जाने.) वाचली. बँकांना हजारो कोटी रुपयांच्या बुडीत कर्जाची वसुली करण्याचे अशक्यप्राय आव्हान पेलवणारे नाही. कर्जे देताना अनेक प्रकारचे दबाव.. सरकारी, राजकीय, जातीय, धार्मिक असतात. शिवाय काही बँक अधिकारीपण आपला स्वार्थ साधून घेतात. खासगी बँकासुद्धा बुडीत कर्जाच्या समस्येतून सुटल्या नाहीत. कर्जवसुलीसाठी लवाद निर्माण केले, कर्जवसुली शाखा निर्माण केल्या, वसुलीसाठी एजंट नियुक्त केले, सगळा खर्च केला, पण हाती काही आले नाही आणि येणारपण नाही. बँकांचे विलीनीकरण हासुद्धा कर्जवसुलीस मदत करणारा उपाय नाही. आपल्याकडील कायदेही वसुलीला पोषक नाहीत. ते कर्जबुडव्यांनाच मदत करतात.
सरकार असे समजते की, दिलेली कर्जे परत येणारच. इतका खुळचट विचार असणारी माणसेच बँकांचे हितशत्रू असतात. शिवाय बँका बिगरबँक धंदा, जसे पेन्शन, विमा विक्री, सरकारी कर गोळा करणे, मुद्रांक विकणे/ गोळा करणे, लेखकांची पुस्तके विकणे वगरे कामे करतात. मग वसुलीसाठी वेळ कधी काढणार? ‘हम होंगे कामयाब एक दिन’ म्हणजे फारच दूर भविष्यामध्ये कधी तरी, असेच कर्जवसुलीचे झाले आहे.
– सुधीर केशव भावे, जोगेश्वरी (मुंबई).

मनाई करूच नका!
‘भेदण्या शनिमंडला..’ हा दिनेश गुणे यांचा लेख (रविवार विशेष, ३१ जाने.) वाचला. एक अत्यंत साधा वाटणारा, पण लक्षात घेण्यासारखा मुद्दा शनििशगणापूरबाबतच्या वादात सांगावासा वाटतो. कोणत्याही गोष्टीला मनाई केली की, ती करण्याची माणसांची सहज प्रतिक्रिया उसळून वर येते, हे शिक्षणशास्त्रात सांगितलेले सर्वाना माहीत असलेले आणि अनुभवयाला येणारे तत्त्व आहे. महिलांना प्रवेशबंदी म्हटल्यावर नास्तिक, पुरोगामी वगरे लोकांनाही त्यात अन्यायाच्या वेगवेगळ्या छटा दिसू लागल्या आणि मुख्य म्हणजे चळवळ उभारण्याची शक्यता लक्षात आली. मंदिराच्या व्यवस्थापकांनीदेखील ताणून धरल्याने शासनाला महिलांच्या बाजूने उभे राहून आपली पुरोगामी वगरे प्रतिमा निर्माण करता आली. कालांतराने मंदिराच्या व्यवस्थापनात शिरकाव करून तिजोरीच्या किल्ल्या कनवटीला लावण्याची शक्यतादेखील दूरदृष्टीच्या नेत्यांच्या लक्षात आली असणार. मनाई उठविण्याबाबत इतिहास काय सांगतो पाहा. पूर्वीप्रमाणे आता वेदांचा अभ्यास करण्यावर बंधने राहिली नाहीत, पण किती लोक वेदांचा अभ्यास करताना दिसतात? तसेच या चळवळीला यश आल्यावर शनीच्या चौथऱ्यावर आरोहण करण्यात विशेष काही साध्य केल्याचे श्रेय उरणार नाही!
– गजानन गुर्जरपाध्ये, दहिसर (मुंबई)
मुंबईची बग्गी विसरणे अशक्य
‘घोडय़ांचा मार्ग बिकट’ हे शनिवारचे संपादकीय (३० जाने.) वाचले. येत्या सहा महिन्यांच्या काळात बग्गी, टांगा, घोडागाडी इतिहासजमा होईल व येणाऱ्या पिढीला चित्रातून ती दाखवावी लागेल. खरेच अत्यंत देखण्या अशा घोडा या प्राण्याची भुरळ पडली नाही असा माणूसच विरळा. ऐतिहासिक लढायांमधून घोडय़ाने महत्त्वाची कामगिरी बजावलेली आहे. लढायांमध्ये तर घोडय़ांशिवाय पर्याय नव्हता. खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांनी घोडय़ांच्या चपळतेच्या गुणाचा विचार करून उत्तम अशा घोडदळाची उभारणी केली होती. असा हा दिमाखदार घोडा िहदी चित्रपटातूनही ऐटीत वावरला. विशेषत: ५० ते ६० च्या दशकात एकापेक्षा एक सरस आणि सदाबहार गाणी घोडागाडीवर चित्रित झाली होती. ‘यूं तो हमने लाख हंसी देखे हैं’, ‘मांग के साथ तुम्हारा’, ‘दिल में छुपा के प्यार का तूफान ले चले’, ‘पिया पिया मेरा जिया पुकारे’, ‘जरा हौले हौले चलो मोरे साजना..’ ही काही उदाहरणे. पन्नास-साठ वर्षांनंतर आजही ही ‘टमटम’ची गाणी लोकांच्या मनात रुंजी घालत आहेत. बदललेल्या काळात घोडय़ाची उपयुक्तता कमी झाली हे खरेच आहे आणि प्राणिमित्र संघटनांनी त्यांच्या बचावासाठी घेतलेली भूमिकाही योग्यच आहे; पण मुंबईतील घोडय़ांचे, घोडागाडीचे अस्तित्व नष्ट होणार असल्यामुळे त्याची रुखरुख प्रत्येक अश्वप्रेमीला नेहमीच वाटत राहील यात शंका नाही.
– प्रदीप शंकर मोरे, अंधेरी (मुंबई)
हा देशद्रोह मानायला हवा
‘आपण हिंदू आहोत, हे सार्वजनिकरीत्या म्हणण्याची आपल्याला भीती वाटते’ हे अभिनेते अनुपम खेर यांचे वक्तव्य (३१ जाने.) वाचले. असे वक्तव्य करून हा देश असहिष्णू बनत चालला आहे या आरोपाला आपण अप्रत्यक्ष पुष्टीच देत आहोत हे त्यांच्या ध्यानात आलेले नाही. असुरक्षित मुस्लिमांना वाटो किंवा िहदूंना वाटो, तो असहिष्णुतेचाच परिपाक मानायला हवा. तरीही ते वरील वक्तव्य करतात याचाच त्यांच्या दृष्टीने अर्थ असा की, हिंदुत्ववाद्यांच्या आक्रमक कृत्यांकडे अंगुलिनिर्देश करून देश असहिष्णू झाल्याचा आरोप करणे गर, मात्र िहदूंबाबत हा देश असहिष्णू बनत चालला आहे असे म्हणणे मात्र वस्तुस्थिती निदर्शक. दुसरे म्हणजे, गर-िहदूंनी विशेषत: मुस्लिमांनी ‘नवीन सरकार आल्यापासून देशात जे काही वातावरण बनले आहे त्याने आम्हाला देशात असुरक्षित वाटू लागले आहे’ अशी प्रतिक्रिया देणे म्हणजे तो देशद्रोह असेल, तर त्याच न्यायाने ‘िहदू म्हणून मला असुरक्षित वाटू लागले आहे’ ही प्रतिक्रियाही देशद्रोह मानायला हवा. पण अशा प्रकारच्या वैचारिक भ्रष्टाचाराला राजकारण्यांबरोबर या देशातील विचारवंतही तितकेच, किंबहुना जनमत घडवणारे म्हणून अधिक जबाबदार आहेत. या विचारवंतांनी स्वत:ला विशिष्ट विचाराच्या कप्प्यात बंदिस्त करून घेतले. यामुळेच गोध्रा िहसाचार आणि गुजरात दंगलीदरम्यानचा िहसाचार तसेच काश्मिरी पंडितांची ससेहोलपट आणि दादरी प्रकरण अशा वेळी या विचारवंतांच्या संवेदना समानरीत्या आणि समान पातळीवर जागृत न होता त्या वैचारिक बांधिलकीनुसार आणि सोयीनुसारच जागृत होतात.
– अनिल मुसळे, ठाणे
रंगत जाणारा ‘व्यापार’ आठवला..
‘खेळामागील अभिकल्पाचे घटक’ हा लेख (३० जाने.) वाचताना साठ ते सत्तरच्या दशकांतील ‘व्यापार’ या खेळाची आठवण झाली. हा खेळ गुजराती मंडळींनी प्रचारात आणला असावा. मुंबईमध्ये तो फारच प्रचलित होता. गुजराती, इंग्रजी किंवा मराठीत छापलेले त्याचे पट मिळायचे. किमान दोन अन् कमाल चार भिडू हा खेळ आरामात खेळत. पाचवा भिडू ‘बँक’ बनायचा. तो नसला तर कुणी तरी शहाणा ‘बँक’ बनून खजिना सांभाळायचा. बुद्धिबळासारख्या असलेल्या पटावर चारही कोपऱ्यावर छोटय़ा छोटय़ा कप्प्यांमध्ये माटुंगा, भायखळा, चिराबाजार अशी बरीच उपनगरांची नावं छापलेली असत. त्याच शीर्षकाची कार्ड्स असत. ते बँकेकडून खरेदीदाराला पसे भरल्यावर विकत मिळत. याशिवाय एका कोपऱ्यात ‘तुरुंग’ आणि काही हॉटेलं व धर्मशाळांची ‘घरं’ असायची. खेळाला सुरुवात करण्याआधी ‘चलन वाटप’ व्हायचे. म्हणजे खेळासह आलेल्या दहा, पाच, एक हजार, तसंच पाचशे, शंभर व पन्नासच्या खोटय़ा ‘नोटा’ सर्वाना समान अशा वाटल्या जायच्या. सगळ्यांनी भांडवल दिलं की बँक रीतसर स्थापन होऊन तिचं कामकाज सुरू व्हायचं. प्रत्येकाला एक सोंगटी मिळायची. जितकं ‘दान’ पडेल त्यानुसार ती पुढे सरकायची. पहिल्या फेरीत नशिबानुसार उपरोक्त ‘जागा’ किंवा ‘घरं’ विकत घेता येत. सोंगटी हॉटेलात गेली तर भाडं भरावं लागायचं. एखाद्याला दंड वा तुरुंगवास घडायचा. सगळ्या रकमा बँकेत जमा होत असत. दुसऱ्या फेरीपासून ‘उत्पन्न’ मिळू लागायचं. ‘जागा मालका’ला भाडं मिळायचं. कर भरावे लागत. जागा खरेदी-विक्रीचे दर कार्डावर छापलेले असत. एखाद्याकडे जास्त पसा झाला तर तो इतरांच्या जागा लिलाव वा कार्डानुसार खरेदी करायचा. खेळात कुणी तरी दिवाळखोरीत निघायचा. तो बाद व्हायचा. कधी बँकसुद्धा अवसायानात निघायची! दिवाळखोरीत निघलेल्या भिडूला कर्ज देऊन वाचवायचा प्रयत्न सर्वानुमते केला जायचा. असा हा सुंदर, सुरम्य, अद्भुत खेळ तासन्तास रंगत जायचा.
– विजय काचरे, पुणे
ही गोरगरिबांची चेष्टाच
विविध विभाग ई-गव्हर्नन्सच्या माध्यमातून एकमेकांशी जोडण्यात आले असून अधिकारी तसेच कर्मचारी प्रशिक्षित झाले आहेत. असे असताना वित्तमंत्र्यांच्या कार्यालयाने तीन सल्लागारांची नेमणूक केली. दुष्काळ निवारणासाठी पुरेसा निधी उपलब्ध नाही, नोकरभरतीपासून अनेक योजनांना कात्री लावली जाते. धान्ये, भाजीपाला व अन्य दैनंदिन गरजेच्या वस्तू महाग झाल्याने सामान्य नागरिक रडकुंडीला आला आहे. अशी परिस्थिती असताना एक मंत्री आपल्या निकटवर्तीयांसाठी गरज नसताना दरमहा चार ते पाच लाख रुपये सरकारी तिजोरीतून उधळतो. ही गोरगरिबांची चेष्टाच वाटते.
– अमोल करकरे, पनवेल
धोरण चांगले, अंमलबजावणीचे काय?
शासनाने प्रस्तावित केलेल्या नवीन सौर ऊर्जा धोरणाप्रमाणे नवीन इमारतींच्या गच्चीवर सौर ऊर्जा संयंत्र बसविण्याची सक्ती केली जाणार आहे. अशीच सक्ती प्रत्येक नवीन इमारतीवर रेन वॉटर हार्वेिस्टगची सोय करण्याबद्दल २००२ पासून आहे. पण ते न करताही सर्व इमारतींना भोगवटा पत्र व पूर्णत्वाचा दाखला मिळतो. तसाच प्रकार या सौर ऊर्जा उपकरणाबद्दल होईल, असे वाटते. धोरणे वा योजना चांगली असली तरी त्याच्या अंमलबजावणीचे काय, हा प्रश्न उरतोच. तेव्हा जे स्वखुशीने असे यंत्र बसवतील त्यांनाच ते द्यावे. याबाबतीत सर्वजण कसे तयार होतील यासाठी उपाय योजावे लागतील.
– वि. म. मराठे, सांगली

पीक विमा : किती नवा?

$
0
0

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या ‘मन की बात’मध्ये पीक विमा शेतकऱ्यांनी करावा, असे आवाहन केले आहे. पीक विमा ही नवीन योजना नाही. ज्यांच्या जमिनीला कालव्याचे पाणी मिळते आणि ज्यांना ही योजनाच माहीत नाही असे शेतकरी आणि पीक बुडाले तर सरकार मदत करणारच अशी खात्री असणारे पीक विमा काढत नाहीत. शिवाय विमा दावा दाखल केल्यावर पसे मिळण्यास खूपच विलंब होतो. सर्वसाधारण विमा दावे कसे मंजूर केले जातात हे पाहिले की, ‘भीक नको, पण कुत्रा आवर’ असेच वाटावे अशी परिस्थिती असते.
बँकांच्या प्राथमिकता कर्ज खात्यांसाठी यापूर्वी अशी विमा योजना होती. डिपॉझिट इन्शुरन्स अ‍ॅण्ड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन (डीआयजीसी) ही रिझव्‍‌र्ह बँकेची कंपनी बँकांचे बुडलेल्या कर्जाचे दावे मंजूर करून फक्त ५० ते ७५ टक्के रक्कम मंजूर करीत असे. पण सगळेच दावे नाही, नंतर दावे एवढे वाढले की, डीआयजीसीकडे पसेच नसत आणि शेवटी रिझव्‍‌र्ह बँकेने कर्ज विमा बंदच करून केवळ ठेव विमाचालू ठेवला आहे; परंतु ठेव विमा प्रति ठेवीदार रुपये एक लाख प्रति बँक एवढाच आहे. ही रक्कमसुद्धा काळाप्रमाणे आता किमान १० लाख रुपये करावी.
निर्यात क्षेत्रासाठी एक्स्पोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन (ईसीजीसी) निर्यातदारांना विमा संरक्षण पुरवते, पण येथेही अनुभव अतिशय वाईट असतो. काही तरी कारणाने विम्याचे दावे नाकारले जातात आणि पसे फारच विलंबाने आणि तेसुद्धा थोडेच परत मिळतात. येथेही ईसीजीसी पैसे, भांडवल कमी असल्याने सगळे दावे मंजूर करत नाही असे कळते. काही अंशी लबाड निर्यातदारसुद्धा याला कारण आहेत.
पीक बुडाल्याने किती नुकसान झाले हे फक्त अंदाजानेच ठरते आणि अशा वेळी शेतकरी जास्त विमा रकमेची अपेक्षा ठेवणार आणि विमा कंपनी अल्प रकमेचा दावा मंजूर करणार. त्यापेक्षा शेतीला जर पाणी आणि वीज जवळजवळ फुकटच मिळते तर पीक विमासुद्धा फुकटच द्यावा, त्यामुळे कोणी पीक विमा काढलाच नाही असे होणार नाही. हे पीक विम्याचे कामसुद्धा सरकारी बँकांवर टाकणार नाही, अशी आशा करू या.
सुधीर केशव भावे, जोगेश्वरी (मुंबई)

‘अब की बार’चा अमेरिकी अवतार!
‘कवतिकाचे विष’ हा अग्रलेख वाचला. २०१४ साली झालेल्या भारतीय लोकसभा निवडणूक मोहिमेत बऱ्याच अंशी अमेरिकन अध्यक्षीय पद्धत अंगीकारण्याचा प्रयत्न झाला आणि अमेरिकेतील सध्याची निवडणूकपूर्व परिस्थिती पाहता ते भारतीय राजकारणी पद्धत अंगीकारतात का, असा संशय निर्माण झाला आहे. मागच्या एका वर्षांत राजकीय पटलावर डोनाल्ड ट्रम्प यांचा झालेला उदय, निवडणूकपूर्व स्पध्रेत रिपब्लिकन पक्षात त्यांनी घेतलेली आघाडी, त्यांच्या भूमिकेवर रिपब्लिकन पक्षाची ‘नरो वा कुंजरो वा’ भूमिका हे सर्वच आलबेल आहे. ‘द हिफ्फगटन पोस्ट’ या इंटरनेटवरील अमेरिकेतील नियतकालिकाने सुरुवातीपासून जाहीर केले होते की, ट्रम्प यांची निवडणूक मोहीम ही राजकीय सदरात न छापता ‘मनोरंजन’ या सदराखाली छापण्यात येईल. आजपर्यंत या महाशयांची राजकीय भूमिका नकारात्मक धोरणांसाठी प्रसिद्ध आहे. सध्या त्यांनी भारताविषयी चांगले उद्गार काढले आहेत. त्यापरत्वे मागच्या वेळेस त्यांनी पुतिन यांची स्तुती केली होती. त्यामुळे अग्रलेखातल्या भूमिकेप्रमाणे त्यांच्या विधानावर चिंता करावी अशीच परिस्थिती आहे. आपल्याकडे जसे ‘अब की बार..’ होते त्याप्रमाणे ट्रम्प यांचे निवडणूक मोहिमेतील ब्रीदवाक्य आहे ‘अमेरिकेस पुन्हा महान बनवू या’. त्यांना जेव्हा प्रश्न विचारण्यात आला की, तुम्ही हे करणार कसे? तेव्हा त्यांचे उत्तर होते की- ‘११० लाख अनधिकृत निर्वासितांना अमेरिकेबाहेर घालवून, मुस्लीमधर्मीयांना अमेरिकेत प्रवेशबंदी करून आणि मेक्सिकन निर्वासितांना रोखण्यासाठी तेथे मोठी िभत बांधून आणि चीनमधून येणाऱ्या उत्पादनांवर ४५ टक्के आयात कर लावून.’ एकंदरीत कोणत्याही विषयाचा सखोल अभ्यास नाही, परराष्ट्र धोरण, अर्थशास्त्र या महत्त्वाच्या विषयाचे गांभीर्य नाही अशी व्यक्ती अमेरिकन निवडणूकपूर्व स्पध्रेत रिपब्लिकन पक्षातील ३० ते ३५ टक्के लोकांचा पािठबा मिळवून एक वर्ष आघाडीवर राहते ही खरे तर अमेरिकेसाठी खूप गंभीर बाब आहे. राजकीय पंडित आणि जागतिक अर्थतज्ज्ञ यांनी सध्याच्या अमेरिकेतील परिस्थितीविषयी चिंता व्यक्त केली आहे. डोनाल्ड ट्रम्प जर यशस्वी झाले तर अगोदरच अडगळीत असलेल्या जागतिक अर्थव्यवस्थेला अजून मोठा धोका निर्माण होईल.
मराठीत म्हण आहे की ‘जे न देखे रवी ते देखे कवी.’ त्याप्रमाणे जे अजून भारतीयांना दिसले नाही ते या महाशयांना दिसले. सेन्सेक्सची वाटचाल ही परत मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात (२५ हजारांच्या खाली) जाऊन पोहोचली आहे. रुपयाचे मूल्य दिवसेंदिवस घसरत आहे. ‘मेक इन इंडिया’सारखे बरेच उपक्रम राबवूनदेखील सलग चौदा महिने निर्यातीचा विकासदर नकारात्मक आहे. नुकतेच भारतात आलेले जागतिक अर्थतज्ज्ञ डॉ. नुरियल रुबिनी यांनी भारताच्या सद्य आíथक आणि राजकीय परिस्थितीविषयी जी मते व्यक्त केली तिचा आशय हाच होता- ‘मुलगा हुशार आहे पण अभ्यास करत नाही.’
नोएल डिब्रिटो, वसई

चर्चा नव्हे, कृतीची गरज
‘घनकचरा विभागाची कोटय़वधींची तरतूद पडून!’ ही बातमी (लोकसत्ता, १ फेब्रु.) वाचली. कचराभूमीला लागलेल्या आगीच्या निमित्ताने बऱ्याच गोष्टी यामधून कळल्या. देवनारमधील ६५ हेक्टर जागा कंत्राटदारामार्फत शास्त्रोक्त पद्धतीने बंद होणे अपेक्षित होते. देवनारच्या आगीने कंत्राटदाराचे हे अपयश उघडकीस आणल्यामुळे त्याचे कंत्राटच ३१ जानेवारीपासून रद्द करण्यात आले. एका अर्थी हा निर्णय योग्य आहे. आता तरी या विभागासाठी पूर्ण वेळ कार्यक्षम अशा मुख्य अभियंत्याची नेमणूक तातडीने करणे गरजेचे आहे. नुसत्या चर्चा उपयोगाच्या नाहीत. कृतीची गरज आहे. यासाठी अर्थसंकल्पात केलेल्या पशाच्या तरतुदीचा योग्य रीतीने विनियोग केला जाणे आवश्यक वाटते. अन्यथा यामुळे वायुप्रदूषण व नागरिकांच्या आरोग्यविषयक समस्या अधिक गंभीर होऊ शकतात. ही समस्या युद्धपातळीवर व गांभीर्याने हाताळणे गरजेचे आहे.
रविकांत श्रीधर तावडे, नवी मुंबई

हे शिक्षक कोणता आदर्श ठेवणार?
‘सर्व अधिवेशन अभियान’ हे वृत्त (लोकसत्ता, १ फेब्रुवारी) वाचले. आठ दिवस भरपगारी रजा घेऊन, विद्यार्थाना वाऱ्यावर सोडून शिक्षक निघाले अधिवेशनाला! हे शिक्षक कोणता आदर्श विद्यार्थ्यांसमोर ठेवणार आहेत? खरे तर वार्षकि परीक्षा जवळ आली आहे आणि हे शिक्षक राजकारण्यांची बौद्धिकं ऐकायला, अधिवेशनाच्या निमित्ताने जिवाची ‘नवी मुंबई’ करायला निघाले हे वाचून मन उद्विग्न झाले. हे शिक्षक काय घडवणार नव्या पिढीला?
प्रफुल्लचंद्र नारायण पुरंदरे, वेसावे (मुंबई)

ही पथ्ये ‘पद्म’ पुरस्कारांत पाळली जातात?
दर वर्षी प्रजासत्ताक दिन आला की पद्म पुरस्कार कोणाकोणाला मिळाले याची यादी प्रसिद्ध होते. हे पुरस्कार ११२ व्यक्तींना खिरापतीसारखे वाटले. पुरस्कार मिळालेल्या व्यक्तीच्या तोडीच्या दुसऱ्या व्यक्तींना पुरस्कार मिळाला नाही तर कादर खानसारख्या व्यक्ती अनुपम खेरसारख्या पुरस्कार मिळालेल्यांवर टीका करतात. हा विषय प्रतिवर्षी चच्रेचा बनू नये यासाठी त्यासंबंधीची काही पथ्ये पाळल्यास बरे होईल.
+सदर व्यक्तीने तिच्या अर्थार्जनाच्या साधनात किंवा समाजसेवेत मिळवलेले अति विशिष्ट यश, तिने सामाजिक उन्नतीसाठी त्यातील किती उत्पन्न वापरले, ती व्यक्ती शक्यतो जिवंत असावी किंवा संबंधित वर्षीच तिचे निधन झालेले असावे, त्या व्यक्तीवर कोणत्याही स्वरूपाचे आरोप कोर्टात सिद्ध झालेले नसावेत किंवा तसे होणार असल्यास अशा व्यक्तीचा विचार होऊ नये. संबंधित व्यक्ती सरकारी पक्षाशी संबंधित असू नये, तिच्या धर्माचा विचार पुरस्कार देताना केला जाऊ नये अन्यथा कोटा पद्धती सुरू होण्याचा धोका संभवतो. यात गरजेनुसार व अनुभवानुसार यात बदल करणे शक्य असावे.
प्रसाद भावे, सातारा

तेव्हा का गप्प बसले?
‘अब आयेगा मजा’ (लोकसत्ता, १ फेब्रुवारी) हे सदर वाचले. अनुपम खेर यांना पद्मभूषण पुरस्कार प्रदान झाल्यावर कादर खान यांची प्रतिक्रिया व्यक्तिगत नसेलही, परंतु त्यातील सत्य सर्वज्ञात आहे. पण प्रश्न हा पडतो की, अनुपम खेर यांच्यापेक्षा सफ अलीसारख्या सुमार नटाला पद्मश्री देण्यात आली तेव्हा कादर खान यांना पद्म पुरस्कारांच्या प्राप्तीसाठी दिल्लीच्या नेत्यांचे गुणगान करणे हाच पात्रतेचा निकष आहे, असा साक्षात्कार का झाला नाही?
– डॉ. राम पंडित, सीवूड्स (नवी मुंबई)

‘स्तुतिसुमनांची फळे’ दोघांना नाहीत, हे बरे!
अनुपम खेर यांना मिळालेल्या पद्मभूषण पुरस्कारावरील कादर खान यांच्या प्रतिक्रियेशी मी सहमत आहे. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून त्यांच्यावर अनुपम व किरण या खेर कुटुंबीयांनी जी स्तुतिसुमने उधळायला सुरुवात केली त्याची परिणती पद्मभूषण पुरस्कारात झाली असणार हे निश्चित. नशीब, दोघांनाही एकाच वेळी दिले नाहीत. असेच पूर्वी सफ अली खान याच्याबाबतीत झाले होते म्हणून या पुरस्कार निवडीच्या योग्यायोग्यतेवर शंका येते
– राम देशपांडे, नेरुळ

‘इथे कसे शक्य आहे?’ हे ऐकावे लागले!

$
0
0

‘देशात शास्त्रज्ञ घडवणार’/ ‘शास्त्रज्ञांना प्रोत्साहन देणार’ अशा बातम्यांची दखल ‘लोकसत्ता’ घेतो; परंतु मला या अशा बातम्या वाचून हसावे की रडावे कळत नाही. याचे कारण खालीलप्रमाणे :
ठाण्यात राहणारे ज्येष्ठ हृदयशल्यविशारद आणि संशोधक कै. आर. के. भिडे हे स्वत:च्या हिमतीवर भारतात कृत्रिम हृदय तयार करण्याच्या प्रयत्नात होते.
त्यांनी यासाठी त्या वेळचे (सुमारे पाच वर्षांपूर्वीचे) भारत सरकार, राज्य शासन, देशातील मोठे संशोधक आणि गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडे संशोधनासाठी प्रकल्प अहवाल, संभाव्य खर्च आणि उपयोगिता हेसुद्धा सादर केले होते. पण याचे फलित काय? तर वाटाण्याच्या अक्षता आणि ‘जर अमेरिकेत नाही तर इथे कसे शक्य आहे?’ या छापाची उत्तरे.
अशा स्थितीत देशात शास्त्रज्ञ कसे तयार होणार?
..या डॉ. भिडे यांची ३ फेब्रुवारी २०१६ ही चौथी पुण्यतिथी आहे.
– उज्वल जोशी

मुले बुडाली, प्रश्न पुन्हा वर आले..
मुरुडच्या समुद्रात बुडून १३ विद्यार्थ्यांचा झालेला मृत्यू हे वृत्त अतिशय दु:खद व धक्कादायक आहे. यातून अनेक प्रश्न मनात येतात.
पहिला प्रश्न असा की, अलिबाग, मुरुड जंजिरा येथे भरती ओहोटीच्या वेळांचे टाइम-टेबल दररोज प्रदíशत केले जाते. तसे ते मुरुड किनाऱ्यावर उपलब्ध होते काय? भरती-ओहोटीच्या वेळा त्या विद्यार्थ्यांसोबत आलेल्या शिक्षकांनी प्रथम जाणून घेणे व सर्व विद्यार्थ्यांना धोक्याची सूचना देणे गरजेचे होते. ते शिक्षक तर विज्ञान शाखेतील होते व त्यांना हे भौगोलिक ज्ञान असणे गृहीत धरलेच पाहिजे. ही मुले समुद्रात उतरली ती वेळ ओहोटीची होती असे ‘लोकसत्ता’च्या प्रथम पानावर लिहिले आहे तर आतील पानावर मात्र तेव्हा भरती सुरू होती, असे लिहिले आहे. यावरून असे दिसते की अपघात झाला तेव्हा भरती संपून लगेच ओहोटी सुरू झाली असावी.
दुसरा प्रश्न असा की, जे विद्यार्थी समुद्रात उतरले होते त्या सर्वाना समुद्रातील अंतर्गत प्रवाहांमध्ये उत्तम पोहता येते काय याची खातरजमा त्या शिक्षकांनी केली होती काय? सर्व मुले पुण्याची होती म्हणजे त्यांना समुद्रात पोहण्याचा सराव बहुधा नसावा.
तिसरा प्रश्न असा की, त्यांना फ्लोट किंवा लाइफ जॅकेट बरोबर ठेवण्याची सक्ती का करण्यात आली नाही? हे विद्यार्थी समुद्रकिनारी सहलीला जात आहेत हे शाळेला तसेच त्यांच्या पालकांना माहीत होते. त्यामुळे धोकादायक धाडस करू नका, हे त्यांना कोणीच कसे बजावले नाही?
चौथा आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे सुरक्षारक्षक व्यवस्थेचा. त्यात पुढील अनेक उप-प्रश्न उपस्थित होतात. काही किनाऱ्यांचे तळ फार थोडय़ा अंतरावर एकदम खोल होत जातात (त्यांना ‘स्टीप अ‍ॅबिसल बेंथिक झोन’ असे शास्त्रीय नाव आहे). अशा भागात उत्तम पोहणारादेखील खोल पाण्यात ओढ लागून खेचला जातो. उदाहरणार्थ कळंगुट, गणपतीपुळे. अशा किनाऱ्यांवर तशी स्पष्ट माहिती बोर्डावर लिहिलेली असते. मुरुडचा समुद्रतळ तसा आहे का? असल्यास तशी माहिती तेथे फलकावर लावली आहे का? शिवाय अशा प्रत्येक किनाऱ्यावर सुरक्षारक्षक तनात असले पाहिजेत व मुख्य म्हणजे ते प्रामाणिकपणे तेथे हजर असले पाहिजेत. हा अपघात घडला तेव्हा तेथे ते हजर होते का? इतकी मोठी सहल मुरुड येथे आली आहे हे पाहून एकाही सुरक्षारक्षकाने त्या मुलांना व मुख्य म्हणजे त्यांच्या शिक्षकांना अगोदरच सावध का केले नाही? या सर्व प्रश्नांवर सरकार व स्थानिक नगरपालिका यांनी गांभीर्याने विचार करून प्रामाणिकपणाने प्रतिबंधक उपाय करणे हे त्यांच्याकडून अपेक्षित आहे. केवळ दोन लाख भरपाई देऊन सांत्वन करण्यात काय अर्थ आहे?
तसेच सहलींना कायमचा मज्जाव करणे हादेखील जबाबदारी टाळण्याचा व टोकाच्या मूर्खपणाचा प्रकार ठरतो. विशेषत: प्राणिशास्त्राच्या विद्यार्थ्यांना तर खडकाळ, चिखलमय व वालुकामय अशा तीन प्रकारच्या समुद्रकिनाऱ्यांवर मिळणारे प्राणी गोळा करावयास जावेच लागते. अशी बिनडोक बंदी घातल्यास त्यांनी काय करावे?
धोके कसे असतात, त्यांवर मात कशी करावी याचे शिक्षण तरुणांना न देता त्यांच्यावर बंदी घालून त्यांचा आत्मविश्वास, ज्ञान व धडाडी नष्ट करणे योग्य नाही. एकदा अंदमानात पोर्ट ब्लेअरच्या समुद्रकिनारी रात्री दहा वाजता दहा ते पंधरा वष्रे वयाची सुमारे वीस अमेरिकन मुले समुद्रात पोहायला उतरलेली मी पाहिली. त्यांच्या तीन शिक्षिका किनाऱ्यावर होत्या. तुम्हाला यात धोका वाटत नाही का, असे त्यांना विचारले असता त्या अत्यंत आत्मविश्वासाने म्हणाल्या की, याच्यापेक्षा जास्त खवळलेल्या समुद्रात ती मुले उत्तम पोहतात. खरोखर अंदाजे ४५ मिनिटांनंतर ती सर्व मुले परत आली. आजचे हे दु:खद वृत्त व त्यावरील सरकारची मद्दड प्रतिक्रिया वाचून मला त्या प्रसंगाची आठवण आली आणि आपल्यात व त्यांच्यात काय फरक आहे हे जाणवले.
विवेक शिरवळकर , ठाणे

‘शेखचिल्ली ’ शिक्षक
‘सर्व अधिवेशन अभियान’ हे वृत्त (१ फेब्रु.) वाचले. शिक्षकांच्या अधिवेशनांतून कुठली फलनिष्पत्ती होते हा संशोधनाचा विषय आहे . शिक्षक संघटनांचा दावा हा फलनिष्पत्तीचा असेल तर त्यांनी मागील अधिवेशनात चर्चा झालेले विषय आणि त्या अनुषंगाने दरम्यानच्या काळात झालेल्या प्रत्यक्ष कार्यवाहीचा अहवाल प्रसारमाध्यमांसमोर ठेवावा. सरकारी शाळांच्या गुणवत्तेवर आणि पर्यायाने अस्तित्वावर प्रश्न निर्माण झालेले असताना देखील शाळा सलग आठ दिवस बंद ठेवणे हा प्रकार म्हणजे स्वत बसलेल्या फांदीवरच कुऱ्हाड चालविण्याचा ‘शेखचिल्ली ’ प्रकार म्हणावा लागेल. कोटय़वधी रुपये खर्चून आणि विद्यार्थ्यांना जेवू-खाऊ घालून देखील सरकारी व अनुदानित शाळा का ओस पडत आहेत, याचा विचार शिक्षक संघटनांच्या मनमानीला अभय देणाऱ्या शिक्षण विभागाने त्वरित करावा.
स्नेहल मुकुंद रसाळ , कोथरूड , पुणे .

अधिवेशने किती? कोणत्या शिक्षकांसाठी?
शिक्षकांचे न्याय्य हक्क व काही शासकीय समस्यांची सोडवणूक या बाबींसाठी संघटना हवी आणि शिक्षक संघटनानी शिक्षकांची अधिवेशन आयोजित करावीत याबाबत दुमत नाही.. पण आजमितीस शिक्षकांच्या संघटना भूछत्रांसारख्या भरपूर निघालेल्या आहेत आणि दुसरे म्हणजे, अधिवेशनाच्या नावाखाली जे अर्थकारण चालू आहे ते चुकीचे आहे. संघटनेत शिक्षक जर आजीव सभासद असेल तर तो ‘कार्यकर्ता’ म्हणून त्या-त्या संघटनेच्या अधिवेशनास जाता येते; मात्र हल्ली अगदी तुंटपुंजे पसे भरून कोणत्याही संघटनेच्या अधिवेशनाची पावती फाडायची व नंतर अधिवेशन ठिकाणी किंवा शाळेवर न जाता आपलीच घरची कामे बरेच जण करतात याला माझा विरोध आहे.
राज्यातील सर्व शिक्षक संघटनांच्या नेत्यांनी एकत्र येऊन एकच महाअधिवेशन ठेवावे व या माध्ययातून शिक्षकांच्या व शिक्षणाच्या अडचणीबाबत शासनावर दबाव टाकावा यातून आपली संघटनशक्ती कळेल.
संतोष मुसळे, जालना.

आधी नॉर्मल सिटी, मग स्मार्ट सिटी
प्रशांत कुलकर्णी यांचे २ फेब्रुवारीचे व्यंगचित्र डोळ्यात झणझणीत घनकचरा घालणारे आहे. शहरांची परिस्थिती इतकी भयानक असताना स्मार्ट सिटीच्या वल्गना म्हणजे दहावीची परीक्षा उत्तीर्ण होण्याची मारामार असताना ‘पोस्ट डॉक्टरल रिसर्च’ कुठल्या क्षेत्रात करावा याची उठाठेव वाटावी. यावर हमखास ठरलेले आणि बुद्धिभेद करणारे उत्तर असते ते म्हणजे प्रशासन काय काय करणार, प्लास्टिकच्या पिशव्यांचा अर्निबध वापर करणाऱ्या मध्यमवर्गाची काहीच जबाबदारी नाही का, इत्यादी. पण हे सोयीस्करपणे विसरले जाते की, वाहतूक/ स्वच्छता यांसंबंधीचे नियम पाळण्याकरता साध्या साध्या सोयी देऊन त्याचवेळी संबंधित यंत्रणांच्या डोळ्यादेखत ते नियम प्रत्येक नाक्यावर सर्रास मोडल्यास ‘लगेच कारवाई होते’ असे चित्र निर्माण करणे ही जबाबदारी प्रशासनाचीच असते. प्लास्टिकच्या पातळ पिशव्यांची निर्मिती करणारे कारखाने आणि त्यांचे वितरण करणारी व्यवस्था बंद करण्याची जबाबदारीही प्रशासनाचीच असते. साधेसुधे नियम ज्यामध्ये पाळले जातात अशी ‘नॉर्मल सिटी’ आधी निर्माण केली तरच आपण खऱ्याखुऱ्या ‘स्मार्ट सिटीं’चा विचार करू शकतो.
विनिता दीक्षित, ठाणे

शिरपूर पॅटर्न का राबवत नाही?
धुळे जिल्हय़ातल्या शिरपूर तालुक्यातल्या, प्रत्येक खेडय़ाबाहेरचे सर्व नालेओढे ४० फूट रुंद, ३० फूट खोल खोदून, त्यावर ठिकठिकाणी १६-१६ साखळी सिमेंट बंधारे बांधले गेले. सर्व विहिरी १०० फूट खोल व ठिकठिकाणी ८०० फूट खोल बोअर्स (कूपनलिका) घेतल्यामुळे पावसाळय़ात फक्त ६०० मिमी पाऊस पडूनदेखील जानेवारीअखेर सर्व पाणीसाठे तुडुंब भरलेले दिसतात. वर्षांतून तीन-तीन पिके घेऊनदेखील प्रचंड पाणीसाठा शिल्लक राहतो. अनेक देशांतील तज्ज्ञ, अभ्यासू मंडळी ही योजना पाहून जातात. दुर्दैवाची बाब म्हणजे महाराष्ट्रातले-दिल्लीतले एकही मंत्री, नेता इकडे अद्याप एकदाही फिरकलेले नाहीत. याचाच अर्थ खेडय़ातला अल्पभूधारक, गरीब शेतकरी पोटभर खाऊन सुखाने जगावा, आत्महत्या होणे बंद व्हावे, पोरा-पोरींचे शिक्षण, लग्न (सरकारच्या मदतीविना) व्हावीत, भूकबळी १००% थांबावे असे राज्य व केंद्र सरकारांना वाटतच नाही, असा खेडूतांचा गैरसमज होत आहे. प्रत्येक जनहित योजनांच्या अंमलबजावणीत सरकारच्या इच्छाशक्तीचा अभाव, उदासीनता दिसत आहे.महाराष्ट्र, कर्नाटक, दिल्ली सरकार जागे कधी होणार?
अ‍ॅड. प्रभाकर कलशेट्टी, पुणे.

सरसंघचालकांचे आरक्षणविषयक विचार भाजपने गांभीर्याने घ्यावेत

$
0
0

‘मागासपणाचे डोहाळे’ हे संपादकीय (२ फेब्रुवारी) वाचले. कोणत्याही टिनपाट नेत्यांस आपले नेतृत्वगुण सिद्ध करण्यापेक्षा लाडका नेता बनण्याच्या इच्छेमुळे स्वत:च्या समाजासाठी राखीव जागांची मागणी करणे सोपे वाटते, हे पटले.
आरक्षण हे विरोधकांचे खेळणे झाले असून राज्यकर्त्यांचा मात्र छळ होत आहे. हा राजकीय खेळ आणि छळ राजकारणी उत्तमरीत्या पार पाडीत आहेत. ‘नव्याने कोणाचाही राखीव जागांत समावेश करता येणार नाही,’ हा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय वृत्तपत्रांतून मोठय़ा जाहिराती देऊन जनतेला सरकारने सांगितला पाहिजे. सामाजिक भेदाच्या िभती भक्कम करणाऱ्या आरक्षणाचा फेरविचार झाला पाहिजे. सरकारबाहय़ सत्ताकेंद्र म्हणवल्या जाणाऱ्या रा. स्व. संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांचे आरक्षणाबाबतचे हेच विचार भाजपने गांभीर्याने घेतले पाहिजेत.
– श्रीनिवास स. डोंगरे, पुणे
मोदींनीही मळलेलीच पायवाट पत्करली..
कोईम्बतूर येथील प्रचारसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी केलेली, आरक्षण कदापि रद्द होणार नाही याची ग्वाही देणारी घोषणा अत्यंत दुर्दैवी आहे. आरक्षण असावे; परंतु ते जातीवर आधारित नसून आíथकदृष्टय़ा दुर्बल असलेल्या घटकांसाठी असावे याबद्दल कुणाचेही दुमत नसावे.
पंतप्रधानांनी मागच्याच सगळ्या सरकारांची री ओढण्यापेक्षा आरक्षित समाजाला हळूहळू विश्वासात घेऊन आरक्षणाची टक्केवारी कशी कमी करता येईल हे पटवून देणे स्वागतार्ह ठरले असते; परंतु तसे न घडता त्यांनीसुद्धा मळलेलीच पायवाट पत्करली हे निराशाजनक आहे.
– महेंद्र शं. पाटील, नौपाडा, ठाणे.
आरक्षण थांबवाच, जातही खोडून टाका
केवळ जातीआधारित आरक्षणातच नव्हे तर जिथे जिथे जातीची आठवण करून द्यावी लागते तिथे तिथे पर्यायी बदल करायला हवा. अगदी शाळेतील हजेरी पत्रकावरील जातीसाठी केलेला रकाना खोडण्यापासून. त्या व्यक्तीला आपल्या आयुष्यात माणूस ही जात सोडली तर इतर जातींचा विसरच पडायला हवा. मागास वर्गाला उन्नतीसाठी संधी मिळावी यात दुमत नाही; परंतु त्यासाठी मी अमुक जातीत जन्माला आलो की झालो मागास हा विचार बदलायला हवा. आज अनारक्षित वर्गातीलसुद्रा खूप लोक आर्थिक दुरवस्थेत आहेत. त्यासाठी नेमके सध्या मागास कोण हे ठरविण्यासाठी आम्ही सर्व भारतीय ही एकच जात ठेवून नवा पर्याय निर्माण करायला हवा. कारण जोपर्यंत भारतात जात हा आरक्षणाचा आधार आहे तोपर्यंत एक वेळ भारत आíथक प्रगती करीलही; परंतु खरी महासत्ता होणे अवघडच.
– अजिंक्य अ. गोडगे, रोसा (ता. परंडा, जि. उस्मानाबाद)
आरक्षणाबद्दल समजून घेणे महत्त्वाचे..
‘मागासपणाचे डोहाळे’ हा अग्रलेख (२ फेब्रु.) वाचला. आजकाल काही लोकांच्या तोंडी एक विधान परवलीचे बनले आहे ते म्हणजे ‘गेली ६०-६५ वर्षे यांना आरक्षण दिले, मात्र ते आहेत तिथेच आहेत.’ अशा कोत्या मनोवृत्तीचे काही लोक म्हणतात. मी किती गरीब आहे त्यांच्यापेक्षा माझी परिस्थिती बिकट आहे.. मग मला आरक्षण नको? मात्र अशांना, नेमके कोणते आरक्षण मागतो आहोत- शैक्षणिक की राजकीय- हेदेखील समजत नाही. मुळात आरक्षण केवळ आíथक तत्त्वावर दिले तर ते घटनाविरोधी ठरेल. तरीही बरेच जण याच तत्त्वावर आरक्षण असावे म्हणतात, तेव्हा हे समजूनच घेतले जात नाही की आरक्षणासाठी घटनेने काही तत्त्वे निश्चित केली आहेत.
अलीकडे आरक्षण मागणारे विचित्रच विश्लेषण करतात. ‘माझ्या समाजातील हा किती गरीब आहे, मला नको- मात्र याला आरक्षण द्या.’ कबूल की तो आíथकदृष्टय़ा गरीब आहे, त्याहीपेक्षा आज ज्यांना आरक्षण आहे ते वर्ग गरीब (सामाजिकदृष्टय़ा) आहेत त्यांचे काय? आíथक आणि सामाजिक या दोघांमध्ये आधी सामाजिक सुधारले तरच आíथक सुधारतील हे काही लोक समजूनच घेत नाहीत. तो आर्थिकदृष्टय़ा गरीब आहे हे अमान्य करण्याचा प्रश्न नाही, मात्र तो सामाजिकदृष्टय़ा सरासरीच्या वरतीच आहे. पण आरक्षणविरोधकांना किंवा नवआरक्षण मागणीदारांना एवढे कसे समजेना की, आजही ज्यांना आरक्षण आहे ते सरासरीच्या खालीच आहेत.
काही श्रीमंत आहेतही; मात्र अशांनी नतिक जबाबदारी ओळखून जर आरक्षणाचा त्याग केला, तर अशा ‘तो किती श्रीमंत आहे, त्याला आरक्षण, मग मला का नको’ असे म्हणणाऱ्या प्रवृत्तींना जोरदार उत्तर देता येईल. पण आपली पुढारीप्रधान संस्कृती सुधारू देईल तर ना! हळूच गाजर दाखवणार, मत पदरात पाडून घेतले की पाच वर्षे गायब. मात्र समाजाने आता समंजस भूमिका घ्यायला हवी. मात्र त्याची सुरुवात कुणा तरी एकापासून झाली पाहिजे ‘तो एक’ होण्यास आज कोणीही राजी नाही, त्यामुळे आधी आपण ‘तो एक’ होऊ या.
– दुष्यंत सुर्वे, बीड
‘विकास व सुशासन’ हाच मोदींचा प्रचार
‘‘अब की बार’चा अमेरिकी अवतार’ या मथळ्याखाली प्रसिद्ध झालेल्या पत्रात (लोकमानस, २ फेब्रुवारी) आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष शर्यतीतील एक उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यंची चुकीची व वस्तुस्थितीला सोडून तुलना केली आहे.
या पत्रातील ‘निर्देशांक यूपीएच्या पातळीखाली गेला आहे व ‘मेक इन इंडिया’ राबवूनही निर्यात वाढलेली नाही,’ ही अनुमाने अभ्यासपूर्वक केली नाहीत, असेच मला वाटते. जागतिक मंदीची लाट असताना आणि चीनची ढासळती अर्थव्यवस्था आणि पडलेल्या तेलाच्या किमती हे बाह्य घटक असतानाही भारताची अर्थव्यवस्थेचा दर जगभरात आघाडीवर आहे. अर्थात बाह्य वातावरण पोषक असते तर हे चित्र आणखीही उत्तम दिसले असते, हे सांगणे न लगे.
निवडणूक प्रचारपद्धतीचीही चुकीची तुलना या पत्रात आहे. मोदी यांनी निवडणूक प्रचार करताना फक्त विकास व सुशासन हा मुद्दा घेतला हेता. त्यांच्यावर विखारी टीका, पातळी सोडूनही टीका झाली तरीही त्यानी संयम राखला हे आपण जाणतोच. असे असताना चुकीची तुलना कशासाठी?
– अतुल देिशगकर, पुणे
मुरुडचे काय, वसईचे काय..
पुण्याच्या इनामदार महाविद्यालयाचे १३ विद्यार्थी मुरुडजवळ समुद्रात बुडून मृत झाले ही घटना फारच क्लेशकारक आहे. ही बातमी (लोकसत्ता, २ फेब्रु.) वाचल्यानंतर आम्ही अर्नाळा ते वसई हा जवळपास १५ किलोमीटरचा समुद्रकिनारा पायतळी घातला. अर्नाळा, राजोडी, कळंब, भुईगाव, रानगाव ते थेट वसई हा सारा समुद्रकिनारा तरुण-तरुणींनी व अन्य नागरिकांनी भरून गेला होता. कुणी सेल्फी घेत होते तर काही किनाऱ्यांजवळ समुद्राचे पाणी न्याहाळीत होते. अर्नाळावगळता कुठेही पोलीस वा गार्डचा पत्ता नव्हता. सूचना देणाऱ्या पाटय़ा दिसल्या नाहीत. सरकार सर्वत्र पोलीस यंत्रणा ठेवू शकत नाही पण अजिबातच नसावे हे म्हणजे नागरिकांच्या जिवाची सरकारला पर्वा नाही हे स्पष्ट आहे. मात्र विद्यार्थी समुद्रात उतरतातच कसे? शिस्तीचा धाक आपल्याकडे नसतो त्यामुळे हे असे दुर्दैवी बळी जातात. मुरुडसारख्या घटना पूर्वी घडल्या आहेतच. वसई किल्ल्याच्या जवळील खाडीत जेटी आहे, ती थेट खाडीला जाऊन मिळते. अनेक बाइकस्वार पत्नी व मुलांसह थेट त्या जेटीवर गाडी नेतात. तेथे सूचना फलक असूनही कुणी वाचत नाही. मग काही जणांचा जीवही वाचत नाही आणि जे मागे राहतात त्यांचे आयुष्य अंधकारमय होते.
– मार्कुस डाबरे, पापडी (वसई)
या ‘मानधना’ची नोंद तरी असते का?
िपपरी-चिंचवड महापालिकेतील नगरसेवक जगदीश शेट्टी यांचे पद खोटे ‘जात-प्रमाणपत्र’ दाखल केल्यामुळे रद्द झाल्याचे वृत्त (लोकसत्ता, २ फेब्रु.) वाचले. त्याचमुळे त्यांना देण्यात आलेले ‘फायदे’ परत घेण्याचे आणि त्यांच्या ‘मानधनाची’ रक्कम वसूल करण्याचे आदेशही महापालिकेने काढले, म्हणे! निवडून आल्यावर गेल्या चार वर्षांत शेट्टी यांनी काय-काय ‘प्रताप’ केले असतील/ नसतील, याची नोंद आणि त्याबद्दल त्यांना मिळालेले ‘मानधन’ वसूल करण्याची सक्षम यंत्रणा पालिकेकडे आहे का? श्री. रा. रा. अजितदादा यांच्यात त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्याची ‘टगेगिरी’ आहे का?
– डॉ. राजीव देवधर, पुणे
न्यायालयीन देखरेखीत ‘राजकारण’ नसते!
राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ व त्यांच्या कुटुंबीयांवर झालेल्या कारवाईमुळे शरद पवार फारच व्यथित झालेले दिसतात. त्यानंतरच्या प्रतिक्रियेतून तरी, देशाच्या न्यायालयावरचा देखील त्यांचा विश्वास उडालेला दिसतो. भुजबळ कुटुंबीयांवरील कारवाई उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चालू असून किरीट सोमय्या त्याचा राजकीय लाभ उठवू पाहत असले, तरी न्यायालयाच्या देखरेखीमुळेच सक्तवसुली संचालनालय एवढय़ा सक्तीने कारवाई करत आहे. त्यासाठी पवारांनी भाजपला दोष देण्यापेक्षा स्वत:ला दोष देणे जास्त सयुक्तिक होईल. आपल्या पक्षांच्या नेत्यांची मालमत्ता कोटीच्या कोटी उड्डाणे घेत असताना त्याकडे सोईस्कर दुर्लक्ष केल्यानंतर आता कारवाईच्या जाळ्यात अडकल्यावर दुसऱ्याच्या नावाने बोटे मोडण्यात काय हशील आहे? स्वपक्षीयांवर एवढाच विश्वास असेल तर अन्य पक्षांवर राजकीय दोषारोप करण्याऐवजी कायदेशीर मार्ग वापरूनच स्वपक्षीयांची सुटका करून घ्यावी.
उमेश मुंडले, वसई

समलैंगिक प्रवृत्ती निसर्गात आहेच, आणि ‘भारतीय संस्कृती’त सुद्धा!

$
0
0

स्वत:ची चूक सुधारत समलंगिक व्यक्तींना न्याय मिळवून देण्याच्या संदर्भात योग्य व पुरोगामी पाऊल उचलल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाचे अभिनंदन! वास्तविक समलंगिकता ही जन्मत: असते. वयाच्या एका विशिष्ट वयात तिची ओळख पटायला लागते. केवळ मानवच नाही तर १५०० हून अधिक प्राण्यांमध्ये समलंगिकता आढळते. त्यात सिंह, वाघ, कुत्रा, वानर, पेंग्विन इ. प्राण्यांचा समावेश होतो. यावरून समलंगिकता ही नसíगक असते हे सिद्ध होते.
प्रत्येक व्यक्तीचा लैंगिक कल हा जन्मजात ठरलेला असतो. ही बाब अत्यंत नसíगक आहे हे जागतिक आरोग्य संघटनेने (हऌड) सिद्ध केले असताना आपण कोणत्या आधारे हे वास्तव नाकारत आहोत?
ब्रिटिशपूर्व काळात या गोष्टीला समाजमान्यता होती. मात्र वसाहत कालखंडात ब्रिटिशांची राजकीय व वैचारिक गुलामगिरी आपण पत्करली. ब्रिटिशांनी त्यांचा धर्मग्रंथ असलेला बायबल प्रमाण मानून काही नियम तयार केले, त्यापकी १८६१ साली मेकॉलेने हा कायदा निर्माण केला (याच मेकॉलेने भारतात केवळ लिखाण काम करणारे कारकून तयार होतील अशी व्यवस्था करणारी शिक्षणपद्धतीही सुरू केली, जी आजही आपण वापरतो!!).
मात्र ब्रिटिशांनी त्यांच्या देशात सुमारे ५० वर्षांपूर्वीच समलंगिक विवाह कायदेशीर केले आहेत व अशा जोडप्यांना मूल दत्तक घेण्याचाही अधिकार आहे. आपण मात्र अजूनही या मानसिक गुलामगिरीच्या खुणा अभिमानाने मिरवत आहोत.
ही गोष्ट भारतीय संस्कृतीच्या विसंगत असल्याचे अनेकांचे मत आहे. मात्र डोळस दृष्टीने पाहिले असता याच्या अगदी उलट निष्कर्ष निघतो. खजुराहोची मंदिरे संस्कृतीचा भाग नाहीत? किती जणांना ठाऊक आहे माहीत नाही, मात्र प्राचीन भारतात समलंगिकता हा गुन्हा नव्हता. ‘क्रितिवास रामायणा’त माला व चंद्रा यांच्या प्रेमकथेच्या कित्येक छटा पाहायला मिळतात. वराहमिहिर यांनी लिहिलेल्या व वैद्यकशास्त्रातील एक महत्त्वपूर्ण आद्य ग्रंथ मानल्या जाणाऱ्या ‘बृहदसंहितेत’ समलंगिकता ही नसíगक असल्याचे स्पष्टपणे सांगितले आहे. वात्स्यायन यांनी आपल्या ‘कामसूत्र’ या कामशास्त्रावरील अद्वितीय ग्रंथात याचा उल्लेख ‘तृतीय प्रकृति:’ असा केलेला पाहायला मिळतो.
उर्दूत मीर तक़ी मीर, नमाजुद्दीन शहा यांच्या, दोन पुरुषांच्या प्रेमावर आधारित कित्येक कथा आजही उपलब्ध आहेत. या साऱ्या गोष्टी भारतीय संस्कृतीचा भाग नाहीत?
राज्यघटनेच्या दृष्टीने पाहिले असता प्रत्येक व्यक्ती जन्मत: स्वतंत्र असते. प्रत्येक व्यक्तीला समान अधिकार प्राप्त झाले असून कायद्यासमोर सर्व व्यक्ती समान आहेत (कलम १४), त्याचबरोबर कलम २१ अन्वये प्रत्येक व्यक्तीला ‘प्रतिष्ठापूर्वक’ जीवन जगण्याचा अधिकार आहे. घटनेने धर्म, वंश, िलग इ. गोष्टींच्या आधारे दोन व्यक्तींत भेदभावास प्रतिबंध केला आहे. या सर्व गोष्टींचा विचार करता आपण समलंगिक व्यक्तींना न्याय देण्याच्या बाबतीत बराच उशीर केला आहे, असेच म्हणावे लागेल.
त्याच्याही पुढे जाऊन खरी गरज आहे ती म्हणजे समलंगिक समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलण्याची. बहुसंख्य लोकांपेक्षा त्यांची लंगिकता वेगळी आहे याचा अर्थ ती गोष्ट चुकीची आहे असा होत नाही. बहुसंख्यवादाच्या जमान्यात ही बाब सहज पचनी पडणे अवघड आहे.
प्रत्येक माणूस जन्माने स्वतंत्र असताना आणि बाकी अन्य समाजाला काहीही त्रास नसताना दोन सज्ञान व्यक्तींनी, कोणी कोणासोबत विवाह करावा, हा निर्णय आपण प्रत्येक व्यक्तीच्या विवेकावर का सोपवू शकत नाही? हा विषय केवळ दांभिक नतिकतेचा नसून व्यक्तीच्या आत्मसन्मान व मूलभूत अधिकारांचा आहे.
– कौस्तुभ वराट, लातूर

स्वैराचार नकोच!
‘समिलग समानता’ हे संपादकीय (३ फेब्रु.) पाश्चात्त्य जगताची समिलग समानतेसाठी स्तुती करणारे व भारतीय किती अज्ञानी आहेत, किती मागास आहेत असे दाखवण्याचा प्रयत्न करणारे आहे. सर्वोच्च न्यायालयालासुद्धा दोष देत आपली भूमिका कशी योग्य आहे हे सांगण्याचा या लेखातील अट्टहास तर कुणालाही न पटणाराच आहे.
लंगिकतेचे स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे. जे वाटते ते करणे म्हणजे स्वातंत्र्य असे असेल तर माणसे तितक्या प्रवृत्ती व तितक्यात विकृतीसुद्धा आहेत हेही लक्षात घ्यायला हवे.
लेखात म्हटले आहे की, जगात समिलगी विवाह कायदेशीर ठरतात, मग भारतात विरोधी भूमिका का? तर हा प्रश्न ज्या त्या देशातील संस्कृतीवर अवलंबून आहे. आपल्या संस्कृतीचे विकृतीकरण म्हणजे पुरोगामी विचार, स्वातंत्र्य होत नाही.

पूर्वी समुद्र ओलांडणे वज्र्य होते, महिला पुरुषांचा संवाद होत नसे, ही अग्रलेखातील उदाहरणे आज राज्यघटनेला मान्य असणाऱ्या कायद्यांना कुठेही लागू होत नाहीत. नव्या खंडपीठाने समलंगिकतेचा मुद्दा हा योग्य रीतीने- भारतीय संस्कृतीचा विचार करून- सोडवावा; नाही तर तो एक प्रकारे घटनाकारांचा अवमानच ठरेल.
– अमोल पालकर, अंबड (जालना)

गर्भलिंग चाचण्यांवर जुने उपायच बरे
‘गर्भिलगनिदान चाचणी अधिकृतपणे व्हायला हवी’ ही बातमी (लोकसत्ता, २ फेब्रु.) वाचली. गर्भलिंगनिदान बंदीचा (पीसीपीएनडीटी) कायदा करूनही स्त्री भ्रूणहत्यांची संख्या ज्या प्रमाणात कमी व्हायला हवी तेवढी कमी झालेली दिसत नाही. आजही बऱ्याच राज्यांत दर हजारी पुरुषांमागे स्त्रियांचे प्रमाण ९००च्या खालीच आहे. ‘पीसीपीएनडीटी’ कायद्याची कडक अंमलबजावणी करताना सोनोग्राफीआधी भरावयाच्या ‘फॉर्म एफ’मधील चुका करणाऱ्या डॉक्टरांना दोषी मानून त्यापैकी काहींवर कारवाईही झाली. स्टिंग ऑपरेशन करून काही डॉक्टरांना रंगेहाथ पकडले गेले; परंतु असे करूनही स्त्री भ्रूणहत्या लक्षणीय प्रमाणात कमी झाल्या नाहीत.
यावर उपाय म्हणून अधिकृतपणे गर्भिलगनिदान चाचणी करण्यात यावी, असे महिला व बालकल्याणमंत्री मनेका गांधी यांनी सुचवले आहे. काही विकसित देशांत असे होते.. खरे तर हा उपाय जालीम वाटला तरी खरंच चांगला आहे; परंतु िलगनिदान व स्त्री भ्रूणहत्या हा फक्त वैद्यकीय प्रश्न नसून तो सामाजिक प्रश्न आहे. उघडपणे अधिकृत िलगनिदान करून तो गर्भ स्त्रीचा असल्यास प्रसूतीपर्यंत त्याची विशेष काळजी घेता येईल वगरे ठीक आहे; परंतु आपल्या पोटात स्त्री भ्रूण वाढत असून तो घरातील लोकांना नको आहे, या जबरदस्त मानसिक दडपणाखाली गरोदर स्त्रियांना प्रसूतीपर्यंत राहावे लागेल, सतत घरच्यांचे टोमणे ऐकावे लागतील. या मनोवैज्ञानिक तणावामुळे गर्भाच्या वाढीवर विपरीत परिणाम होऊ शकतो. शिवाय गरोदर राहिलेल्या सर्वच स्त्रिया नऊ महिन्यांचा कालावधी पूर्ण करतात असे नाही. दोन-तीन टक्के रुग्णांमध्ये नसíगक गर्भपात होतात.. असा नसíगकपणे गर्भपात झाल्यास कोणाला दोषी मानायचे?
सद्य परिस्थितीत आपल्या आरोग्य यंत्रणेला नुसती गरोदर स्त्रियांची १००% नोंदणी व नियमित तपासणी करणेच खूप जिकिरीचे जाते. त्यात निदान केलेल्या स्त्री गर्भाची विशेष काळजी घेणे कितपत शक्य होईल याबद्दल शंका आहे. हा उपाय लागू करण्याइतका आपला समाज अद्याप प्रगल्भ झालेला नाही.
सद्य परिस्थितीत स्टिंग ऑपरेशन करून िलगनिदान करणाऱ्या डॉक्टरांना पकडणे, िलगनिदानाची मागणी करणाऱ्या नातेवाईकांसाठी कायद्यात शिक्षेची तरतूद करणे, प्रत्येक प्रसूती केंद्रातील एकूण जन्मांचे स्त्री-पुरुष प्रमाण तपासणे व जेथे मुलींच्या जन्माचे प्रमाण खूप कमी आहे तेथील सोनोग्राफी व गर्भपात केंद्रांवर विशेष लक्ष देणे, तीन महिन्यांवरील गर्भपातावर सरसकट बंदी आणून फक्त असाध्य व्यंगासाठीच पाच महिन्यांपर्यंतच्या गर्भपाताची परवानगी देणे वगरे उपायच स्त्री भ्रूणहत्या कमी करण्यास मदत करतील.
सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे प्रत्येक सोनोलॉजिस्टनी व स्त्रीरोगतज्ज्ञांनी आपल्या सदसद्विवेकबुद्धीला स्मरून ‘मी कुठल्याही परिस्थितीत गर्भिलगनिदान व स्त्री भ्रूणहत्या करणार नाही’ अशा प्रतिज्ञेचे आचरण केल्यास नव्या कायद्याची आवश्यकताच उरणार नाही.
– डॉ भरतकुमार महाले, जव्हार, जि. पालघर

प्रवासी संघटनांनीकर्तव्येही पाळावीत
धनश्री गोडवे मृत्यूप्रकरणी रेल्वेला गर्दी कमी करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याचा उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघाच्या उपाध्यक्षांचा सल्ला (लोकसत्ता, ४ फेब्रु.) काहीसा एकतर्फी वाटला. रेल्वेला सल्ला देणारे जेव्हा मेट्रो-३ प्रकल्पाला विरोध होतो तेव्हा त्या विरोधकांना सल्ला देऊन गर्दी कमी करणाऱ्या प्रकल्पाला पाठिंबा देण्यासाठी पुढे येताना दिसत नाहीत. जे प्रवासी चालती गाडी पकडताना तसेच रूळ ओलांडताना स्वत:च्या जिवाची पर्वा करीत नाहीत आणि कायम दरवाजात लटकत प्रवास करतात, त्यांची मानसिकता बदलणे हेसुद्धा रेल्वे प्रवासी संघटनांचे कर्तव्य आहे. कामगारांच्या, प्रवाशांच्या किंवा इतर कुठल्याही संघटना हक्कासाठी भांडतात, परंतु त्यांच्या सभासदांना जबाबदारीने वागण्याचे शिक्षण देण्यात कुचराई करतात हा सार्वत्रिक अनुभव आहे.
– राजीव मुळ्ये, दादर, मुंबई

उपाय काय करणार?
‘तिचे लोकलच्या दरवाजाला लटकून प्रवास करणे नेहमीचेच’ (लोकसत्ता, ४ फेब्रु.)ही बातमी वाचून रेल्वे सुरक्षा दलाच्या अजब तर्कशास्त्राची चीड आली. हे म्हणजे एखाद्या आजारावर उपाय शोधण्याऐवजी रुग्णाचाच काटा काढण्याचा प्रकार झाला. प्रत्येक अपघाताचा असाच चौकशी अहवाल तयार होणार असेल तर गर्दी-नियंत्रणाच्या दृष्टीने रेल्वे प्रशासनाकडून भविष्यात काही उपाययोजना होतील ही आशा सोडून दिलेलीच बरी.
– दीपक काशीनाथ गुंडये, वरळी (मुंबई)

राज्यघटनेला सनातन संस्कृतीचा पाया कसा?
भारतीय छात्र संसदेच्या व्यासपीठावरून मा. सरसंघचालक मोहनजी भागवत यांनी प्राचीन सनातन संस्कृती हाच भारतीय राज्यघटनेचा पाया आहे असे प्रतिपादन केले. ही बातमी (२९ जाने.) वाचली आणि राज्यशास्त्राचा विद्यार्थी म्हणून मेंदूमध्ये सूक्ष्म आदळआपट चालू झाली. ती साधारणत या मुद्दय़ांवर आधारलेली होती :
(१) भारतीय राज्यघटना ही प्राचीन नाही तर आधुनिक मूल्यांवर आधारलेली आहे. उदा. (अ) नियामक कायदा १७७३, (ब) पिट्स कायदा, १७८४ (क) चार्टर कायदा १८३३ आणि १८५३ (ड) राणीचा जाहीरनामा १८५८ (इ) भारत कौन्सिल कायदा १८६१ आणि १८९२ (ई) १९०९ च्या मोल्रे-िमटो सुधारणा व उ) १९१९ चा मोन्टेग्यु-चेम्सफर्ड कायदा (ऊ) १९३५ चा भारत सरकारचा कायदा (की ज्याला पंडित नेहरूंनी घटनेचे इंजिन संबोधले) हे घटनेचे मूळ स्रोत आहेत.
(२) घटना समितीने विविध देशांच्या राज्यघटनांचा अभ्यास करून काही महत्त्वाच्या बाबी समाविष्ट केल्या आहेत. त्याला भारतीय प्राचीन आणि सनातन संदर्भ लागूच होत नाही.
(३) मोहनजींना ‘हिंदू सनातन संस्कृती’बद्दल म्हणायचे की इतर धर्माबद्दलदेखील, याचा उलगडा होत नाही. कारण जैन व बौद्ध धर्माचा उदय भारतात आहे. तसेच प्राचीन सनातन संस्कृतीत स्त्रियांना, बहिष्कृत समाजाला काय स्थान होते याचा विसर पडलेला दिसतो. तत्कालीन विचारांत स्वातंत्र्य, समता, बंधुता या तत्त्वांना तिलांजली दिलेली दिसते.
(४) सर्व समाजघटकांना त्यांच्या गुण-दोषांसहित एका सूत्रबद्ध मालिकेत गुंफण्याचे काम राज्यघटना करते. तिच्यावर कुणाही एका संस्कृतीचा ठसा नाही.
तेव्हा, मोहनजी असोत किंवा सामान्य व्यक्ती असो, अशा चर्चामुळे अभ्यासकांना पुन्हा एकदा संदर्भग्रंथांकडे वळावे लागते आणि घटनेचे अधिक काटेकोरपणे विश्लेषण करता येते, त्यातूनच पुढे बुद्धिभेद करणाऱ्यांपासून राज्यघटनेला वाचवता येते.
येणाऱ्या पिढय़ांना आजची भारतीय राज्यघटना मार्गदर्शकच ठरणार आहे, हे मान्य व्हावे. अशा बौद्धिक वाद-विवादातून जनतेची बुद्धी अधिक खुली व्हावी, बौद्धिक व्यायाम होऊन विवेकाचा बौद्धिक आवाका वाढावा, हाच या पत्राचा उद्देश.
– विराट रंजना बजरंग पवार , कराड

भिडे हवे आहेत का?
डॉ. आर. के. ऊर्फ नंदू भिडे यांच्या व संशोधन आधारित उद्योगासंबंधी त्यांच्यासमवेत झालेल्या चर्चाच्या आठवणींचा पट ‘लोकसत्ता’तील पत्रामुळे पुन्हा उलगडला. त्या वेळी झालेल्या आमच्या काही भेटी, दीर्घ चर्चा/ अनुभवकथन तसेच आमच्या कल्याणच्या घरी त्यांची भेट डोळ्यांसमोर येत गेली. दहा हजारांवर हृदय शस्त्रक्रिया करणारा तज्ज्ञ डॉक्टर अतिशय साधा, निर्मळ व उरात मानव कल्याणाचे उच्च ध्येय घेऊन धडपडत होता. ब्रिटनच्या सरकारने डॉ. भिडेंच्या कृत्रिम हृदय तंत्रज्ञानाचा त्यांच्या देशासाठी उपयोग करून घेतला. असे कृत्रिम हृदय हे आनुवंशिकतेचा व इतर स्थानिक घटकांचा अभ्यास करून मूळ तंत्रज्ञानात योग्य बदल करून ‘कस्टमाइझ’ करावे लागतात, असेही त्या वेळी त्यांनी सांगितले. भारतासाठी अशाच प्रकारचा अभ्यास करून ते गोरगरिबांच्या कामी यावे, अशी त्यांची तीव्र इच्छा होती व त्यासाठी त्यांना आपल्या सरकारकडून पाठबळ अपेक्षित होते. इतर देशांत त्यांना आमंत्रित केले जात असतानाही त्यांचा ओढा भारताकडे अधिक होता.
एका ज्येष्ठ पत्रकाराने डॉ. भिडें यांना त्यांचे ‘हुकमी अस्त्र’ म्हणजे त्यांचे हृदयशल्यचिकित्सा व शस्त्रक्रिया हाच ‘आवश्यक निधीसाठी हक्काचा पर्याय’ असल्याचे सुचविले. परंतु तो सल्ला डॉ. भिडे यांनी तत्त्व म्हणून विनम्रपणे नाकाराला. मरणाच्या दारातील हृदयरोग्याची अशी अडवणूक करणे त्यांना मंजूर नव्हते! डॉ. भिडे भर पावसात छत्रीदेखील वापरत नसत, त्याची काही गरज नाही, असे त्यांचे म्हणणे असे. पुढे त्यांना हॉलंडला त्यांच्या तंत्रज्ञानावर काम करण्याची संधी मिळाली म्हणून ते तिथे गेले. परंतु इतरांसाठी कृत्रिम हृदयाचा ध्यास घेणाऱ्या या देवदूताला हृदयविकाराचाच इतका तीव्र झटका आला की कोणतेही प्राथमिक उपचार मिळण्याआधीच प्राणज्योत मालवली.
असेच अजूनही बरेच वेडे या देशात आहेत. सरकार, योजना आपल्या गतीने कामे करीत राहतील तसेच राजकारणी, उच्च वर्तुळातील राजसंशोधक ‘नेमून दिलेले’ काम करीत राहतील. समाज म्हणून आपल्याला असे डॉ. भिडे हवे आहेत का? की या विचारात इतके गुंतण्यापेक्षा, शेअर बाजार, गुंतवणूकयोग्य ‘सुपीक’ जमीन वा ‘मोक्याच्या’ फ्लॅटमधली गुंतवणूक अधिक लाभदायी वाटते?
– सतीश पाठक, पुणे.

हिंदुत्ववादी नव्हे, शोषणवादी!
‘मोदींचा खरा चेहरा हिंदुत्वाचाच’ हे पत्र (‘लोकसत्ता’, २३ जानेवारी ) व त्याच अंकातील ‘दारिद्रय़ाचे त्रयस्थ दर्शन!’ हा अग्रलेख दोन्ही अत्यंत समर्पक आहेत. विशेषत: सर्वत्र धर्मनिरपेक्षवादाविरुद्ध वातावरण असताना व धर्मनिरपेक्षतावाद, गांधी, नेहरू अथवा समाजवाद यांना चांगले म्हणणे हा जणू काही राष्ट्रद्रोह आहे, अशा प्रकारचे वातावरण हेतूपूर्वक निर्माण केले जात असता अशा प्रकारचे परखड विचार मांडणे गरजेचेच आहे.
मोदींचा चेहरा हिंदुत्वाचा आहे, हे खरेच आहे. परंतु अगदी खोलात जाऊन पाहिले असता हे हिंदुत्वदेखील वरवरचे आहे, असे दिसून येते. मोदींचा काय अथवा ते ज्या पक्षाचे आहेत त्या पक्षाचा काय; खरा चेहरा शोषकांचा आहे असे दिसून येते. अन्यथा केवळ हिंदूधर्मीयांचे कल्याण एवढे जरी मर्यादित उद्दिष्ट त्यांनी डोळ्यांसमोर ठेवले असते तर इतर धर्मीयांचा, विशेषत: मुसलमानांचा तिरस्कार करण्याची व समाजवादी धोरणापासून फारकत घेण्याची गरज त्यांना भासली नसती.
या देशात कारखान्यात काम करणारे कामगार, कर्मचारी व अधिकारी, त्याचप्रमाणे शिक्षण संस्थांमधून काम करणारे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी हे बहुसंख्येने हिंदू आहेत. त्यांना संरक्षण देण्याच्या दृष्टिकोनातून जर त्यांनी काही कायदे केले असते तर त्यामध्ये बहुसंख्य हिंदूंचेच हित होणार होते. अशा प्रकारचे कोणतेही कायदे न करता जागतिकीकरण अथवा गुणवत्तेचा बागुलबुवा उभा करून मूठभर कारखानदारांचे अथवा संस्थाचालकांचे हितसंबंध जोपासून कोणत्या हिंदूचे कल्याण ते करणार आहेत ते चांगलेच दिसून आले आहे. जनतादेखील त्याबाबतीत त्यांना जाब विचारत नाही ही दुर्दैवाची बाब आहे. याची किंमत जनतेला पुढे मोजावी लागेल. ‘आहे रे’ वर्गाला रान मोकळं सोडून भ्रष्टाचाराला वाव देणे धोकादायक आहे. हा भ्रष्टाचार अज्ञान, अंधश्रद्धा व गरिबीपेक्षाही धोकादायक आहे. एवढेच नव्हे तर तो दहशतवादापेक्षाही किती तरी धोकादायक आहे, कारण दहशतवादाला समाजामध्ये प्रतिष्ठा मिळत नाही. भ्रष्टाचारी माणूस मात्र मोठा असेल तर त्याच्यासाठी पायघडय़ा घालायलाही लोक मागेपुढे पाहात नाहीत.
– श्रीनिवास कुलकर्णी, चाकण

अन्नधान्याचा प्रश्न सोडविणे आवश्यक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकांच्या प्रचार काळात केलेल्या भाषणात शेतमालाला उत्पादन खर्चापेक्षा ५० टक्के अधिक किंमत देऊ असे आश्वासन दिले होते. परंतु हे आश्वासन पूर्ण करताना शेतमालाचा उत्पादनखर्च कसा काढला जातो हा भाग महत्त्वाचा ठरणार आहे.
मागील काही वर्षांपासून देशात सामाजिक पातळीवर अनेक समस्या समोर येत आहेत. वाढत्या महागाईने सामान्यांचे जिणे अवघड झाले असताना दुसरीकडे दुष्काळी परिस्थितीमुळे शेतीक्षेत्रातील उत्पादनावर विपरीत परिणाम होत आहे. यासाठी देशांतर्गत उत्पादनवाढीवर विशेष लक्ष केंद्रित करणे किंवा अन्नधान्याच्या आयातीवर भर देणे हाच मार्ग आहे. या पाश्र्वभूमीवर केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारकडून सामाजिक तसेच कृषिक्षेत्रात मोठी प्रगती अपेक्षित आहे.
देशातील गोरगरिब जनतेला हक्काचे दोन घास मिळावेत या उदात्त हेतूने यूपीएप्रणित सरकारने अन्नसुरक्षा योजना आणली होती. परंतु त्याच्या अंमलबजावणीत अनेक अडचणी असल्याचे दिसून येते . त्यामुळे या योजनेद्वारे सामान्य जनतेला कितपत आणि कसा दिलासा मिळणार हा प्रश्न कायमच आहे.
खरे तर निर्यातवाढ ही आपल्या देशाच्या सर्वागीण विकासासाठी, विशेषत: अर्थव्यवस्थेच्या बळकटीसाठी महत्त्वाची ठरते. परंतु त्याबाबत प्रत्यक्षात समाधानकारक चित्र दिसत नाही. भारतीय शेतमाल परदेशी बाजारपेठेत नाकारला जाणे हे तर नित्याचे दुखणे झाले आहे. हे प्रकार वाढत राहिले तर शेतमालाच्या निर्यातीबाबत कायमस्वरूपी प्रश्नचिन्ह निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या प्रश्नाचा अभ्यास करून संबंधित शेतमालाबाबत पुढे येणारया कमतरता कशा दूर करता येतील याचा विचार सरकारने प्रभावशालीपणे करणे आवश्यक आहे असे वाटते .
– मधुकर चुटे, नागपूर

मनरेगाकडे जाहिरातींच्या पलीकडेही सरकारने लक्ष द्यावे
सर्वाना वर्षांतून किमान १०० दिवस रोजगाराचा हक्क देणाऱ्या ‘मनरेगा’ या योजनेने परवाच्या २ फेब्रुवारीला दहा वष्रे पूर्ण केली. यानिमित्ताने केंद्र सरकारच्या ग्रामीण विकास मंत्रालयाने ‘इंडियन एक्स्प्रेस’मध्ये (पान ९) दिलेल्या इंग्रजी जाहिरातीत, मनरेगाच्या कामांची आकडेवारी जाहीर केली. मागील पाच वर्षांच्या आकडेवारीशी तुलना करता या योजनेकडे सरकारने दुर्लक्ष केल्याचे दिसून येते, ते खालीलप्रमाणे-
(१) मागील पाच वर्षांपेक्षा सर्वात जास्त खर्च केल्याचे जाहिरातीत दाखवले (२०१४-१५ : खर्च ३४३६० कोटी रु., २०१५-१६ या वर्षांत आतापर्यंत ३६०२५ कोटी रु.) प्रत्यक्षात २०१२-१३ या वर्षांत ३९७७८ कोटी रु., तर २०१३-१४ मध्ये ३८५५३ कोटी रुपये खर्च झाले.
(२) २०१४-१५ आणि २०१५-१६ मध्ये मिळून सुमारे आठ कोटी कुटुंबांतील पात्र व्यक्तींना रोजगार मिळाल्याचे जाहिरातीत सांगितले गेले आहे, पण २०१२-१३ व २०१३-१४ या वर्षांत एकूण नऊ कोटी पात्र कुटुंबांतील व्यक्तींना रोजगार मिळाला आहे.
(३) मागील दोन वर्षांत ४२ लाख ग्रामीण कामगारांनी कामाचे १०० दिवस पूर्ण केल्याचे सांगितले, पण २०१२-१३ व २०१३-१४ मध्ये ४६ लाख कामगारांनी कामाचे १०० दिवस पूर्ण केले होते.
(४) गेल्या दोन वर्षांपासून पारदर्शकतेसाठी कामगारांचा ९४ टक्के पगार बँक खात्यात जमा करण्यात आला असल्याचे सांगितले, पण प्रत्यक्षात २०११-१२ पासून कामगारांना थेट पगार न देता त्यांच्या पोस्टातील खात्यात जमा करण्यात येतो आणि आजही पोस्ट खात्यातच जमा होतो.
(५) २०१४-१५ ला माणसाचे कामाचे दिवस १६६, तर २०१५-१६ मध्ये १६० होते. त्यामागील दोन वर्षे म्हणजे २०१३-१४ ला कामाचे दिवस २२० होते व २०१२-१३ मध्ये कामाचे दिवस २३० होते.
‘मनरेगा’मधून मृदा संधारण, जलसंधारण, वृक्षारोपण, पूर नियंत्रण इ. राष्ट्रकार्य होऊन कामगारांना रोजगार मिळाला आहे. यामधून भारताचा सर्वसमावेशक विकास होत आहे आणि होणार आहे. ही योजना मागील सरकारने सुरू केली म्हणून त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. जागतिक बँकेने ‘मनरेगा’चा केलेला गौरव म्हणजे ‘मनरेगा ही १५ टक्के भारतीयांना (१९ कोटी लोकसंख्येला) कामाचा आणि रोजगाराचा हक्क देते. जगात अशी एकच योजना आहे’ या गौरवपत्राचा किमान सरकारने तरी विचार करावा..
– नकुल बिभिषण काशीद, परंडा, जि.उस्मानाबाद

Viewing all 2339 articles
Browse latest View live


<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>